शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

 ई-ऑफिस’ प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी बनली युजर फ्रेंडली; झेडपीत पहिल्या टप्प्यात दोन विभागाचे कामकाज ऑनलाइन

By जितेंद्र दखने | Updated: October 26, 2023 19:42 IST

केंद्र व राज्य शासनाच्या विविध पायलट प्रोजेक्टसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविले जातात.

अमरावती: केंद्र व राज्य शासनाच्या विविध पायलट प्रोजेक्टसह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषदेच्या अंतर्गत राबविले जातात. माहिती तंत्रज्ञानाच्या जमान्यात आता जिल्हा परिषदेने आपला कारभार पेपरलेस करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सीईओ अविश्यांत पंडा यांच्या पुढाकारातून सामान्य प्रशासन व पंचायत विभागाचे पहिल्या टप्प्यात प्रशासकीय कामकाज ई-ऑफिस’ प्रणालीद्वारे सुरू केले आहेत. विशेष म्हणजे ई-ऑफिस’ प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी बनली युजर फ्रेंडली बनली असून यामुळे कोणती फाइल कोणत्या टप्प्यावर आहे ही लगेच माहितीसुद्धा मिळत आहे. ऑनलाइन कामकाजामुळे जिल्हा परिषद हायटेक होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.

एकविसाव्या शतकामध्ये माहिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तंत्रज्ञान हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. माहिती तंत्रज्ञान जगासाठी वरदान सिद्ध होत आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर आजी आजोबापर्यंत तंत्रज्ञानाच्या उपकरणाचा वापर करताना दिसत आहेत. झेडपी सीईओंनी आपल्या स्वत:च्या कार्यालयात‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केला होता. यानंतर आता सीईओ अविश्यांत पंडा व सामान्य प्रशासनचे डेप्युटी सीईओ गिरीश धायगुडे यांच्या प्रयत्नाने सामान्य प्रशासन विभाग व पंचायत विभाग या विभागाची कामकाज शंभर टक्के ई-ऑफिस’ प्रणालीद्वारे सुरू केले आहे. यामुळे जीएडी व पंचायत विभागातील ही ई-ऑफिस’ प्रणाली कर्मचाऱ्यांसाठी युजर फ्रेंडली बनली आहे. या प्रणालीमुळे कोणती फाइल कोणत्या टप्प्यावर आहे याची माहिती लगेच मिळते. या प्रणालीमुळे फाइल गहाळ होत नाही व कोणत्याही फाइलला विलंबसुद्धा करता येत नाही. सदर प्रणाली सर्व विभागात सुरू करण्याचा येत्या महिन्यात जिल्हा परिषद प्रशासनाद्वारे सुरू केली जाणार आहे. कार्यालयांमध्ये ‘ई-ऑफिस’ प्रणालीचा वापर सुरू केल्यास कामकाजाला गती येईल, शिवाय सध्या दोन विभागाचे कामकाज संपूर्णपणे कागदविरहित (पेपरलेस) होत असल्याने अधिक सुलभता येणार आहे, येत्या महिनाभरात झेडपीच्या सर्व विभागात ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरू केली जाणार आहे. - अविश्यांत पंडा, मुख्यकार्यकारी अधिकारी १०० टक्के ऑनलाइन कामकाजावर भरआगामी काही महिन्यात जिल्हा परिषदेतील कामकाज १०० टक्के काम हे ऑनलाइन करण्याचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मानस आहे. पहिल्या दोन विभागाचे कामकाज टप्प्यात ई-ऑफिस, प्रणालीद्वारे सुरू केले आहे. उर्वरित सर्व विभागाचे कामकाजही ई-ऑफिस, प्रणालीद्वारे सुरू केले जाणार आहे. 

टॅग्स :Amravatiअमरावती