शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

निधीअभावी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांचे ऐरिअर्स अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:40 IST

अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वर्षानुवर्ष तुटपुंजा सहा हजार रुपये मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो ...

अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वर्षानुवर्ष तुटपुंजा सहा हजार रुपये मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ करून राज्य शासनाने कोरोना काळात दिलासा दिला.

कर्मचाऱ्यांचे मानधन वर्गानुसार वाढ करण्यात आली. राज्यभरात २२ हजार ५०० आणि जिल्ह्यात जवळपास ८०० हून अधिक एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१८ पासून मानधनातील तफावत (ऐरिअर्स )फरक बिल म्हणून मिळणार आहे. यासंदर्भात गेल्या ५ ऑक्टोबर रोजी अध्यादेश काढून शासनाने दिवाळीपूर्वी या कर्मचाऱ्यांना ऐरिअर्स वाटप करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात आरोग्य संचालकांनी ३ नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून प्रशासकीय यंत्रणनेने तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. परंतु दिवाळी होऊन महिना उलटल्यानंतरही शासनाकडून निधी न मिळाल्याने जिल्हाभरातील एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांचे ऐरिअर्स अडकले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्त्वावर जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारित ८९२ हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यात आरोग्यसेवक, आरोग्यसेविका लॅब टेक्निशियन अटेंडंट आरोग्य पर्यवेक्षक व अकाऊंटंट यांचा समावेश आहे. सलग तीन ते चार वर्षांत तुटपुंज्या मानधनावर काम केल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी मानधनात वाढ व्हावी, या मागणीसाठी आंदोलने केलीत. त्यानंतरही मागण्या प्रलंबित होत्या. अशातच सध्याच्या सरकारने या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा सुसूत्रीकरण प्रक्रिया राबविण्याबाबत ५ ऑक्टोबर रोजी अध्यादेश काढला. या अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना दिला जाणाऱ्या मानधनाचा वाढीव मोबदला देण्यासाठी अद्यापही शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही.

बॉक्स

कर्मचाऱ्यांच्या चकरा

शासनाने घोषित केल्याप्रमाणे वाढीव मानधनाचा बदला मिळेल, या आशेने दररोज जिल्हा परिषदेतील एनएचएम विभागात संबंधित कर्मचारी लाभाच्या अनुदानासाठी चकरा मारत आहेत. परंतु अद्याप याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आल्यापावली कर्मचाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.