शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूकंपाचे आठ धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:12 IST

मागील दोन आठवड्यांपासून भूगर्भातील आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूगर्भातील आवाजासह सौम्य स्वरूपाचे आठ धक्के जाणवले. गावात तीन ठिकाणी बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रांवर याची दोन रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली असल्याची माहिती ........

ठळक मुद्देसिस्मोग्राफवर २ रिश्टर स्केलपर्यंत नोंद : ‘एनसीएस’ टीम इंचार्जची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/धारणी : मागील दोन आठवड्यांपासून भूगर्भातील आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवत असलेल्या साद्राबाडीत बुधवारी रात्री पुन्हा भूगर्भातील आवाजासह सौम्य स्वरूपाचे आठ धक्के जाणवले. गावात तीन ठिकाणी बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रांवर याची दोन रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली असल्याची माहिती या ठिकाणी आठ दिवसांपासून ठाण मांडून असलेले नवी दिल्ली येथील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्रॉफ (एनसीएस) या टीमचे प्रमुख बलबीरसिंग यांनी दिली.धारणी तालुक्यातील साद्राबाडी, झिल्पी, खारी, गावलानडोह, सुसर्दा व राणीपिसा येथे दोन आठवड्यांपासून भूगर्भात हालचाली होत आहेत. मात्र, २१ आॅगस्टला मोठ्या प्रमाणात कंपने, आवाज झाला; अनेक घरांना तडे गेले . यानंतर जिल्हा प्रशासनाने साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी या पथकाला पाचारण केले होते. साद्राबाडी व परिसरात मंगळवारी १.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद गावात बसविलेल्या सिस्मोग्राफ यंत्रावर झाली.भूकंप म्हणजे काय?अमरावती : जमिनीत खोलवर जी हालचाल होते व त्यामुळे जी कंपने होतात, त्यालाच आपण भूकंप म्हणतो, अशी साधी व सोपी व्याख्या ‘एनसीएस’चे पथकप्रमुख बलबीरसिंग यांनी सांगितली. साद्राबार्डी परिसरातील भूगर्भातील कंपनांची २.५ ते १.२ रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली. ही भूगर्भातील कंपने आहेत. त्यामुळे या परिसरात जाणवत असलेले धक्के हे भूकंपाचेच असल्याचे बलविरसिंग यांनी सांगितले. २४ आॅगस्टला दुपारी जीआयएस पथक साद्राबाडी गावात पाहणी करीत असताना २.२१ वाजता पथकातील भूवैज्ञानिकांनी भूंकपाचा धक्का व आवाजाचा थरार अनुभवला. गुरूवारी मध्यरात्री पाच वेळा धक्के जाणवले. या धक्यांची सिस्मोग्राफवर १.५ रिश्टरस्केल अशी नोंद झाली. धक्का जाणवल्यावर विशिष्ट असा वास आला, हा वास कशाचा, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

गुरुवारी पुन्हा धक्कासाद्राबाडी व झिल्पी गावांमध्ये बुधवारी रात्री १२ नंतर सकाळपर्यंत भूकंपाचे आठ सौम्य धक्के बसल्यानंतर गुरुवारी दुपारी १२.५७ वाजता पुन्हा एक धक्का बसला. ‘एनसीएस’च्या सिस्मोग्राफ यंत्रावर याची तीव्रता २ रिश्टर स्केलपेक्षा कमी नोंदविण्यात आलेली आहे. दरम्यान, या भूकंपाच्या धक्क््यांनी आदिवासी बांधवांमध्ये मात्र गोंधळाची स्थिती आहे.‘जीएसआय’ची टीम पुन्हा डेरेदाखलजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : दोन्ही टीमच्या संवादानंतर देणार अहवालअमरावती : जिआॅलॉजिकल सर्व्हे आॅफ इंडियाच्या पथकाने भूगर्भात पाणी झिरपल्याने निर्माण झालेल्या वायूची हालचाल कंपनास कारणीभूत असल्याचे मत नोंदविले. मात्र, भूगर्भातील हालचाली, कंपने व आवाज हे आता ३५ किमी परिघात पोहोचले आहे व याची श्रुंखला सुरूच असल्याची माहिती प्रशासनाद्वारा देण्यात आल्यामुळे वरिष्ठ शास्त्रज्ञांसह पाच दिवसांतच ही टीम पुन्हा साद्राबाडीत डेरेदाखल झाली. भूवैज्ञानिक मिलिंद धकाते, मुकेश शर्मा, भूपेश उरखडे, प्रसाद, संजय वानखडे आदींनी साद्राबाडी परिसरात घरांना गेलेले तडे, विहिरी, तलाव, आरोग्य केंद्र आदी ठिकाणांची पाहणी केली. टीमद्वारा काही यंत्राच्या सहाय्याने पुन्हा निरीक्षण करण्यात आले. उशिरा रात्री या टीमसोबत एनसीएसच्या पथकातील शास्त्रज्ञांचा संवाद होण्याची शक्यता आहे व त्यानंतर साद्राबाडी येथे नेमके काय, याचा अहवाल मिळून उलगडा होण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सांगितले.

टॅग्स :Earthquakeभूकंप