शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यात आरक्षण हाऊसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST

खिडक्यांवर झळतेयं ‘नो रूम’, मुंबई, पुणे मार्गे रेल्वे ३१ ऑगस्टपर्यत आरक्षण मिळेना अमरावती : अनलॉक होताच बरेच काही सुरळीत ...

खिडक्यांवर झळतेयं ‘नो रूम’, मुंबई, पुणे मार्गे रेल्वे ३१ ऑगस्टपर्यत आरक्षण मिळेना

अमरावती : अनलॉक होताच बरेच काही सुरळीत होत आहे. अशातच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असून, राखी पौर्णिमेमुळे बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण हाऊसफुल्ल आहे. विशेषत: मुंबई, पुणे मार्गावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत ‘नो रूम’ आहे. त्यामुळे रक्षाबंधनासाठी बहिणीच्या भेटीला येणाऱ्या भावांना अथडळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

रक्षाबंधन हा रविवार, २२ ऑगस्ट रोजी आहे. मात्र नवविवाहितांना माहेरी जाऊन भावाला राखी बांधण्याची ओढ लागली आहे.

अशातच रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्या आरक्षण हाऊसफुल्ल असल्याने खासगी अथवा ट्रॅव्हल्र्सने प्रवास करुन बहिणीच्या भेटीला भावाला जावे लागेल, असे चित्र आहे. लांब पल्ल्यासह मुंबई, पुणे मार्गे ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यात ऑगस्टपर्यंत आरक्षण नसल्याचे फलक रेल्वे खिडक्यांवर झळकत

आहे.

--------------------------

सध्या सुरू असलेल्या गाड्या

अमरावती- मुंबई, अमरावती-पुणे, अमरावती-तिरूपती, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, हावडा- मुंबई गितांजली, ओखा-पुरी द्धारकानाथ एक्स्प्रेस, नागपूर- दादर सेवाग्राम एक्स्प्रेस, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद-

चैन्नई नवजीवन, नागपूर-पुणे गरीबरथ, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस.

-----------------------

या गाड्यांना ‘वेटिंग‘

गोंदिया- मुंबई विदर्भ - स्लिपर ८९ वेटिंग, एसी १२ वेटिंग

अमरावती- मुंबई एक्सप्रेस- स्लिपर ६४ वेटिंग, एसी १८ वेटिंग

नागपूर- पुणे गरीबरथ - स्लिपर ६७ वेटिंग, एसी २४ वेटिंग

हावडा- मुंबई मेल - स्लिपर ७८ वेटिंग, एसी ४२ वेटिंग

गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र - स्लिपर ५४ वेटिंग, एसी २८ वेटिंग

----------------

४० टक्के प्रवासी संख्या वाढली

- कोरोनाकाळात नागरिक घरीच ‘लॉक’ होते. मात्र, शासनाने ‘अनलॉक’ निर्णय घेताच कामानिमित्त लोक बाहेर पडू लागले आहे. विशेषत: प्रवासासाठी आता रेल्वेला पसंती दिली जात आहे.

- राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. पुणे, मुंबई मार्गावरील एकुणच गाड्या हाऊसफुल्ल असल्याचे फलक झळकत आहे. परिणामी अनेकांना रेल्वेशिवाय प्रवास करून घर गाठावे लागणार आहे.

- अनलॉक होताच रेल्वे गाड्यांत ३५ ते ४० टक्के प्रवासी संख्या वाढली आहे. अशातच रेल्वेच्या विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाविना प्रवास नाही. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.