शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वर्षभरानंतर प्रथमच खाद्यतेल स्वस्त होण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:09 IST

अमरावती : मागील वर्षभरापासून खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढत होते. वर्षभराच्या कालावधीत प्रति लिटर ६० ते ७० रुपयांची वाढ झाली ...

अमरावती : मागील वर्षभरापासून खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढत होते. वर्षभराच्या कालावधीत प्रति लिटर ६० ते ७० रुपयांची वाढ झाली होती. दर आठ दिवसांनी तेलाचे भाव वाढत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. आता अशातच मागील आठ दिवसांपासून तेलाचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहेे. ते पूर्वपदावर येण्याची शक्यता दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे.

देशाला जेवढे खाद्यतेल आवश्यक आहे, त्याच्या केवळ ३० टक्के उत्पादन देशात होते. उर्वरित खाद्यतेल दुसऱ्या देशातून आयात करावे लागते. त्यामुळे तेलाचे भाव नेहमीच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहतात. वर्षभरापूर्वी सोयाबीन तेलाचा एक लिटरचा पॉकेट केवळ ९० रुपयांना मिळत होते. त्याचा भाव १६० रुपयांपर्यंत पोहोचला होता. मागील आठ दिवसांत या तेलाचे भाव कमी होऊन ते आता १३५ रुपये दराने उपलब्ध होत आहे. याचप्रमाणे इतरही खाद्यतेलांचे भाव कमी होत आहेत. तेलाचे दर वाढल्याने भाजीतील तेल कमी झाले होते. तसेच चमचमीत पदार्थही खाणे कमी झाले होते. आता यथेच्छ पदार्थ तळता येणार आहेत. तेलाचे दर कमी होत चालले असल्याने गृहिणींमध्येही थोडाफार आनंद दिसून येत आहे.

बॉक्स

साठा करणाऱ्या दुकानदारांचे नुकसान

खाद्यतेलाच्या किमती वाढत असल्याने त्यातून अधिकाधिक फायदा घेण्यासाठी काही दुकानदारांनी खाद्यतेलाची साठवणूक करून ठेवली. तसेच काही व्यापाऱ्यांनी वाढीव दराने पहिलेच तेल बुकिंग करून ठेवले. आता मात्र भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधिकच्या दराने खरेदी केलेले खाद्यतेल कमी किमतीने विकावे लागत आहे. त्यामुळे दुकानदारांना तोट्याचा सामना करावा लागत आहे.

कोट

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल

१) २० वर्षांपूर्वी शेतात जवसाचे उत्पादन घेतले जात होते. कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे जवसाचे तेल चक्कीवर काढले जात होते. उर्वरित जवस विकले जात होते. जवसाच्या शेतीची जागा सोयाबीनने घेतली. तेव्हापासून दुकानातून खरेदी केलेले तेल खावे लागत आहे. आता तर सोयाबीनच्या ऐवजी कापसाची लागवड केली जात आहे.

- रामरतन देशमुख, मोर्शी

२) काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करायला सुरुवात केली होती. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कापूस पिकाकडे वळला. विदेशातून तेल आयात करण्यापेक्षा शासनाने तेलबिया वर्गीय पिकांना चालना देण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकचा भाव द्यावा लागेल.

- प्रभाकर कापसे, राजना

--------------

बॉक्स

खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)

आधीचे आताचे

सूर्यफूल : १९० - १६०

सोयाबीन : १६०- १३०

शेंगदाणा : १९०- १६५

पाम : १४५- १३०

सरसू : २२०- १८०

०००००००००००००००००००००००००००