शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

तापी नदी प्रदेशातील भूस्तरीय हालचालींमुळे मेळघाटात भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:17 IST

तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ‘आयएमडी’शी सातत्याने संपर्क

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडीसह आजूबाजूच्या चार गावांना मंगळवारी रात्री अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यापूर्वी १७ आॅगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर बुधवारी रात्रीही भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती पुढे आली आहे. भूकंपाच्या धक्क््यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दरम्यान, भूकंपाबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी २१ आॅगस्टला हवामानशास्त्र विभागाच्या राज्यस्तरीय चमूला माहिती दिली आणि नेमकी स्थिती समजून घेतली. परत भूकंप होणार की काय, याबाबत सांगणे शक्य नाही. याबाबत मार्गदर्शन व भूस्तरीय हालचालींच्या सद्यस्थितीबाबत माहिती मागितल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रकरणी राज्यस्तरावर संबंधित यंत्रणेला कळविल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.तापीचा भूप्रदेश संवेदनशीलमेळघाटातून वाहणाऱ्या तापी नदीच्या भूप्रदेशात साद्राबाडी हे गाव वसले आहे. तापी नदीच्या परिसरातील भूगर्भातील ज्या प्लेट्स आहेत, त्यात हालचाली होत आहेत. त्याच्यामुळे या भागात भूकंपाचे धक्के जाणवतात.म्हणून झाली नाही नोंद!भूकंपाची तीव्रता अडीच रिश्टर स्केलपेक्षा जास्त असेल, तरच भूकंपमापक केंद्रावर त्याची नोंद होते. त्यामुळे २१ आॅगस्टला झालेल्या भूकंपाची नोंद झालेली नाही, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर केंद्राचा अहवाल असल्याचे धारणीचे तहसीलदार अभिजित गांजरे यांनी जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.नागरिकांनी भूकंपाच्या वेळी त्यांना काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देणे गरजेचे आहे. भूकंपाची तीव्रता किती आहे, भूकंपाबाबत भाकित होऊ शकते का, याची माहिती आम्ही आयएमडीकडून मागवित आहोत. ती उपलब्ध होताच उपाययोजना त्वरेने केल्या जातील.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी