शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

ग्रामीण भागातील आर्थिक घडी विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:12 IST

अमरावती : ग्रामीण भागातील वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाकडून गत काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात ...

अमरावती : ग्रामीण भागातील वाढती कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासन व प्रशासनाकडून गत काही दिवसांपासून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता, कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सर्वत्र केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील किराणा, भाजीपाला यासह हॉटेल, दूध डेअरींना १५ ते २२ मार्चपर्यंत टाळे लागले होते. याशिवाय अन्य व्यवसाय तर बंद आहेत. परिणामी ग्रामीण भागातील सर्वच व्यवहार पूर्णत: विस्कळीत झाले आहे.

लॉकडऊन व संचारबंदीमुळे पंधरा दिवस बाजार समित्या बंद होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल तसेच भाजीपाला विक्री करता आला नाही. परिणामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची धामधूम आर्थिक अडचणीमुळे रखडून पडली होती. अशातच कापड, बिल्डींग मटेरियल, जनरल स्टोअर व अन्य छोटे मोठे व्यवसाय तर बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक घडी कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटामुळे अजूनच विस्कळीत झाली आहे. गावपातळीवर कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावात सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी आदींच्या नेतृत्वाखाली ग्रामस्तरीय दक्षता समिती कार्यरत आहे. या समितीला गावस्तरावर विनामास्क फिरणारे, गर्दी करणाऱ्यावर कारवाई करण्याचे अधिकारी प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागातील प्रभावी अंमलबजावणी होत असली तरी कोरोनाचे रुग्ण मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागातच अधिक आढळून येत आहेत. त्यामुळे शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे. त्याशिवाय रुग्णही कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळू शकणार नाही. पर्यायाने विस्कळीत झालेली आर्थिक घडीही रूळावर येऊ शकणार नाही.

बॉक्स

दंडात्मक कारवाईचा बडगा

कुठलेही कारण नसताना विनाकारण घेणाऱ्यांवर तसेच चौकात उभे राहून गर्दी करणाऱ्यावर ग्राम दक्षता समितीमार्फत ‘वॉच’ ठेवला जात आहे. या समितीला दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत. त्यानुसार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.