शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

माहेरचा पुरावा नसल्याने महिला परीक्षार्थींना नाकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 21:52 IST

परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर माहेरच्या नावाचा पुरावा नसल्याने तब्बल १० महिला परीक्षार्थिंना परीक्षेला प्रवेश दिला नसल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी एका परीक्षा केंद्रावर घडला.

मोहन राऊतअमरावती : परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर माहेरच्या नावाचा पुरावा नसल्याने तब्बल १० महिला परीक्षार्थिंना परीक्षेला प्रवेश दिला नसल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी एका परीक्षा केंद्रावर घडला. त्यामुळे महिला परीक्षार्थिंना परीक्षा न देताच परत जावे लागले़राज्यात वखार महामंडळाच्यावतीने असिस्टंट या पदासाठी अमरावती येथे दुपारी ४ ते ६ आॅन लाईन पेपर परीक्षा केंद्रावर घेण्यात आला़ अमरावती शहरातील सिटी लॅन्ड येथे परीक्षाकेंद्र होते़ या केंद्रावर १० महिला परीक्षार्थी पेपर सोडविण्यास गेल्या असता त्यांना ओळखपत्र मागण्यात आले़ विवाह होऊन अनेक वर्षे झाल्याने संबंधित महिलांनी सासरच्या आडनावाचे आधार कार्ड दाखविले; मात्र केंद्रप्रमुखांनी हा पुरावा नाकारला. मागील अनेक दिवसांपासून परीक्षेची तयारी केली असताना ओळखपत्रावर सासरच्या नावाची स्वाक्षरी असूनही केंद्रप्रमुखाने त्या महिलांना परीक्षेपासून वंचित ठेवले. यामुळे या महिलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केली आहे़वखार महामंडलाच्या असिस्टंट या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी वर्धा, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यातून गरीब महिला आल्या होत्या. त्यांनी उपलब्धतेनुसार कागदपत्रे सोबत आणली खरी; मात्र परीक्षा केंद्रप्रमुखांना याहीपेक्षा अतिरिक्त कागदपत्र हवे असतील याची कल्पनादेखील नव्हती. त्या महिला थेट परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर त्यांना माहेरचे ओळखपत्र मागण्यात आल्याने त्या दाखवू शकल्या नाहीत. त्यामुळे या क्षुल्लक कारणावरून तसेच परीक्षा मार्गदर्शक सूचनेत अशी कोणतीच अट नसताना परीक्षेला बसू न दिल्यामुळे या महिलांनी प्रशासनाविरूद्ध असंतोष व्यक्त केला़ शासनाने आमच्या तक्रारीची त्वरित दखल घ्यावी, अन्यथा उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, अशी कैफीयत शासनाकडे तक्रारीद्वारे मांडली आहे़