शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

तिवस्यातील घरकुलासाठी ई-क्लासची जागा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 22:55 IST

प्रधानमंत्री आवास योजनेत नाव, मात्र जागा नसलेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना ई-क्लास जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यासह इतरही विषयांवर आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर त्रिसदस्यीय समितीचा तोडगा काढला आहे.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, त्रिसदस्यीय समिती स्थापन

तिवसा : प्रधानमंत्री आवास योजनेत नाव, मात्र जागा नसलेल्या तिवसा नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल लाभार्थींना ई-क्लास जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यासह इतरही विषयांवर आ. यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर त्रिसदस्यीय समितीचा तोडगा काढला आहे.लाभार्थींना ई-क्लास जमिनीतून जागा व ओबीसींना घरकुल मिळण्याबाबत आ. यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पंचायत समिती अंतर्गत संबंधित ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन संबंधित लाभार्थींना घरकुलासाठी जागा उपलब्ध करण्यात येईल, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले. त्वरेने प्रकरणाचा निपटारा होण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, व खंडविकास अधिकारी यांची समिती स्थापित करण्यात आली आहे.तिवसा येथील नवीन पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकासंदर्भात मजीप्राच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. अमरावती तालुक्यातील वाघोलीच्या ६० लाभार्थींनादेखील ई-क्लासची जागा उपलब्ध करण्याची मागणी आ. ठाकूर यांनी केली. गुरुकुंजात स्मशानभूमी रस्त्याच्या दुरुस्तीकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावेळी वैभव वानखडे, लुकेश केने, मुकंद देशमुख, बबलू मक्रमपूरे, प्रशांत काळबांडे, पंकज साखरकर, संदीप झाडोकर, पवन काळमेघ, विवेक तायडे, रोशन वानखडे उपस्थित होते.