शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मिठाई खा, पण जरा जपून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 22:23 IST

गुरुवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. उत्सव काळात चवदार मिठाईला मागणी वाढल्याने ती पूर्ण करण्यासाठी भेसळीची शक्यतासुद्धा वाढली आहे.

ठळक मुद्देभेसळीची शक्यता : कमी दर्जाच्या खव्याचा वापर

संदीप मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुरुवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. उत्सव काळात चवदार मिठाईला मागणी वाढल्याने ती पूर्ण करण्यासाठी भेसळीची शक्यतासुद्धा वाढली आहे.उत्सवाच्या काळात ग्राहकांकडून होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी परराज्यातून खवा अमरावतीत दरवर्षी दाखल होतो. मिठाईमध्ये रासायनिक रंग व विविध पदार्थांची भेसळ होण्याची शक्यता असते, तसेच हलक्या दर्जाची मिठाई किंवा पदार्थ ग्राहकांच्या माथी मारला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे चवदार मिठाई सेवन करताना नागरिकांनी योग्य खबरदारी बाळगणे गरजेचे असते.जिल्ह्यात एकूण १२६ परवानाधारक हॉटेल, तसेच २६२ रेस्टॉरंट-हॉटेल आहेत. ५६६ लहान-मोठे नोंदणीकृत हॉटेल जिल्ह्यात कार्यरत आहेत. या यामधील शेकडो हॉटेलमध्ये विविध प्रकारची मिठाई विक्री होत आहे.एका लीटर दुधामधून २०० ग्रॅम खवा तयार होतो. म्हणजे, एक किलो खव्यासाठी पाच लीटर दुधाची आवश्यकता असते. एका हॉटेलमध्ये या दिवसांची सरासरी २५ किलो मिठाई एका दिवसांत विक्री होत आहे. म्हणजे शहरात दिवसाकाठी सरासरी १५००० किलो मिठाई विक्री होते. ही मिठाई तयार करण्यासाठी सरासरी ७५ हजार लीटर दुधाची गरज भासते. अमरावती व यवतमाळ जिल्हा दुग्ध संघांकडून साडेचार हजार लीटर दुधाची आवक नोंदविली गेली, तर मदर डेअरी, यशोदा व खासगी दुग्ध पुरवठादारांच्या माध्यमातून २६ हजार लीटर दूध संकलित करून ते जिल्ह्यातील नागरिक व हॉटेल चालकांपर्यंत पोहचविले जाते तसेच अनोंदणीकृत खासगी किरकोळ दुग्ध उत्पादकांकडूनही हजारो लीटर दूध बाजारात येते. तरीही मागणीएवढा खवा तयार करण्याइतपत दुधाची पूर्तता अमरावती जिल्ह्यातून होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. यामुळे मिठाईमध्ये विविध प्रकारची भेसळ असण्याची शक्यता असते. जिल्ह्यातील हॉटेलचालकांना बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातून हजारो किलो खवा येत असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागातून किंवा इतर जिल्ह्यातून येणाऱ्या खव्याकडे अन्न सुरक्षा अधिकाºयांनी लक्ष घालणे गरजेचे असते.अशी ओळखा भेसळभेसळ ही अनेक प्रकारची असू शकते. मिठाई म्हणून आपण गोड विष तर खात नाही ना, याची खबरदारी नागरिकांनी घेतली पाहिजे.विक्रीसाठी ठेवलेल्या अनेक पदार्थांवर लेबल किंवा इतर गोष्टी नियमानुसार दिसल्या नाहीत, तर यामध्ये भेसळयुक्त पदार्थ असू शकतात.प्रथम खव्याचा जवळून सुगंध घ्यावा. खव्यात चिकटपणा नसल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता आहे.खव्याचा तुकडा घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास त्यात मेटॅनिल यलो रंगाची भेसळ असल्याचे समजावे.खव्याचे पदार्थ खरेदी केल्यापासून २४ तासांत, तर बंगाली मिठाई आठ ते दहा तासांत खावी, असे मिठाईच्या बॉक्सवर नमूद आहे काय हे पहावे.ग्राहकांना मिठाईमध्ये भेसळ आढळली किंवा फसवणूक झाली, तर प्रथम ग्राहकांनी अन्न प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. यानंतर ग्राहक न्यायालयात जाण्याचासुद्धा मार्ग मोकळा आहे. पण, या ठिकाणी नेमकी शरीराची कशी हानी झाली किंवा काय नुकसान झाले, यासंदर्भात त्यांना आपली बाजू मांडणे गरजेचे आहे.- डॉ. अजय गाडे, संघटनमंत्री,अखिल भारतीय ग्राहक पंचायतमुळात मिठाई आणि मिठाईचे मिश्र प्रकारच आरोग्यास हानीकारक आहेत. मिठाई भेसळयुक्त आणि रासायनिक रंगयुक्त असेल तर हगवण, अस्थमा आणि कर्करोगही होऊ शकतो. सण साजरे करा; पण आरोग्याची काळजीही घ्या.- डॉ. अतुल यादगिरे,कर्करोग तज्ज्ञ,अमरावती