शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यात आरक्षण हाऊसफुल्ल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:17 IST

खिडक्यांवर झळतेयं ‘नो रूम’, मुंबई, पुणे मार्गे रेल्वे ३१ ऑगस्टपर्यत आरक्षण मिळेना अमरावती : अनलॉक होताच बरेच काही सुरळीत ...

खिडक्यांवर झळतेयं ‘नो रूम’, मुंबई, पुणे मार्गे रेल्वे ३१ ऑगस्टपर्यत आरक्षण मिळेना

अमरावती : अनलॉक होताच बरेच काही सुरळीत होत आहे. अशातच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली असून, राखी पौर्णिमेमुळे बहुतांश रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण हाऊसफुल्ल आहे. विशेषत: मुंबई, पुणे मार्गावर ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत ‘नो रूम’ आहे. त्यामुळे रक्षाबंधनासाठी बहिणीच्या भेटीला येणाऱ्या भावांना अथडळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.

रक्षाबंधन हा रविवार, २२ ऑगस्ट रोजी आहे. मात्र नवविवाहितांना माहेरी जाऊन भावाला राखी बांधण्याची ओढ लागली आहे.

अशातच रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळत नसल्याने अनेकांचे नियोजन बिघडले आहे. राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्या आरक्षण हाऊसफुल्ल असल्याने खासगी अथवा ट्रॅव्हल्र्सने प्रवास करुन बहिणीच्या भेटीला भावाला जावे लागेल, असे चित्र आहे. लांब पल्ल्यासह मुंबई, पुणे मार्गे ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यात ऑगस्टपर्यंत आरक्षण नसल्याचे फलक रेल्वे खिडक्यांवर झळकत

आहे.

--------------------------

सध्या सुरू असलेल्या गाड्या

अमरावती- मुंबई, अमरावती-पुणे, अमरावती-तिरूपती, गोंदिया- मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, हावडा-मुंबई मेल, हावडा- मुंबई गितांजली, ओखा-पुरी द्धारकानाथ एक्स्प्रेस, नागपूर- दादर सेवाग्राम एक्स्प्रेस, हावडा- अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद-

चैन्नई नवजीवन, नागपूर-पुणे गरीबरथ, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस.

-----------------------

या गाड्यांना ‘वेटिंग‘

गोंदिया- मुंबई विदर्भ - स्लिपर ८९ वेटिंग, एसी १२ वेटिंग

अमरावती- मुंबई एक्सप्रेस- स्लिपर ६४ वेटिंग, एसी १८ वेटिंग

नागपूर- पुणे गरीबरथ - स्लिपर ६७ वेटिंग, एसी २४ वेटिंग

हावडा- मुंबई मेल - स्लिपर ७८ वेटिंग, एसी ४२ वेटिंग

गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र - स्लिपर ५४ वेटिंग, एसी २८ वेटिंग

----------------

४० टक्के प्रवासी संख्या वाढली

- कोरोनाकाळात नागरिक घरीच ‘लॉक’ होते. मात्र, शासनाने ‘अनलॉक’ निर्णय घेताच कामानिमित्त लोक बाहेर पडू लागले आहे. विशेषत: प्रवासासाठी आता रेल्वेला पसंती दिली जात आहे.

- राखी पौर्णिमेमुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. पुणे, मुंबई मार्गावरील एकुणच गाड्या हाऊसफुल्ल असल्याचे फलक झळकत आहे. परिणामी अनेकांना रेल्वेशिवाय प्रवास करून घर गाठावे लागणार आहे.

- अनलॉक होताच रेल्वे गाड्यांत ३५ ते ४० टक्के प्रवासी संख्या वाढली आहे. अशातच रेल्वेच्या विशेष गाड्यांमध्ये आरक्षणाविना प्रवास नाही. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.