शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अमरावतीत धावणार ई-रिक्षा

By admin | Updated: September 8, 2016 00:17 IST

मुंबई आणि रायगड जिल्हा वगळता आता राज्यभरात ई-रिक्षा धावताना दिसतील.

शासनाचा निर्णय : नियमावली जाहीरअमरावती : मुंबई आणि रायगड जिल्हा वगळता आता राज्यभरात ई-रिक्षा धावताना दिसतील. यात अमरावतीचाही समावेश आहे. याशिवाय विभागातील बुलडाणा, अकोला या दोन शहरांमध्ये ई-रिक्षांना प्रायोगिक तत्वावर परवानगी दिल्यानंतर आता राज्य शासनाने उर्वरित जिल्ह्यातही ई-रिक्षांना परवानगी दिली आहे. केंद्रशासनाने ई-रिक्षाबाबत धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार दिल्लीत ई-रिक्षाचा प्रयोग राबविण्यात आला. तो यशस्वीही झाला. त्यामुळे या रिक्षांना अन्य राज्यातही परवानगी देण्यात आली. दिल्ली प्रमाणेच ई-रिक्षांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. गृहविभागाने ई-रिक्षांच्या परवान्यासाठी निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार ई-रिक्षाचालकाला स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांना स्थानिक परिसराची माहिती असणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना व सार्वजनिक वाहतूक करण्याचा परवाना (बॅच) असावा. परवानाधारकाकडे पंधरा वर्षांच्या वास्तव्याचा दाखला असावा. रिक्षाचालकाला त्याचे नाव आणि नंबरसहित छोटा फलक लावावा लागणार आहे. ई-रिक्षांना आॅटोरिक्षाप्रमाणे शहराच्या कोणत्याही भागात प्रवास करता येणार नाही. दिलेल्या मार्गावरच प्रवासी वाहतूक करण्याचे बंधन त्याच्यावर राहणार आहे.परवाने कोणाला मिळणार ?केवळ सायकलरिक्षा चालविणाऱ्या चालक व मालकांना ई-रिक्षाचे परवाने देण्यात यावेत, तशी तरतूद नियमावलीत केली आहे. बहुतांश जिल्ह्यातून सायकलरिक्षा हद्दपार झाल्या आहेत. अमरावतीतही फार वर्षापूर्वीच सायकल रिक्षा बंद झाल्यात. त्यामुळे ई-रिक्षाचे परवाने कोणाला दिले जाणार, अमरावतीत या रिक्षा धावू शकणार का, हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.महत्त्वाचे मुद्देई-रिक्षामध्ये चार प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.या रिक्षाला इलेक्ट्रॉनिक मीटर लावणे सक्तीचे असेल.रिक्षातून ४० किलोपर्यंतच्या वजनाच्या वस्तुंची वाहतूक करता येईल.आरटीओकडून दरनिश्चिती केली जाणार आहे.