शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

सिमेंटरोडमुळे दुकानांना टाळे, उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:48 IST

शहराचा कायापालट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिमेंटरोडमुळे शहरातील दुकानांनाच टाळे लागू लागल्याने 'विकास नको, जीवन हवे' अशा संवेदनशील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सिमेंट रस्त्याची उपयोगिता त्यामुळे ऐरणीवर आली आहे.

ठळक मुद्देमरणदायी विकास : अधिकाऱ्यांचे बळ कंपनीलाच

आॅनलाईन लोकमतअमरावती : शहराचा कायापालट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सिमेंटरोडमुळे शहरातील दुकानांनाच टाळे लागू लागल्याने 'विकास नको, जीवन हवे' अशा संवेदनशील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सिमेंट रस्त्याची उपयोगिता त्यामुळे ऐरणीवर आली आहे.पंचवटी ते इर्विन चौकापर्यंतचे सिमेंटरोडचे काम सुरू होऊन सहा-सात महिन्यांचा कालावधी उलटला. नियोजनाचा ढिसाळ नमुना असलेले हे काम तरीही अपूर्णच आहे. एकाच बाजूचे काम पूर्ण व्हायचे असल्यामुळे दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण होण्यास पुन्हा सहा महिने अलगद उलटतील. काम सुरू करताना स्थानिक व्यावसायिकांचा जराही विचार न केल्याने दुकानदारांना व्यवसाय करण्यास मुभाच उरली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संबंधितांनी वारंवार तक्रारी केल्या असतानाही त्याचा मुळीच लाभ झाला नाही. मुख्य अभियंता विवेक साळवे आणि त्यांच्या चमुचे या तमाम मुद्यांवर नियंत्रण असायलाच हवे होते; तथापि कंत्राटदाराला 'दुखविण्या'ची त्यांचीही इच्छा नसावी, अशा पद्धतीने त्यांनी सामान्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचमुळे 'विकास हवा असेल तर वेदना सहन कराव्याच लागतील', अशी असंवेदनशील प्रतिक्रिया जे.पी.एन्टरप्रायझेस या कंपनीद्वारे दिली जाते.जिल्हा स्टेडियम संकुलातील मेलडी कॅफे हे दुकान इतके चालायचे की तरुणाईच्या तेथील सततच्या गर्दीमुळे इतरांची तक्रार असायची. रस्त्याच्या कामापासून व्यवसाय ठप्प पडला. दुकान मालकाला दरमहा द्यावयाचे ३० हजार रुपये भाडे आणि चाकरांना द्यावयाचे वेतनही निघू शकत नसल्याने अखेर दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती दुकानचालक उल्हास खालखोनीकर यांनी दिली. मोठ्या वाहनांचे काच लावण्यात नावाजलेल्या आशीर्वाद ग्लास या प्रतिष्ठानात सहा महिन्यांत एकही वाहन आले नसल्याची माहिती सुनील कोलटकर यांनी दिली. सीटकव्ह आणि दुचाकी सजविण्यासाठीचे प्रतिष्ठान असलेल्या प्रगती हेल्मेटचे वैभव बैतुले म्हणाले दुकानाचे १५ हजार रुपये भाडे आणि कामाला असलेल्या कर्मचाºयांचे वेतन देणे शक्यच नाही. ९० टक्के व्यवसाय ठप्प पडलेला आहे. अखेर येथील कर्मचारी दुसºया दुकानात पाठविणे भाग पडले. याच संकुलात असलेल्या दोन दुचाकी दुरुस्ती केंद्रांमध्ये हीच स्थिती आहे.नागरिकांना दिलासा, कारवाईची मागणीजेपीई बांधकाम कंपनी करीत असलेले काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आणि कठोरा मार्गावरील लोकांना नाहक बंदिवास सुरू असल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित केल्यावर त्या परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या कंपनीची केवळ दंडुकेशाही सुरू असून सौजन्य काय असते, हे कंपनीच्या अभियंत्यांना आणि कर्मचाºयांना जराही ठाऊक नसल्याच्या वेदना नागरिकांनी 'लोकमत'कडे बोलून दाखविल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडे तक्रारी करूनही कुणीच आमची दखल घेतली नाही. शासकीय अधिकाºयांच्या बळामुळेच विकासाच्या नावावर आमचे जीवघेणे हाल सुरू असल्याचे कठोरा रोडवरील नागरिक 'लोकमत'ला सांगत होते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी वृत्ताची दखल घेतली; तथापि सर्वच वरिष्ठ अधिकाºयांची मुंबईला बैठक असल्यामुळे मुख्यालयी कुणीच उपस्थित नाही. कारवाईबाबतचा त्यांचा निर्णय त्यांच्या आगमनानंतरच कळू शकेल.धामणगावचा रस्ता गाजलाधामणगावचा रस्ता तडे आणि भेगा गेल्यामुळे अपघातप्रवण झाला आहे. भेगांमुळे सायकलचे टायर घसरतात आणि तोल जाऊन अपघात होतो, अशी माहिती तेथील नागरिकांनी फोन करून 'लोकमत'ला दिली. यासंबंधाने त्या परिसरातील जागरूक लोकप्रतिनिधींनी गंभीर दखल घेतली. रस्त्याची पाहणीही केली. विवेक साळवे रस्त्याच्या या मुद्यावर कसे व्यक्त होतात, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.