शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

प्रथमेशच्या पायाखालची उचलली होती माती !

By admin | Updated: August 21, 2016 23:53 IST

नरबळीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयीपणे गळा चिरणाऱ्या सुरेंद्रने अघोरी पुजेसाठी घटनेच्या सात दिवसांपूर्वीच प्रथमेशच्या पायाखालची माती उचलली होती.

'सावजा'वर नजर : गळा चिरल्यावर रक्तात कालवून केली पूजाअमरावती : नरबळीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयीपणे गळा चिरणाऱ्या सुरेंद्रने अघोरी पुजेसाठी घटनेच्या सात दिवसांपूर्वीच प्रथमेशच्या पायाखालची माती उचलली होती. श्री संत शंकर महाराज मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतिगृहात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक करण्याची जबाबदारी ज्याच्यावर सोपविण्यात आली होती, तो अंधश्रद्धाळू सुरेंद्र शांत डोक्याने प्रथमेशच्या मागावर होता. कुणाच्यातरी पोटचा गोळा असलेला गोंडस प्रथमेश हा सुरेंद्रसाठी केवळ बळी देण्यासाठीचे चालते बोलते सावज होता. कसायाच्या गोठ्यातील खुंटीला बांधलेला बकरा जसा गरज पडेल तेव्हा कापला जाण्यासाठीच असतो, तसाच आश्रम परिसरात खेळणारा-बागडणारा प्रथमेश बळी देण्यासाठीच राखून ठेवला आहे, असा दृष्टिकोन सुरेंद्रचा होता. योग्य दिवशी नरबळी देण्यापूर्वी अघोरी विद्येच्या देवतेला हा प्रसाद प्रसन्न करणारा ठरावा, यासाठी तो प्रथमेशवर मंत्रतंत्र आजमावत होता.प्रथमेशच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवून असलेल्या सुरेंद्रने प्रथमेश आश्रम परिसरात वावरत असताना त्याच्या पायाखालची माती उचलली होती. प्रथमेशचा स्पर्श झालेली माती विशिष्ट पद्धतीने भारली गेली तर त्याचा परिणाम प्रथमेशवर होतो, अशी अंधश्रद्धा सुरेंद्रची होती. घटनेच्या अर्थात् नागपंचमीच्या सातेक दिवसांपूर्वी सुरेंद्रने ही माती गोळा केली होती. त्या मातीची त्याने त्याचा विश्वास असलेल्या विधीप्रमाणे पूजा केली. काळी विद्या प्रदान करणाऱ्या देवतेला आवाहन करून करण्यात आलेली ही अघोरी पुजा नरबळी कबूल व्हावा आणि शक्तीप्राप्ती व्हावी, यासाठी होती. नागपंचमीच्या दिवशी प्रथमेशचा गळा तीनवेळा ब्लेड फिरवून चिरल्यानंतर प्रथमेशच्या शरीरातून जे रक्त निघाले, त्या रक्ताने सुरेंद्रने अंग माखलेच शिवाय प्रथमेशच्या पायाखालची जी माती त्याने मंत्रोच्चाराने भराल्याची त्याची अंधश्रद्धा होती, त्या मातीतही ते रक्त मिसळले. रक्त मातीत कालवल्यानंतर त्या मातीची त्याने पुन्हा विधीनुसार पूजा केली. विशिष्ट मंत्रांचे उच्चारण करून त्याने त्याच्या अघोरी देवतेच्या जागरणाचे आवाहन केले. कुठल्याही भयाविना त्याने शंकर महाराजांच्या आश्रम परिसरात हे कृत्य केले. सर्वांचाच राबता तरीही नरबळी !सुरेंद्र हा प्रथमेशवर लक्ष ठेवून होता. माती गोळा करणे, त्यावर पूजा करणे आदी प्रकार तो त्याच्या आश्रम परिसरातील अधिकृत वास्तव्यादरम्यान करीत होता. सामान्यपणे कुणी त्याच्या कार्याशिवाय इतर कार्यात सातत्याने सक्रीयरीत्या सहभागी असेल तर ती बाब काही दिवसांत लक्षात येते. त्यालाच प्रशासन, व्यवस्थापन असे म्हणतात. येथे तर सुरेंद्र नरबळीसाठी झपाटलेला होता. त्याचे वागणे अर्थात्च खटकणारे, लक्ष वेधणारे असणार! आश्रमात अनेक भक्तांचा नियमित वावर असतो. शिक्षक आणि देखरेख करणाऱ्यांचाही वावर नेहमीचाच. सुरेंद्रचे हे वगणे यापैकी कुणाच्याच कसे लक्षात आले नाही? वसतिगृह प्रशासन, आश्रम प्रशासन आणि व्यस्थापन यांनाही ते कसे हेरता आले नाही ?