शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

रूळांना भेगा, जबलपूर एक्सप्रेसचा अपघात टळला

By admin | Updated: January 23, 2015 00:44 IST

कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांवर भेगा पडल्याने गुरुवारी जबलपूर एक्सप्रेसचा भीषण अपघात टळला. ही घटना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान

अमरावती : कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांवर भेगा पडल्याने गुरुवारी जबलपूर एक्सप्रेसचा भीषण अपघात टळला. ही घटना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान येथील गोपालनगर रेल्वे फाटकावर घडण्यापूर्वीच चालकाच्या निर्दशनास आल्याने हा अपघात टळला. त्यामुळे तब्बल ४० मिनिटे ही गाडी थांबविण्याचा प्रसंग रेल्वे प्रशासनावर ओढावला होता, हे विशेष.रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जबलपूर-अमरावती एक्सप्रेस ही गाडी नागपूरहून अमरावतीकडे कॉर्डलाईनने येत असताना गोपालनगर रेल्वे फाटकाच्या परिसरात चालकाला लांबून रुळात भेगा पडल्याचे दिसून आले. गाडी पुढे नेल्यास भीषण अपघाताची शक्यता निदर्शनास आल्याने चालकाने प्रसंगावधान दाखविले. ज्या ठिकाणी रुळांवर भेगा पडल्या आहेत, त्या ठिकाणापासून काही अंतरावर चालकाने गाडी थांबविली व अमरावतीच्या स्टेशन प्रबंधकांना सूचना दिली. रेल्वे रुळात भेगा पडल्याची बाब लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. रेल्वे अधिकाऱ्यांची सुध्दा धावपळ सुरु झाली. काही वेळाने रुळांवरील भेगांच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले. हा प्रकार ४० ते ५० मिनिटे सुरू होता. रुळ व्यवस्थित असल्याचे अधिकाऱ्यांनी कळविताच ही गाडी अमरावती स्थानकावर पुढे नेण्यात आली. थंडीमुळे रुळात भेगा पडण्याचा प्रकार होत असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, चालकाने सावधगिरी बाळगली नसती तर जबलपूर एक्सप्रेसला भीषण अपघात झाला असता, या बाबीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. प्रवासी बचावले : गोपालगनरात ४० मिनिटे थांबली गाडीअन् अभियांत्रीकी विभागाची चमू पोहोचलीरुळात भेगा पडल्यामुळे जबलपूर एक्सप्रेसचा अपघात टळल्याची वार्ता रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर पोहचताच एकमेकांशी संवाद सुरु केला. नेमके कोणत्या ठिकाणी रेल्वे रुळात भेगा पडल्या याची माहिती मिळताच बडनेऱ्यातील अभियांत्रिकी विभागाची चमू गोपालनगरात घटनास्थळी पोहोचली. अवघ्या २५ मिनिटातच रुळात पडलेल्या भेगा दुरुस्त करण्यात आल्यात. त्यानंतर ही जबलपूर एक्सप्रेस अमरावती रेल्वे स्थानकावरून पुढे रवाना करण्यात आली.