शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

शिक्षण विभागानेच दाखविला शालेय योजनांना ठेंगा

By admin | Updated: March 23, 2015 00:30 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक लाभांपासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या अनेक योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे विद्यार्थी व शिक्षक लाभांपासून वंचित असल्याची बाब पुढे आली आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत शाळांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच शिक्षकांच्या मदतनिधीतून १९९७ मध्ये सावित्रीबाई फुले दत्तक योजना सुरू करण्यात आली. त्यावेळी प्रत्येक शिक्षकाने एक हजार रूपयांप्रमाणे निधी जमा केला होता. यातून लाखो रूपयांचा जमा झालेला हा निधी काही कालावधीकरिता शिक्षक बँकेत डिपॉझिट करण्यात आला होता. त्यावर मिळणाऱ्या व्याजातून गरीब व निराधार मुलींना प्रत्येकी ३०० रूपये देण्यात येत होते. याचा जिल्ह्यातील सुमारे २ हजार मुलींना लाभ मिळत होते. मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देणे बंद आहे. सदर योजनेसाठी जमा केलेला निधी बँकेत तसाच पडून असल्याची माहिती आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थापन केलेली समितीसुध्दा गठित केली होती. त्यामध्ये शिक्षण सभापती, शिक्षणाधिकारी व मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यावेळी समितीची सभाही पार पडत होती. मात्र सध्या शिक्षण विभागाने ही योजनाच बासनात गुंडाळून ठेवली आहे. याशिवाय जिल्हा परिषद शिक्षकांसाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलींच्या १०० टक्के पटनोंदणीला पुरस्कार दिला जात असे. याकरिता त्या शाळतील मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकास हा पुरस्कार बहाल केला जात होता. यासाठी केंद्रनिहाय प्रत्येक तालुकास्तरावरून अहवाल मागवून निकषाप्रमाणे अहवाल मागवून यासाठी शाळेची निकष पूर्ण केलेल्या शाळांसाठी हा उपक्रम सुरू आहे. मात्र एकूणच जिल्हा परिषदेच्या या दोन्हीही योजना सध्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे बंद पडल्या आहेत. परिणामी या योजनांपासून विद्यार्थी आणि शिक्षक अद्यापही वंचित आहेत. त्यामुळे या बंद पडलेल्या योजना पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पालक व शिक्षक संघटनांकडून होत आहे. (प्रतिनिधी)