शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मग्रारोहयोमध्ये आर्थिक अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 06:01 IST

या योजनत अकुशल कामे केल्यानंतरच कुशल कामे करण्याचे प्रावधान असताना अकुशल कामे न करता थेट कुशल कामे करून त्या कामाची देयके काढण्याची धडपड सुरू झाली आहे. दोन ते तीन कोटी रुपयांचा हा घोटाळा झाल्याची तक्रार विविध संघटना आणि आमदारांनी केल्यामुळे देयके थांबविण्यात आली होती.

ठळक मुद्देधारणी पंचायत समिती : २ ते ३ कोटींच्या कामांबाबत मंत्रालयापर्यंत तक्रारी, देयके थांबविली

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात आलेल्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत सुमारे २ ते ३ कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याच्या तक्रारी मंत्रालयातपर्यंत करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने ती देयके थांबविण्यात आली असली तरी पैकी काही कंत्राटदार राजकीय दबावतंत्राचा वापर करुन देयक काढत असल्याची माहिती हाती आली आहे.धारणी तालुक्यात दोन-तीन वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनत अकुशल कामे केल्यानंतरच कुशल कामे करण्याचे प्रावधान असताना अकुशल कामे न करता थेट कुशल कामे करून त्या कामाची देयके काढण्याची धडपड सुरू झाली आहे. दोन ते तीन कोटी रुपयांचा हा घोटाळा झाल्याची तक्रार विविध संघटना आणि आमदारांनी केल्यामुळे देयके थांबविण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार नाशिक येथून सूत्रे हलवून देयके काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यापैकी काही देयके काढल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.ग्रामीण भागातील नागरिकांना उपजिविका चालविण्यासाठी पाच किलोमीटर परिसरात कामे उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत धारणी पंचायत समितीने शेतरस्त्यांची जाळे ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत विणले आहे. असे करीत असताना अकुशल कामे झालेल्या कामावरच कुशल कामे करण्याचे साधारण नियम असताना हेतुपुरस्सर बगल देऊन ग्रामसेवक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी चिरीमिरी देऊन कोट्यवधी रुपयांची कुशल कामे मंजूर करून घेतले.कुशल कामात अनियमितता झाल्याच्या तक्रारीमुळे दोन वर्षांपासून देयके थांबविण्यात आली होती. मात्र, आता ही देयके काढण्यासाठीची हालचाल तीव्र झाली आहे. अकुशल कामे न करता कुशल कामे करण्यात आलेल्या अनेक कामांची तक्रार जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना देण्यात आली होती. त्यानंतरही स्थानिक अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन देयके काढण्यात येत आहेत, अशी माहिती आहे.स्थानिक अधिकाऱ्यांचे हात ओले ?या कामामध्ये कोट्यवधींची देयके बोगस बिले दाखल करून काढण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले असतानाही देयकांची रक्कम कोणत्या नियमानुसार दिली, असा सवाल ग्रामीण स्तरांमधील जनता विचारत आहे. याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.धारणी तालुक्यात ४८ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ५५ कामे झालेली आहेत. पैकी फक्त राजपूर ग्रामपंचायतीची देयके काढण्यात आली असून इतर कामे चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यामुळे या कामांचे देयकाबाबत अंतिम निर्णय मनरेगाचे आयुक्त घेतील.- संजय काळे,गटविकास अधिकारी

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती