शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरानंतर प्रथमच खाद्यतेल स्वस्त होण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:09 IST

अमरावती : मागील वर्षभरापासून खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढत होते. वर्षभराच्या कालावधीत प्रति लिटर ६० ते ७० रुपयांची वाढ झाली ...

अमरावती : मागील वर्षभरापासून खाद्यतेलाचे भाव सातत्याने वाढत होते. वर्षभराच्या कालावधीत प्रति लिटर ६० ते ७० रुपयांची वाढ झाली होती. दर आठ दिवसांनी तेलाचे भाव वाढत असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. आता अशातच मागील आठ दिवसांपासून तेलाचे भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहेे. ते पूर्वपदावर येण्याची शक्यता दुकानदारांकडून व्यक्त केली जात आहे.

देशाला जेवढे खाद्यतेल आवश्यक आहे, त्याच्या केवळ ३० टक्के उत्पादन देशात होते. उर्वरित खाद्यतेल दुसऱ्या देशातून आयात करावे लागते. त्यामुळे तेलाचे भाव नेहमीच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहतात. वर्षभरापूर्वी सोयाबीन तेलाचा एक लिटरचा पॉकेट केवळ ९० रुपयांना मिळत होते. त्याचा भाव १६० रुपयांपर्यंत पोहोचला होता. मागील आठ दिवसांत या तेलाचे भाव कमी होऊन ते आता १३५ रुपये दराने उपलब्ध होत आहे. याचप्रमाणे इतरही खाद्यतेलांचे भाव कमी होत आहेत. तेलाचे दर वाढल्याने भाजीतील तेल कमी झाले होते. तसेच चमचमीत पदार्थही खाणे कमी झाले होते. आता यथेच्छ पदार्थ तळता येणार आहेत. तेलाचे दर कमी होत चालले असल्याने गृहिणींमध्येही थोडाफार आनंद दिसून येत आहे.

बॉक्स

साठा करणाऱ्या दुकानदारांचे नुकसान

खाद्यतेलाच्या किमती वाढत असल्याने त्यातून अधिकाधिक फायदा घेण्यासाठी काही दुकानदारांनी खाद्यतेलाची साठवणूक करून ठेवली. तसेच काही व्यापाऱ्यांनी वाढीव दराने पहिलेच तेल बुकिंग करून ठेवले. आता मात्र भाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अधिकच्या दराने खरेदी केलेले खाद्यतेल कमी किमतीने विकावे लागत आहे. त्यामुळे दुकानदारांना तोट्याचा सामना करावा लागत आहे.

कोट

शेतकऱ्यांच्या घरातही विकतचे तेल

१) २० वर्षांपूर्वी शेतात जवसाचे उत्पादन घेतले जात होते. कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढे जवसाचे तेल चक्कीवर काढले जात होते. उर्वरित जवस विकले जात होते. जवसाच्या शेतीची जागा सोयाबीनने घेतली. तेव्हापासून दुकानातून खरेदी केलेले तेल खावे लागत आहे. आता तर सोयाबीनच्या ऐवजी कापसाची लागवड केली जात आहे.

- रामरतन देशमुख, मोर्शी

२) काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड करायला सुरुवात केली होती. मात्र, भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग कापूस पिकाकडे वळला. विदेशातून तेल आयात करण्यापेक्षा शासनाने तेलबिया वर्गीय पिकांना चालना देण्याची गरज आहे. त्यासाठी अधिकचा भाव द्यावा लागेल.

- प्रभाकर कापसे, राजना

--------------

बॉक्स

खाद्यतेलाचे दर (प्रति किलो)

आधीचे आताचे

सूर्यफूल : १९० - १६०

सोयाबीन : १६०- १३०

शेंगदाणा : १९०- १६५

पाम : १४५- १३०

सरसू : २२०- १८०

०००००००००००००००००००००००००००