शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

तापी नदी प्रदेशातील भूस्तरीय हालचालींमुळे मेळघाटात भूकंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:17 IST

तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती : ‘आयएमडी’शी सातत्याने संपर्क

इंदल चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉजिकल डिपार्टमेंट -भारतीय हवामानशास्त्र विभाग) च्या नागपूर येथील शास्त्रज्ञांच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले.मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडीसह आजूबाजूच्या चार गावांना मंगळवारी रात्री अडीच वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. त्यापूर्वी १७ आॅगस्ट रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर बुधवारी रात्रीही भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे साद्राबाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह काही घरांच्या भिंतींना तडे गेल्याची माहिती पुढे आली आहे. भूकंपाच्या धक्क््यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दरम्यान, भूकंपाबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी २१ आॅगस्टला हवामानशास्त्र विभागाच्या राज्यस्तरीय चमूला माहिती दिली आणि नेमकी स्थिती समजून घेतली. परत भूकंप होणार की काय, याबाबत सांगणे शक्य नाही. याबाबत मार्गदर्शन व भूस्तरीय हालचालींच्या सद्यस्थितीबाबत माहिती मागितल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याप्रकरणी राज्यस्तरावर संबंधित यंत्रणेला कळविल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.तापीचा भूप्रदेश संवेदनशीलमेळघाटातून वाहणाऱ्या तापी नदीच्या भूप्रदेशात साद्राबाडी हे गाव वसले आहे. तापी नदीच्या परिसरातील भूगर्भातील ज्या प्लेट्स आहेत, त्यात हालचाली होत आहेत. त्याच्यामुळे या भागात भूकंपाचे धक्के जाणवतात.म्हणून झाली नाही नोंद!भूकंपाची तीव्रता अडीच रिश्टर स्केलपेक्षा जास्त असेल, तरच भूकंपमापक केंद्रावर त्याची नोंद होते. त्यामुळे २१ आॅगस्टला झालेल्या भूकंपाची नोंद झालेली नाही, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर केंद्राचा अहवाल असल्याचे धारणीचे तहसीलदार अभिजित गांजरे यांनी जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.नागरिकांनी भूकंपाच्या वेळी त्यांना काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देणे गरजेचे आहे. भूकंपाची तीव्रता किती आहे, भूकंपाबाबत भाकित होऊ शकते का, याची माहिती आम्ही आयएमडीकडून मागवित आहोत. ती उपलब्ध होताच उपाययोजना त्वरेने केल्या जातील.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी