शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

पाणीटंचाई निवारणात कुचराई भोवणार

By admin | Updated: July 12, 2017 00:09 IST

मेळघाटसह जिल्ह्यातील काही गावांमध्ये कायम असलेले जलसंकट निवारण्यासाठी यंत्रणेने तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात.

थेट निलंबन : झेडपीच्या जलव्यवस्थापन सभेत अध्यक्ष गरजलेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटसह जिल्ह्यातील काही गावांमध्ये कायम असलेले जलसंकट निवारण्यासाठी यंत्रणेने तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात. त्यात कुचराई केल्यास संबंधितांवर निलंबन कारवाई करण्याचा दम झेडपी अध्यक्षांनी भरला आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जलव्यवस्थापन समितीची सभा पार पडली. त्यात गोंडाणे यांनी पाणीटंचाई व अनुषंगिक बाबींचा आढावा घेतला.३० जून अखेर पाणीटंचाई आराखड्याची मुदत संपल्याने जिल्ह्यातील विविध गावांत टँकर बंद करण्यात आले आहेत. चिखलदरा तालुक्यातील १२ गावात ७ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर येथील गावांना शासकीय टँकरने केला जाणार पाणी पुरवठा बंद झाला आहे. अशातच उन्हाळा संपला असला तरीही या गावात पाणी टंचाईची समस्या कायम आहे. टँकर असूनही आदीवासी बांधवाना पाणी पुरवठा होत नसल्याचे वास्तव सभापती बळवंत वानखडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.यावर प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ सीईओच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मुदत वाढीचा प्रस्ताव सादर केल्याचे कार्यकारी अभियंता उमाळकर यांनी सांगितले. मात्र यावर पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा अध्यक्षांनी दिला आहे. यावेळी सभेत मागील काही वर्षापासून पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण असल्याचा मुद्दा पिठासीन सभापती नितीन गोंडाणे यांनी उपस्थित केला. यावर प्रशासनाची बाजू मांडताना सीईओ किरण कुलकर्णी यांनी ज्या गावातील पाणीपुरवठा योजनांना २०१५ पूर्वी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतरही योजना पूर्ण न करणाऱ्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितींना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजाविल्या आहेत. ज्याही पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहेत. सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सीईओ किरण कुलकर्णी, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, के.टी. उमाळकर आदी उपस्थित होते.दांडीबहाद्दरांवर कारवाईचा ठरावजिल्हा परिषद जलव्यस्थापन समिती सभेला निमंत्रण दिल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी व अन्य विभागाचे अधिकारी मागील कित्येक सभांना उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे पत्रव्यवहार केल्यावरही जिल्हा परिषदेच्या पत्राला न जुमानणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आता शासनाच्या सूचनेनुसार कारवाई करण्याचा ठराव जलव्यवस्थापन समितीने मंगळवारी घेतला आहे. हा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सभागृहात सांगितले.