शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दर घसरल्याने शेतकरी चिंतातूर

By admin | Updated: September 28, 2016 00:19 IST

तीन-चार वर्षांपासून असलेली सततची नापिकी, शेतमालाचा घसरलेला भाव, मजुरीचे वाढते दर, फवारणीची

उदासीनता : सवंगणीदरम्यान उडदाला परतीच्या पावसाचा फटकाअचलपूर : तीन-चार वर्षांपासून असलेली सततची नापिकी, शेतमालाचा घसरलेला भाव, मजुरीचे वाढते दर, फवारणीची महागडी औषधे, बियाणे व रासायनिक खते यांसह आदी कारणांमुळे अचलपूर तालुक्यातील शेतकरी डबघाईस आला आहे. मागील आठड्यात परतीचा पाऊस कमी-अधिक प्रमाणात झाल्याने त्याचा फटका सवंगणीला आलेल्या उडीद आणि मुगाच्या पिकाला बसला. नाफेडकडूनही भ्रमनिरास झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतात झालेले उत्पन्न कवडीमोल भावात विकताना डोक्यावरचे कर्ज कसे फेडावे, या विवंचेत शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. मागील काही महिन्यांतील शेती पिकांचे भाव पाहता शेतकऱ्यांच्या हाती येत असणारे आताचे भाव निव्वळ अर्ध्यावर आले आहेत. मागील वर्षी मुगाचे दर ८ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल असताना आता तोच मूग ४२०० ते ५२०० वर आला आहे. सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचीही हीच गत झाल्याने कर्ज कसे फेडावे, ही चिंता त्यांना सतावत आहे. पिकांना हमीभाव देण्याचे शासनाने जाहीर केले असले तरी नाफेडकडून अटी व शर्ती, नियमात गुंतवून अवहेलना करण्याचा प्रयत्न मात्र सुरू झाला आहे. नाफेडचे अधिकारी शेती पिकांना १२ टक्के आर्द्रता आणि स्वच्छ माल, दर्जा या फेऱ्यात अडकवून माल घेण्यास नकार देत पुन्हा पडीक भावात शेतीमाल विकण्यास शेतकऱ्यांना भाग पाडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर, उडीद, मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. परतीच्या पावसाने याला दिलासा मिळाला असला तरी तो नकोसा झाला आहे. सदर पिके धोक्यात आली आहेत. काही भागातील शेतातील सोयाबीनला कोंब फुटले आहेत. यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने पिके चांगली होती. त्यामुळे दुष्काळावर मात होईल, असे शेतकऱ्यांना वाटले होते. पण ती आशा फोल ठरली. (शहर प्रतिनिधी)केळीची भाववाढएकीकडे पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असताना सध्याच्या दराने मागील वर्षीची कसर भरून निघत आहे. यावर्षी आॅगस्ट महिन्यापासून १५ किलोचे भाव ११०० ते १२०० रुपये तर १० किलो १०२५ व नंबर दोनच्या केळीला ६०० रुपये दर मिळत आहे. नवरात्रीत अधिक दरवाढीची चिन्हे आहेत. अचलपूर तालुक्यात जवळपास २० केळी सप्लायर्स असून त्यांच्याकडून तीन हजार टन केळी बाजारपेठेत निर्यात करण्यात येतात.शेतकरी खचलाअस्मानी संकटाने शेतकरी खचला आहे. शासन अजूनही शेतमालाला हमीभाव देण्यास तयार नाही, ही बाब दुर्दैवी आहे, असे मत अचलपूर तालुक्यातील दिनेश बारखडे, अनिल ढेरे (गौरखेडा), मणिराम दहीकर (मल्हारा), संजय अमृतकर (चमक), अनुप चौधरी (एकलासपूर), अविनाश यावले (धोतरखेडा), भिकुलाल उपाध्याय (धामणगाव), अतकरे (वडगाव फत्तेपूर), प्रवीण गाडगे (शिंदी), लोकेश बोबडे (परसापूर), अंबादास कथे (सालेपूर), गुणवंत ठाकरे (हरम), बाळासाहेब गणगणे (अचलपूर) यांनी व्यक्त केले आहे.मागीलवर्षी वादळी पावसाचा फटका केळी पिकाला बसला. यावर्षी केळीचे पीक सुस्थितीत आहे. शेतकरी परिश्रमाने पिकवीत असलेल्या फळ पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मदत करावी.- श्रीधर क्षीरसागर,प्रगतिशील शेतकरी.रक्ताचा घाम करून शेतकरी दर्जदार फळे पिकवतो. त्याला जर शासनाने अनुदान दिले, तर त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होईल व ग्राहकांनाही होईल.- अतुल लकडे,पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी