शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

‘ई-टेंडरिंग’ने जीव गुदमरतोय

By admin | Updated: July 10, 2017 00:03 IST

राज्य शासनाच्या निर्णयानुसार तीन लाखांवरील सर्व खर्चासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे अनिवार्य आहे.

कुलगुरुंचे आदेश गुंडाळले : ‘ई-पोर्टल’वरच निविदा प्रक्रिया राबविणे सुरुलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या निर्णयानुसार तीन लाखांवरील सर्व खर्चासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे अनिवार्य आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने मुलींच्या वसतिगृहाची विद्युत कामे आणि दुरूस्ती ई-निविदांऐवजी वेबपोर्टलवर मागविल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा ‘ई-निविदा’ने जीव गुदमरत नाही ना, असे म्हणण्याचा प्रसंग ओढवला आहे.शासकीय, प्रशासकीय कार्यालय असो वा स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये तीन लाखांच्या खर्चाची निविदा ही ‘ई-टेंडरिंग’द्वारेच मागविली जाते. परंतु एकमात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे ई-निविदा राबविण्यास वेगळेच कारण दर्शवून यातून ‘अर्थकारण’ शोधत आहे. ई-निविदा राबविल्यास राज्य शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड होऊन निविदेसाठी स्पर्धा होईल. त्यामुळे विद्यापीठात उत्तम दर्जाचे कंत्राटदार, एजन्सी कामांसाठी येतील. परंतु विद्यापीठ प्रशासनाला ई-निविदेची अ‍ॅलर्जी का, हा संशोधनाचा विषय आहे. राज्यातील अन्य विद्यापीठांमध्ये ई-निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. याला केवळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अपवाद असल्याचे दिसून येते. यापूर्वी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी एप्रिल २०१७ पासून विद्यापीठात तीन लाखांवरील सर्व आर्थिक व्यवहारासाठी ई-निविदा राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. तथापि जून २०१७ नुसार निविदा सूचना क्रमांक १२/२०१७ अन्वये ही निविदा विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेतून मुलींच्या वसतिगृहाची विद्युत व दुरूस्तीची कामे करण्याचे नमूद आहे. कामांची अंदाजित रक्कम ही ३.६४.४७२ इतकी आहे. ही निविदा १७ जुलै २०१७ रोजी निविदा समिती समोर उघडली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार तीन लाखांवरील कामांची प्रक्रिया ई-निविदेतून व्हावी, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उच्चशिक्षितांचा भरणा असलेल्या विद्यापीठात ई-निविदा का राबविली जात नाही, हे कळायला मार्ग नाही. यापूर्वी ई-निविदा न राबविता वेबपोर्टलचा आधार घेत आॅनलाईन परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामांसाठी बंगळूरु येथील माइंड लॉजिक एजन्सीकडे कंत्राट सोपविण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे. त्यामुळे परीक्षा विभागात आजही आॅनलाईन निकालाची समस्या कायम आहे. परीक्षा आटोपूनही निकाल लागत नाही. विद्यापीठात ‘अर्थकारणा’साठी अधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबांच्या नावालाच काळीमा फासल्याचे ‘ई-टेंडरिंग’ प्रक्रियेला डावलल्यावरुन दिसून येते.‘ई-टेंडरिंग’साठी तंत्रज्ञ एजन्सी मिळेना विद्यापीठाला ‘ई-टेंडरींग’ प्रक्रिया राबविण्यासाठी तंत्रज्ञ एजन्सी मिळत नसल्याचा जावईशोध लावण्यात आला आहे. विद्यापीठात प्रगत, अद्ययावत अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जात असताना ‘ई-टेंडरिंग’साठी एजन्सी मिळू नये, ही आश्चर्यकारक बाब मानली जात आहे. तीन लाखांवरील व्यवहारासाठी ‘ई-टेंडरिंग’ होऊ नये, यामागे कोणाचे सुपीक डोके आहे, हे सुद्धा महत्त्वाचे ठरते.