शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

पाणीटंचाई निवारणात कुचराई भोवणार

By admin | Updated: July 12, 2017 00:09 IST

मेळघाटसह जिल्ह्यातील काही गावांमध्ये कायम असलेले जलसंकट निवारण्यासाठी यंत्रणेने तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात.

थेट निलंबन : झेडपीच्या जलव्यवस्थापन सभेत अध्यक्ष गरजलेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटसह जिल्ह्यातील काही गावांमध्ये कायम असलेले जलसंकट निवारण्यासाठी यंत्रणेने तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात. त्यात कुचराई केल्यास संबंधितांवर निलंबन कारवाई करण्याचा दम झेडपी अध्यक्षांनी भरला आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात जलव्यवस्थापन समितीची सभा पार पडली. त्यात गोंडाणे यांनी पाणीटंचाई व अनुषंगिक बाबींचा आढावा घेतला.३० जून अखेर पाणीटंचाई आराखड्याची मुदत संपल्याने जिल्ह्यातील विविध गावांत टँकर बंद करण्यात आले आहेत. चिखलदरा तालुक्यातील १२ गावात ७ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर येथील गावांना शासकीय टँकरने केला जाणार पाणी पुरवठा बंद झाला आहे. अशातच उन्हाळा संपला असला तरीही या गावात पाणी टंचाईची समस्या कायम आहे. टँकर असूनही आदीवासी बांधवाना पाणी पुरवठा होत नसल्याचे वास्तव सभापती बळवंत वानखडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.यावर प्रशासनाने पाणी टंचाई निवारणार्थ सीईओच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी यांच्याकडे मुदत वाढीचा प्रस्ताव सादर केल्याचे कार्यकारी अभियंता उमाळकर यांनी सांगितले. मात्र यावर पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा अध्यक्षांनी दिला आहे. यावेळी सभेत मागील काही वर्षापासून पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण असल्याचा मुद्दा पिठासीन सभापती नितीन गोंडाणे यांनी उपस्थित केला. यावर प्रशासनाची बाजू मांडताना सीईओ किरण कुलकर्णी यांनी ज्या गावातील पाणीपुरवठा योजनांना २०१५ पूर्वी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतरही योजना पूर्ण न करणाऱ्या पाणीपुरवठा व स्वच्छता समितींना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजाविल्या आहेत. ज्याही पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहेत. सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सीईओ किरण कुलकर्णी, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे, कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, के.टी. उमाळकर आदी उपस्थित होते.दांडीबहाद्दरांवर कारवाईचा ठरावजिल्हा परिषद जलव्यस्थापन समिती सभेला निमंत्रण दिल्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वीज वितरण कंपनी व अन्य विभागाचे अधिकारी मागील कित्येक सभांना उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे पत्रव्यवहार केल्यावरही जिल्हा परिषदेच्या पत्राला न जुमानणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आता शासनाच्या सूचनेनुसार कारवाई करण्याचा ठराव जलव्यवस्थापन समितीने मंगळवारी घेतला आहे. हा ठराव जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने सभागृहात सांगितले.