शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वर्षभरात झेडपी सर्कलच्या विकासकामांची पाटी कोरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:19 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला नुकतीच वर्षपूर्ती झाली. मात्र, वर्षभरात सदस्यांना किरकोळ निधी मिळाल्याने मतदार संघात विकासकामांची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे अपेक्षेने निवडून दिलेल्या नवख्या सदस्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकसा होईल विकास? : तिजोरीत पैसेच नसल्याने नवी कामे होईनात

जितेंद्र दखने।आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला नुकतीच वर्षपूर्ती झाली. मात्र, वर्षभरात सदस्यांना किरकोळ निधी मिळाल्याने मतदार संघात विकासकामांची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे अपेक्षेने निवडून दिलेल्या नवख्या सदस्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शासनाकडून निधी मिळाला मात्र मागील सत्ताकाळातील विकासकामांचे दायीत्व अधिक असल्याने यातून कामे करता आली नाहीत.विकासाच्या आश्वासनावर निवडून आलेल्या सदस्यांना वर्षपूर्तीनंतर पदरात काहीच पडले नसल्याची भावना आहे.अशातच आता मुद्रांक शुल्काचा निधी व व्याजातून मिळालेली रक्कम यामधून विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. मात्र यातही विरोध आङकाठी आणत असल्याचे सत्ताधाºयांचे म्हणणे आहे.झेडपीच्या उत्पादनातून शासनाला दिलेली रक्कम पुन्हा मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून विकासकामांना वितरित केली जाते. निवडून आलेल्या सदस्यांना सर्कलच्या विकासासाठी लोकांच्या गरजा विचारात घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी आणि लोकांचा विकास घडविण्यासाठी झेडपीच्या निधीतून विकासकामांना अग्रक्रम दिला जातो. प्रामुख्याने ग्रामीण रस्ते, प्रमुख जिल्हा रस्ते, मार्ग इतर जिल्हा रस्ते, ग्रामीण उद्याने आणि उपवने करण्यासाठी विविध हेडद्वारे निधी उपलब्ध करण्यात येतो. दरम्यान झेडपीला राज्य शासनाकडून २०१७-१८ मध्ये २१६ कोटींचा निधी मिळाला आहे. त्यापैकी १० कोटीचा निधी मुद्रांक शुल्कातून मिळाला आहे. तर उर्वरित निधी मार्चपूर्वी मिळणार आहे. जि.प. निवडणुकीनंतर सदस्यांना वर्षपूर्तीपूर्वी मिळालेल तोकडा निधी कुठे खर्च करावा, असा प्रश्न पडला आहे. वेळेत निधी मिळत नसल्याने मतदारसंघातील कामांचे भूमिपूजन करण्याची संधीही बहुतांश सदस्यांना मिळाली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.निधी उपलब्धतेसाठी प्रशासन आणि पदाधिकाºयांनी शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून निधीसाठी गळ घातली आहे. मात्र, त्यात फारसे यश आले नाही. अशातच झेडपीतील सत्ताधारी आणि विरोधकांमधील कुरघोडीचे राजकारणातही जिल्ह्यातील गावांच्या विकासकामात अडथळा ठरत असल्यानेच विकास खुंटला असल्याची चर्चा सदस्यांमध्ये आहे.जुने दायित्वच६० कोटींचेमागील सत्ताकाळात जी कामे झालीत त्यांचे दायित्व देण्यात प्राप्त निधी खर्च झाला. नवीन कामे करण्यासाठी निधीच उपलब्ध नसल्याने कामे करता आली नाहीत. अशा स्थितीत आता आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात निधी आला व काही अप्राप्त आहे.शासनाकडून व जिल्हा निधी मधून उपलब्ध होत असलेल्या निधीतून विकास कामांचे नियोजन तयार आहे.झेडपीत विविध योजनेतून केलेल्या कामांचे ६० कोटीचे दायित्व देण्यात ८ महिने गेलेत. त्यानंतर चार महिन्याच्या कालावधीत विकास कामांना गती आली असताना विरोधी सदस्य विकास कामाच्या तक्रारींमुळे विकास कामांत खोळंबा झाला.- नितीन गोंडाणे, अध्यक्ष, झेडपीशासनाकडून चालू आर्थिक वर्षात झेडपीला विविध हेडखाली कोट्यवधींचा निधी मिळाला. तर ९५ कोटी शासनाकडे परत गेले. परंतु शासन निर्णयाप्रमाणे विकास कामे सत्तापक्षाने घेतली नसल्याचा हा परिणाम आहे.- रवींद्र मुंदे,विरोधी पक्षनेता, झेडपी