शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

तापी नदी प्रदेशातील भूस्तरीय हालचालींमुळे मेळघाटात भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:17 IST

तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ‘आयएमडी’शी सातत्याने संपर्क

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडीसह आजूबाजूच्या चार गावांना मंगळवारी रात्री अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यापूर्वी १७ आॅगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर बुधवारी रात्रीही भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती पुढे आली आहे. भूकंपाच्या धक्क््यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दरम्यान, भूकंपाबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी २१ आॅगस्टला हवामानशास्त्र विभागाच्या राज्यस्तरीय चमूला माहिती दिली आणि नेमकी स्थिती समजून घेतली. परत भूकंप होणार की काय, याबाबत सांगणे शक्य नाही. याबाबत मार्गदर्शन व भूस्तरीय हालचालींच्या सद्यस्थितीबाबत माहिती मागितल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रकरणी राज्यस्तरावर संबंधित यंत्रणेला कळविल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.तापीचा भूप्रदेश संवेदनशीलमेळघाटातून वाहणाऱ्या तापी नदीच्या भूप्रदेशात साद्राबाडी हे गाव वसले आहे. तापी नदीच्या परिसरातील भूगर्भातील ज्या प्लेट्स आहेत, त्यात हालचाली होत आहेत. त्याच्यामुळे या भागात भूकंपाचे धक्के जाणवतात.म्हणून झाली नाही नोंद!भूकंपाची तीव्रता अडीच रिश्टर स्केलपेक्षा जास्त असेल, तरच भूकंपमापक केंद्रावर त्याची नोंद होते. त्यामुळे २१ आॅगस्टला झालेल्या भूकंपाची नोंद झालेली नाही, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर केंद्राचा अहवाल असल्याचे धारणीचे तहसीलदार अभिजित गांजरे यांनी जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.नागरिकांनी भूकंपाच्या वेळी त्यांना काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देणे गरजेचे आहे. भूकंपाची तीव्रता किती आहे, भूकंपाबाबत भाकित होऊ शकते का, याची माहिती आम्ही आयएमडीकडून मागवित आहोत. ती उपलब्ध होताच उपाययोजना त्वरेने केल्या जातील.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी