शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानकडून काही तासांतच युद्धविरामाचं उल्लंघन, जम्मू, श्रीनगरमध्ये ड्रोनहल्ले
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

अमरावतीत आठ ‘डेंग्यू पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:15 IST

स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना दिली आहे.

ठळक मुद्देडॉ.निचत यांचा दावा : डेंग्यू इलायझा पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांना दिली आहे.इलायझा ही तपासणी डेंग्यू आजाराचे निदान करणारी आहे. त्यामुळे हे आठही रुग्ण डेंग्यूबाधित (डेंग्यू संशयित न समजता) म्हणता येतील, असेही आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात डॉ. निचत यांनी म्हटले. तीन रुग्णांचे प्लेटलेट १० हजारांपर्यंत येऊन त्यांना रक्तस्राव झाला होता. इतर रुग्णांचे प्लेटलेटसुद्धा ५० हजारांपेक्षा कमी झाले आहेत. त्यांची इतर लक्षणे डेंग्यू तापाची आहेत. कोणतेही शासकीय वा खासगी डॉक्टर डेंग्यूची लागण झाली नाही, असे नाकारू शकत नाही, असेही उपचारात पुढे आले आहे.शहरात सात डेंग्यूसदृश रुग्ण आढळले असून, त्यांचे रक्तनमुने यवतमाळच्या शासकीय सेंटिनल सेंटरमध्ये तपासण्यासाठी पाठविले आहेत. लवकरच त्याचा अहवालसुद्धा सादर होणार असल्याचे महापालिका आरोग्य विभागाने म्हटले होते. सुदृढ आरोग्यासाठी सतर्क राहण्याचा व डेंग्यूसंदर्भात काळजी घेण्याचा सल्लाही विभागाने दिला होता.शासकीय तपासणी निगेटिव्ह येण्याची कारणेयवतमाळ मेडिकल कॉलेजलासुद्धा डेंग्यू इलायझा हीच तपासणी करण्यात येते. ही तपासणी साधारणपणे सात दिवसांतच पॉझिटिव्ह येते. शासकीय यंत्रणाद्वारा रक्तनमुने उशिरा घेतले जाणे, शीतसाखळी व्यवस्थित ठेवली न जाणे तसेच रक्तनमुने घेतल्यानंतर तपासणीत सात दिवसापेक्षा जास्त कालावधी लागणे, किटचा तुटवडा ही शासकीय तपासणी निगेटिव्ह येण्याची कारणे असू शकतात.डेंग्यूच्या आजाराचा प्रसार हा झपाट्याने होतो व काही रुग्णांना जीवसुद्धा गमवावा लागतो. याशिवाय आजारामुळे खिशावर पडणारा आर्थिक ताण वेगळा. यामुळे या आजाराबद्दलची माहिती प्रशासनाने नागरिकांना देणे आवश्यक असल्याचे मत ‘लोकमत’शी बोलताना हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज निचत यांनी व्यक्त केले आहे.डेंग्यू, हिवताप हे डासांपासून होणारा आजार आहे. त्यामुळे स्वच्छता राखणे, घरातील पाण्याची टाकी, भांडी आदी आठ दिवसांतून एकदा कोरडे करण्याची गरज आहे. शहरातील स्थिती लक्षात घेता, नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.इतर डॉक्टरांकडे तीन डेंग्यूसदृश रूग्णडॉ. निचत यांनी त्यांच्याकडे आठ डेंग्यू पॉझिटिव्ह असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, दयासागरमध्ये दाखल दोन व डॉ. अजय डफळे यांच्याकडील एक रुग्ण डेंग्यूसदृश असल्याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. म्हणजे, रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे.हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहे. त्याचा अहवाल येईलच; परंतु आरोग्य विभागाने रुग्णांच्या घराजवळील नागरिकांचे रक्तनमुनेसुद्धा घेतले आहेत. सतर्कता बाळगावी; मात्र घाबरण्याचे कारण नाही.- सीमा नैताम, आरोग्य अधिकारी, महापालिका