शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

दर घसरल्याने शेतकरी चिंतातूर

By admin | Updated: September 28, 2016 00:19 IST

तीन-चार वर्षांपासून असलेली सततची नापिकी, शेतमालाचा घसरलेला भाव, मजुरीचे वाढते दर, फवारणीची

उदासीनता : सवंगणीदरम्यान उडदाला परतीच्या पावसाचा फटकाअचलपूर : तीन-चार वर्षांपासून असलेली सततची नापिकी, शेतमालाचा घसरलेला भाव, मजुरीचे वाढते दर, फवारणीची महागडी औषधे, बियाणे व रासायनिक खते यांसह आदी कारणांमुळे अचलपूर तालुक्यातील शेतकरी डबघाईस आला आहे. मागील आठड्यात परतीचा पाऊस कमी-अधिक प्रमाणात झाल्याने त्याचा फटका सवंगणीला आलेल्या उडीद आणि मुगाच्या पिकाला बसला. नाफेडकडूनही भ्रमनिरास झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतात झालेले उत्पन्न कवडीमोल भावात विकताना डोक्यावरचे कर्ज कसे फेडावे, या विवंचेत शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. मागील काही महिन्यांतील शेती पिकांचे भाव पाहता शेतकऱ्यांच्या हाती येत असणारे आताचे भाव निव्वळ अर्ध्यावर आले आहेत. मागील वर्षी मुगाचे दर ८ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल असताना आता तोच मूग ४२०० ते ५२०० वर आला आहे. सोयाबीन, तूर, उडीद या पिकांचीही हीच गत झाल्याने कर्ज कसे फेडावे, ही चिंता त्यांना सतावत आहे. पिकांना हमीभाव देण्याचे शासनाने जाहीर केले असले तरी नाफेडकडून अटी व शर्ती, नियमात गुंतवून अवहेलना करण्याचा प्रयत्न मात्र सुरू झाला आहे. नाफेडचे अधिकारी शेती पिकांना १२ टक्के आर्द्रता आणि स्वच्छ माल, दर्जा या फेऱ्यात अडकवून माल घेण्यास नकार देत पुन्हा पडीक भावात शेतीमाल विकण्यास शेतकऱ्यांना भाग पाडत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर, उडीद, मुगाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. परतीच्या पावसाने याला दिलासा मिळाला असला तरी तो नकोसा झाला आहे. सदर पिके धोक्यात आली आहेत. काही भागातील शेतातील सोयाबीनला कोंब फुटले आहेत. यावर्षी सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिल्याने पिके चांगली होती. त्यामुळे दुष्काळावर मात होईल, असे शेतकऱ्यांना वाटले होते. पण ती आशा फोल ठरली. (शहर प्रतिनिधी)केळीची भाववाढएकीकडे पावसाने शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणले असताना सध्याच्या दराने मागील वर्षीची कसर भरून निघत आहे. यावर्षी आॅगस्ट महिन्यापासून १५ किलोचे भाव ११०० ते १२०० रुपये तर १० किलो १०२५ व नंबर दोनच्या केळीला ६०० रुपये दर मिळत आहे. नवरात्रीत अधिक दरवाढीची चिन्हे आहेत. अचलपूर तालुक्यात जवळपास २० केळी सप्लायर्स असून त्यांच्याकडून तीन हजार टन केळी बाजारपेठेत निर्यात करण्यात येतात.शेतकरी खचलाअस्मानी संकटाने शेतकरी खचला आहे. शासन अजूनही शेतमालाला हमीभाव देण्यास तयार नाही, ही बाब दुर्दैवी आहे, असे मत अचलपूर तालुक्यातील दिनेश बारखडे, अनिल ढेरे (गौरखेडा), मणिराम दहीकर (मल्हारा), संजय अमृतकर (चमक), अनुप चौधरी (एकलासपूर), अविनाश यावले (धोतरखेडा), भिकुलाल उपाध्याय (धामणगाव), अतकरे (वडगाव फत्तेपूर), प्रवीण गाडगे (शिंदी), लोकेश बोबडे (परसापूर), अंबादास कथे (सालेपूर), गुणवंत ठाकरे (हरम), बाळासाहेब गणगणे (अचलपूर) यांनी व्यक्त केले आहे.मागीलवर्षी वादळी पावसाचा फटका केळी पिकाला बसला. यावर्षी केळीचे पीक सुस्थितीत आहे. शेतकरी परिश्रमाने पिकवीत असलेल्या फळ पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मदत करावी.- श्रीधर क्षीरसागर,प्रगतिशील शेतकरी.रक्ताचा घाम करून शेतकरी दर्जदार फळे पिकवतो. त्याला जर शासनाने अनुदान दिले, तर त्याचा फायदा थेट शेतकऱ्यांना होईल व ग्राहकांनाही होईल.- अतुल लकडे,पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी