शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
2
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
3
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
4
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणींवर सामूहिक बलात्कार
5
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
6
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
7
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
8
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
9
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
10
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
11
Operation Sindoor Live Updates: जम्मूमध्ये रॉकेट हल्ला, सांबा क्षेत्रात भीषण गोळीबार
12
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
13
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
14
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
15
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
16
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
17
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
18
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
19
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
20
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."

राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यात आरक्षण हाऊसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST

खिडक्यांवर झळतेयं ‘नो रूम’, मुंबई, पुणे मार्गे रेल्वे ३१ ऑगस्टपर्यत आरक्षण मिळेना अमरावती : अनलॉक होताच बरेच काही सुरळीत ...

खिडक्यांवर झळतेयं ‘नो रूम’, मुंबई, पुणे मार्गे रेल्वे ३१ ऑगस्टपर्यत आरक्षण मिळेना

अमरावती : अनलॉक होताच बरेच काही सुरळीत होत आहे. अशातच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असून, राखी पौर्णिमेमुळे बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण हाऊसफुल्ल आहे. विशेषत: मुंबई, पुणे मार्गावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत ‘नो रूम’ आहे. त्यामुळे रक्षाबंधनासाठी बहिणीच्या भेटीला येणाऱ्या भावांना अथडळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

रक्षाबंधन हा रविवार, २२ ऑगस्ट रोजी आहे. मात्र नवविवाहितांना माहेरी जाऊन भावाला राखी बांधण्याची ओढ लागली आहे.

अशातच रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्या आरक्षण हाऊसफुल्ल असल्याने खासगी अथवा ट्रॅव्हल्र्सने प्रवास करुन बहिणीच्या भेटीला भावाला जावे लागेल, असे चित्र आहे. लांब पल्ल्यासह मुंबई, पुणे मार्गे ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यात ऑगस्टपर्यंत आरक्षण नसल्याचे फलक रेल्वे खिडक्यांवर झळकत

आहे.

--------------------------

सध्या सुरू असलेल्या गाड्या

अमरावती- मुंबई, अमरावती-पुणे, अमरावती-तिरूपती, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, हावडा- मुंबई गितांजली, ओखा-पुरी द्धारकानाथ एक्स्प्रेस, नागपूर- दादर सेवाग्राम एक्स्प्रेस, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद-

चैन्नई नवजीवन, नागपूर-पुणे गरीबरथ, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस.

-----------------------

या गाड्यांना ‘वेटिंग‘

गोंदिया- मुंबई विदर्भ - स्लिपर ८९ वेटिंग, एसी १२ वेटिंग

अमरावती- मुंबई एक्सप्रेस- स्लिपर ६४ वेटिंग, एसी १८ वेटिंग

नागपूर- पुणे गरीबरथ - स्लिपर ६७ वेटिंग, एसी २४ वेटिंग

हावडा- मुंबई मेल - स्लिपर ७८ वेटिंग, एसी ४२ वेटिंग

गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र - स्लिपर ५४ वेटिंग, एसी २८ वेटिंग

----------------

४० टक्के प्रवासी संख्या वाढली

- कोरोनाकाळात नागरिक घरीच ‘लॉक’ होते. मात्र, शासनाने ‘अनलॉक’ निर्णय घेताच कामानिमित्त लोक बाहेर पडू लागले आहे. विशेषत: प्रवासासाठी आता रेल्वेला पसंती दिली जात आहे.

- राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. पुणे, मुंबई मार्गावरील एकुणच गाड्या हाऊसफुल्ल असल्याचे फलक झळकत आहे. परिणामी अनेकांना रेल्वेशिवाय प्रवास करून घर गाठावे लागणार आहे.

- अनलॉक होताच रेल्वे गाड्यांत ३५ ते ४० टक्के प्रवासी संख्या वाढली आहे. अशातच रेल्वेच्या विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाविना प्रवास नाही. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.