शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

अमरावती जिल्ह्यातील शंभरावर गावांत स्मशानभूमीअभावी  नदी-नाल्यांकाठी होतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:11 IST

Amravati News अमरावती जिल्ह्यातील जवळपास १०० हून अधिक गावांत स्मशानभूमीच नसल्याने मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक़ांना गावाबाहेरील खुल्या जागेत किंवा नदी-नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. 

ठळक मुद्देपावसाळ्यात सर्वाधिक गैरसोय ‘गाव तेथे स्मशानभूमी’ची गरज, प्रशासनाला जाग केव्हा?

  जितेंद्र दखने    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने गाव तिथे स्मशानभूमीची संकल्पना राबिवली. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील जवळपास १०० हून अधिक गावांत स्मशानभूमीच नसल्याने मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक़ांना गावाबाहेरील खुल्या जागेत किंवा नदी-नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. 

सर्वाधिक अडचण पावसाळयाच्या दिवसांत येते. मृताचा अंत्यविधी पार पडण्यासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून निधीदेखील मंजूर केला जातो. मृत्यूनंतर मानवी देहाची विटबंना होऊ नये, अखेरचा प्रवास सुखाचा व्हावा हीच अपेक्षा सर्वांना असते. मात्र, जिल्हाभरातील १९९७ गावांपैकी १०० हून अधिक गावांत आजही स्मशानभूमी  नसल्याने अंत्यविधीसाठी नदी-नाल्ल्याकाठी सोपस्कार पूर्ण करावा लागतो. मात्र याची दखल घेतली जात नसल्याचे बोलते जात आहे.

जनसुविधेतून विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत १४ तालुक्यांतील मागील काही वर्षांत ५०० हून अधिक गावात स्मशानभूमीमध्ये  दहन, दफनभूमी, चबुतऱ्यांचे बांधकाम, पाण्याची सोय, शेडचे बांधकाम, पोचरस्ता, स्मृती उद्यान व अन्य मूलभूत सुविधा, साैंदर्यीकरणाची कामे करण्यात आली आहेत. दरवर्षी स्मशानभूमीची कामे करण्यासाठी जनसुविधा योजनेसाठी चार ते पाच कोटींचा निधी मिळतो. यामधून जिल्हाभरात कामे करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दिलीप मानकर यांनी सांगितले.

सावरपाणी गावात जंगलात अंत्यविधी चिखलदरा तालुक्यातील सावरपाणी या आदिवासीबहुल मूळ गावांच्या पुनर्वसनानंतर त्यापूर्वीही या गावात मृतांच्या अंत्यविधीसाठी अद्यापही स्मशानभूमी नाही. आदिवासी बांधव आजही जंगलात मांडवदेव म्हूणून ओळखल्या जाणाऱ्या खुल्या जागेत अंत्यविधीचा कायर्क्रम पार पाडतात. विशेष म्हणजे स्मशानभूमीत सुविधा तर सोडाच, पायी जाण्यासाठी धड रस्ता नाही. पावसाळाचे दिवसात तर परिस्थिती अधिकच बिकट असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

एकलारा स्मशानभूमीची वानवाअंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील कोकर्डा परिसरातील एकलारा या गावातही स्मशानभूमी नसल्याने येथील गावकऱ्यांना भुलेश्वरी नदीकाठी मृतदेहावर अंत्यविधी पार पाडावे लागतात. विशेष म्हणजे पावसाळयाच्या दिवसांत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. याशिवाय याच परिसरातील चार ते पाच गावांतही स्मशानभूमी नसल्याने अशा गावांत स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून आवश्यक सुविधा निर्माण करून देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार