शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नैसर्गिक स्रोत आटल्याने पाणीटंचाईत भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 01:37 IST

२२ वर्षांनंतर प्रथमच चांदूर रेल्वे शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. शहरात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पुन्हा तीन टँकरची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनाच्या सुरू असलेल्या टँकरला माझी वैयक्तिक आर्थिक मदत असल्याचे मत आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : चांदूर रेल्वे नगर परिषदेत माध्यमांशी संवाद

चांदूर रेल्वे : २२ वर्षांनंतर प्रथमच चांदूर रेल्वे शहराला पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. शहरात सात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पुन्हा तीन टँकरची आवश्यकता आहे. तसेच प्रशासनाच्या सुरू असलेल्या टँकरला माझी वैयक्तिक आर्थिक मदत असल्याचे मत आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले. स्थानिक नगर परिषदेच्या हॉलमध्ये गुरुवारी सायंकाळी पाणीटंचाईविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.चांदूर रेल्वे शहराला पाणी पुरविणाऱ्या मालखेड तलावात केवळ मृत साठा उपलब्ध असून, तलाव पूर्णत: कोरडा पडला आहे. यामुळे चांदूर रेल्वे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याविषयी नगर परिषद हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला आ. वीरेंद्र जगताप, नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, पाणीपुरवठा सभापती महेश कलावटे उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ. जगताप म्हणाले की, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकाऱ्यांकडे टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली होती. परंतु, जिल्हाधिकाºयांनी तलावातील पाणी शहरासाठी पुरेसे असल्याचे सांगितले. शहराची लोकसंख्या ३५ हजार झाली आहे व जनावारांसाठीसुद्धा पाणी आवश्यक आहे, हे समजावून सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी पाच हजार लिटरचे पाच टँकर देण्यास तयार झाले. प्रत्येक टँकरला दिवसा दोन हजारांचा खर्च असला तरी ११०० रुपयेच प्रशासन अदा करू शकणार होते. नगर परिषदेला हे शक्य नसल्याने ही उर्वरित मदत वैयक्तिकरीत्या देणार असल्याचे आ. वीरेंद्र जगताप यांनी यावेळी सांगितले. नगर परिषदेच्या मालकीचे दोन टँकर नावीन्यपूर्ण योजनेतून मिळविले. शहराला पुन्हा तीन टँकरची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. आर्थिक मदत दिली असल्याने टँकरवर बॅनर लावले; ते चुकीचे नसल्याचेही जगताप यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक सतपाल वरठे, प्रफुल्ल कोकाटे, कल्पना लांजेवार, शारदा मेश्राम, शुभांगी वानरे, स्वाती माकोडे, शबाना परवीन हमीद कुरैशी, बंटी माकोडे, अविनाश वानरे, राजू लांजेवार, प्रवण भेंडे, शेख अंबीर, रूपेश पुडके, संदीप शेंडे, दीक्षांत पाटील, सुमेध सरदार उपस्थित होते.