शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

फळ भाजीबाजारात घाणीचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:32 IST

येथील फळ व भाजीबाजारात हजारो क्विंटल फळे व भाजीपाल्याची रोज लिलाव करण्यात येतो. याठिकाणी दिवसभर कोट्यवधी रूपयांच्या फळे व भाजीपाल्याची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी फेकुन दिलेला भाजीपाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून येथील व्यापारी व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देस्वच्छतेचा बोजवारा : कंत्राटदाराचे दुर्लक्ष , बाजार समिती करणार का कारवाई ?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजीबाजारात हजारो क्विंटल फळे व भाजीपाल्याची रोज लिलाव करण्यात येतो. याठिकाणी दिवसभर कोट्यवधी रूपयांच्या फळे व भाजीपाल्याची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी फेकुन दिलेला भाजीपाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून येथील व्यापारी व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.बाजार समितीने सदर साफसफाईचा कंत्राट क्षितीज बेरोजगार संस्थेला दिला आहे. स्वच्छतेसाठी महिन्याकाठी १ लाख १९ हजार रूपये सदर संस्थेला देण्यात येत असल्याची माहिती प्रभारी सचिव भुजंग डोईफोडे यांनी दिली.परंतु सदर कंत्राटदाराने नेमलेल्या स्वच्छताकामगारांकडून नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याने या ठिकाणी अस्वच्छतेची परिस्थिती उद्धभवली आहे. येथे प्रचंड घाण होत असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरत आहे. त्याकारणाने नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. याठिकाणी नोंदणीकृत फळेविक्रेत्यांची ७८ दुकाने असून भाजीपाला विक्रेत्यांची नोंदणीकृत २७८ दुकाने आहेत. येथे दिवसभर कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. पण अनेक दुकानदार कचरा व सडलेला भाजीपाला हा कंटेनरमध्ये न टाकता उघड्यावरच फेकून देण्याचा प्रताप व्यापारीच करतात . तसेच कंत्राटदाराच्यावतीने नियमित स्वच्छता केल्यास यावर नियंत्रण मिळू शकते. येथे ये- जा करणाऱ्या व्यावसायिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सडलेला भाजीपाला व फळे उघड्यावर फेकून दिली जात असल्याची वस्तुस्थिती आहे.महिन्याकाठी स्वच्छतेवर १ लाख १९ हजार रूपये खर्च करण्यात येतात. कंत्राटदारकडून नियमित स्वच्छता करण्यात येत नसेल तर तपासून पुढील कारवाई करण्यात येईल.-भुजंग डोईफोडेप्रभारी सचिव, बाजार समिती