शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रूळांना भेगा, जबलपूर एक्सप्रेसचा अपघात टळला

By admin | Updated: January 23, 2015 00:44 IST

कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांवर भेगा पडल्याने गुरुवारी जबलपूर एक्सप्रेसचा भीषण अपघात टळला. ही घटना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान

अमरावती : कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळांवर भेगा पडल्याने गुरुवारी जबलपूर एक्सप्रेसचा भीषण अपघात टळला. ही घटना सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान येथील गोपालनगर रेल्वे फाटकावर घडण्यापूर्वीच चालकाच्या निर्दशनास आल्याने हा अपघात टळला. त्यामुळे तब्बल ४० मिनिटे ही गाडी थांबविण्याचा प्रसंग रेल्वे प्रशासनावर ओढावला होता, हे विशेष.रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जबलपूर-अमरावती एक्सप्रेस ही गाडी नागपूरहून अमरावतीकडे कॉर्डलाईनने येत असताना गोपालनगर रेल्वे फाटकाच्या परिसरात चालकाला लांबून रुळात भेगा पडल्याचे दिसून आले. गाडी पुढे नेल्यास भीषण अपघाताची शक्यता निदर्शनास आल्याने चालकाने प्रसंगावधान दाखविले. ज्या ठिकाणी रुळांवर भेगा पडल्या आहेत, त्या ठिकाणापासून काही अंतरावर चालकाने गाडी थांबविली व अमरावतीच्या स्टेशन प्रबंधकांना सूचना दिली. रेल्वे रुळात भेगा पडल्याची बाब लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. रेल्वे अधिकाऱ्यांची सुध्दा धावपळ सुरु झाली. काही वेळाने रुळांवरील भेगांच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले. हा प्रकार ४० ते ५० मिनिटे सुरू होता. रुळ व्यवस्थित असल्याचे अधिकाऱ्यांनी कळविताच ही गाडी अमरावती स्थानकावर पुढे नेण्यात आली. थंडीमुळे रुळात भेगा पडण्याचा प्रकार होत असल्याचे एका रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, चालकाने सावधगिरी बाळगली नसती तर जबलपूर एक्सप्रेसला भीषण अपघात झाला असता, या बाबीला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. प्रवासी बचावले : गोपालगनरात ४० मिनिटे थांबली गाडीअन् अभियांत्रीकी विभागाची चमू पोहोचलीरुळात भेगा पडल्यामुळे जबलपूर एक्सप्रेसचा अपघात टळल्याची वार्ता रेल्वे अधिकाऱ्यांच्या कानावर पोहचताच एकमेकांशी संवाद सुरु केला. नेमके कोणत्या ठिकाणी रेल्वे रुळात भेगा पडल्या याची माहिती मिळताच बडनेऱ्यातील अभियांत्रिकी विभागाची चमू गोपालनगरात घटनास्थळी पोहोचली. अवघ्या २५ मिनिटातच रुळात पडलेल्या भेगा दुरुस्त करण्यात आल्यात. त्यानंतर ही जबलपूर एक्सप्रेस अमरावती रेल्वे स्थानकावरून पुढे रवाना करण्यात आली.