शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत आठ ‘डेंग्यू पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:15 IST

स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना दिली आहे.

ठळक मुद्देडॉ.निचत यांचा दावा : डेंग्यू इलायझा पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना दिली आहे.इलायझा ही तपासणी डेंग्यू आजाराचे निदान करणारी आहे. त्यामुळे हे आठही रुग्ण डेंग्यूबाधित (डेंग्यू संशयित न समजता) म्हणता येतील, असेही आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात डॉ. निचत यांनी म्हटले. तीन रुग्णांचे प्लेटलेट १० हजारांपर्यंत येऊन त्यांना रक्तस्राव झाला होता. इतर रुग्णांचे प्लेटलेटसुद्धा ५० हजारांपेक्षा कमी झाले आहेत. त्यांची इतर लक्षणे डेंग्यू तापाची आहेत. कोणतेही शासकीय वा खासगी डॉक्टर डेंग्यूची लागण झाली नाही, असे नाकारू शकत नाही, असेही उपचारात पुढे आले आहे.शहरात सात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून, त्यांचे रक्तनमुने यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरमध्ये तपासण्यासाठी पाठविले आहेत. लवकरच त्याचा अहवालसुद्धा सादर होणार असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने म्हटले होते. सुदृढ आरोग्यासाठी सतर्क राहण्याचा व डेंग्यूसंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही विभागाने दिला होता.शासकीय तपासणी निगेटिव्ह येण्याची कारणेयवतमाळ मेडिकल कॉलेजलासुद्धा डेंग्यू इलायझा हीच तपासणी करण्यात येते. ही तपासणी साधारणपणे सात दिवसांतच पॉझिटिव्ह येते. शासकीय यंत्रणाद्वारा रक्तनमुने उशिरा घेतले जाणे, शीतसाखळी व्यवस्थित ठेवली न जाणे तसेच रक्तनमुने घेतल्यानंतर तपासणीत सात दिवसापेक्षा जास्त कालावधी लागणे, किटचा तुटवडा ही शासकीय तपासणी निगेटिव्ह येण्याची कारणे असू शकतात.डेंग्यूच्या आजाराचा प्रसार हा झपाट्याने होतो व काही रुग्णांना जीवसुद्धा गमवावा लागतो. याशिवाय आजारामुळे खिशावर पडणारा आर्थिक ताण वेगळा. यामुळे या आजाराबद्दलची माहिती प्रशासनाने नागरिकांना देणे आवश्यक असल्याचे मत ‘लोकमत’शी बोलताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज निचत यांनी व्यक्त केले आहे.डेंग्यू, हिवताप हे डासांपासून होणारा आजार आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे, घरातील पाण्याची टाकी, भांडी आदी आठ दिवसांतून एकदा कोरडे करण्याची गरज आहे. शहरातील स्थिती लक्षात घेता, नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.इतर डॉक्टरांकडे तीन डेंग्यूसदृश रूग्णडॉ. निचत यांनी त्यांच्याकडे आठ डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, दयासागरमध्ये दाखल दोन व डॉ. अजय डफळे यांच्याकडील एक रुग्ण डेंग्यूसदृश असल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. म्हणजे, रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे.हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहे. त्याचा अहवाल येईलच; परंतु आरोग्य विभागाने रुग्णांच्या घराजवळील नागरिकांचे रक्तनमुनेसुद्धा घेतले आहेत. सतर्कता बाळगावी; मात्र घाबरण्याचे कारण नाही.- सीमा नैताम, आरोग्य अधिकारी, महापालिका