शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

‘ई-टेंडरिंग’ने जीव गुदमरतोय

By admin | Updated: July 10, 2017 00:03 IST

राज्य शासनाच्या निर्णयानुसार तीन लाखांवरील सर्व खर्चासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे अनिवार्य आहे.

कुलगुरुंचे आदेश गुंडाळले : ‘ई-पोर्टल’वरच निविदा प्रक्रिया राबविणे सुरुलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या निर्णयानुसार तीन लाखांवरील सर्व खर्चासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविणे अनिवार्य आहे. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने मुलींच्या वसतिगृहाची विद्युत कामे आणि दुरूस्ती ई-निविदांऐवजी वेबपोर्टलवर मागविल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाचा ‘ई-निविदा’ने जीव गुदमरत नाही ना, असे म्हणण्याचा प्रसंग ओढवला आहे.शासकीय, प्रशासकीय कार्यालय असो वा स्थानिक स्वराज्य संस्था यामध्ये तीन लाखांच्या खर्चाची निविदा ही ‘ई-टेंडरिंग’द्वारेच मागविली जाते. परंतु एकमात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ हे ई-निविदा राबविण्यास वेगळेच कारण दर्शवून यातून ‘अर्थकारण’ शोधत आहे. ई-निविदा राबविल्यास राज्य शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड होऊन निविदेसाठी स्पर्धा होईल. त्यामुळे विद्यापीठात उत्तम दर्जाचे कंत्राटदार, एजन्सी कामांसाठी येतील. परंतु विद्यापीठ प्रशासनाला ई-निविदेची अ‍ॅलर्जी का, हा संशोधनाचा विषय आहे. राज्यातील अन्य विद्यापीठांमध्ये ई-निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. याला केवळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अपवाद असल्याचे दिसून येते. यापूर्वी कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी एप्रिल २०१७ पासून विद्यापीठात तीन लाखांवरील सर्व आर्थिक व्यवहारासाठी ई-निविदा राबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. तथापि जून २०१७ नुसार निविदा सूचना क्रमांक १२/२०१७ अन्वये ही निविदा विद्यापीठाच्या वेबपोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदेतून मुलींच्या वसतिगृहाची विद्युत व दुरूस्तीची कामे करण्याचे नमूद आहे. कामांची अंदाजित रक्कम ही ३.६४.४७२ इतकी आहे. ही निविदा १७ जुलै २०१७ रोजी निविदा समिती समोर उघडली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार तीन लाखांवरील कामांची प्रक्रिया ई-निविदेतून व्हावी, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. उच्चशिक्षितांचा भरणा असलेल्या विद्यापीठात ई-निविदा का राबविली जात नाही, हे कळायला मार्ग नाही. यापूर्वी ई-निविदा न राबविता वेबपोर्टलचा आधार घेत आॅनलाईन परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ कामांसाठी बंगळूरु येथील माइंड लॉजिक एजन्सीकडे कंत्राट सोपविण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली आहे. त्यामुळे परीक्षा विभागात आजही आॅनलाईन निकालाची समस्या कायम आहे. परीक्षा आटोपूनही निकाल लागत नाही. विद्यापीठात ‘अर्थकारणा’साठी अधिकाऱ्यांनी संत गाडगेबाबांच्या नावालाच काळीमा फासल्याचे ‘ई-टेंडरिंग’ प्रक्रियेला डावलल्यावरुन दिसून येते.‘ई-टेंडरिंग’साठी तंत्रज्ञ एजन्सी मिळेना विद्यापीठाला ‘ई-टेंडरींग’ प्रक्रिया राबविण्यासाठी तंत्रज्ञ एजन्सी मिळत नसल्याचा जावईशोध लावण्यात आला आहे. विद्यापीठात प्रगत, अद्ययावत अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जात असताना ‘ई-टेंडरिंग’साठी एजन्सी मिळू नये, ही आश्चर्यकारक बाब मानली जात आहे. तीन लाखांवरील व्यवहारासाठी ‘ई-टेंडरिंग’ होऊ नये, यामागे कोणाचे सुपीक डोके आहे, हे सुद्धा महत्त्वाचे ठरते.