शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

ग्रामीण भागातील आर्थिक घडी विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:12 IST

अमरावती : ग्रामीण भागातील वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाकडून गत काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात ...

अमरावती : ग्रामीण भागातील वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाकडून गत काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सर्वत्र केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील किराणा, भाजीपाला यासह हॉटेल, दूध डेअरींना १५ ते २२ मार्चपर्यंत टाळे लागले होते. याशिवाय अन्य व्यवसाय तर बंद आहेत. परिणामी ग्रामीण भागातील सर्वच व्यवहार पूर्णत: विस्कळीत झाले आहे.

लॉकडऊन व संचारबंदीमुळे पंधरा दिवस बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल तसेच भाजीपाला विक्री करता आला नाही. परिणामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची धामधूम आर्थिक अडचणीमुळे रखडून पडली होती. अशातच कापड, बिल्डींग मटेरियल, जनरल स्टोअर व अन्य छोटे मोठे व्यवसाय तर बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक घडी कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटामुळे अजूनच विस्कळीत झाली आहे. गावपातळीवर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावात सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी आदींच्या नेतृत्वाखाली ग्रामस्तरीय दक्षता समिती कार्यरत आहे. या समितीला गावस्तरावर विनामास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकारी प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रभावी अंमलबजावणी होत असली तरी कोरोनाचे रुग्ण मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागातच अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. त्याशिवाय रुग्णही कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकणार नाही. पर्यायाने विस्कळीत झालेली आर्थिक घडीही रूळावर येऊ शकणार नाही.

बॉक्स

दंडात्मक कारवाईचा बडगा

कुठलेही कारण नसताना विनाकारण घेणाऱ्यांवर तसेच चौकात उभे राहून गर्दी करणाऱ्यावर ग्राम दक्षता समितीमार्फत ‘वॉच’ ठेवला जात आहे. या समितीला दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. त्यानुसार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.