शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

अमरावती जिल्ह्यातील शंभरावर गावांत स्मशानभूमीअभावी  नदी-नाल्यांकाठी होतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:11 IST

Amravati News अमरावती जिल्ह्यातील जवळपास १०० हून अधिक गावांत स्मशानभूमीच नसल्याने मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक़ांना गावाबाहेरील खुल्या जागेत किंवा नदी-नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. 

ठळक मुद्देपावसाळ्यात सर्वाधिक गैरसोय ‘गाव तेथे स्मशानभूमी’ची गरज, प्रशासनाला जाग केव्हा?

  जितेंद्र दखने    लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने गाव तिथे स्मशानभूमीची संकल्पना राबिवली. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील जवळपास १०० हून अधिक गावांत स्मशानभूमीच नसल्याने मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक़ांना गावाबाहेरील खुल्या जागेत किंवा नदी-नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. 

सर्वाधिक अडचण पावसाळयाच्या दिवसांत येते. मृताचा अंत्यविधी पार पडण्यासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून निधीदेखील मंजूर केला जातो. मृत्यूनंतर मानवी देहाची विटबंना होऊ नये, अखेरचा प्रवास सुखाचा व्हावा हीच अपेक्षा सर्वांना असते. मात्र, जिल्हाभरातील १९९७ गावांपैकी १०० हून अधिक गावांत आजही स्मशानभूमी  नसल्याने अंत्यविधीसाठी नदी-नाल्ल्याकाठी सोपस्कार पूर्ण करावा लागतो. मात्र याची दखल घेतली जात नसल्याचे बोलते जात आहे.

जनसुविधेतून विकासकामे जिल्हा परिषदेमार्फत १४ तालुक्यांतील मागील काही वर्षांत ५०० हून अधिक गावात स्मशानभूमीमध्ये  दहन, दफनभूमी, चबुतऱ्यांचे बांधकाम, पाण्याची सोय, शेडचे बांधकाम, पोचरस्ता, स्मृती उद्यान व अन्य मूलभूत सुविधा, साैंदर्यीकरणाची कामे करण्यात आली आहेत. दरवर्षी स्मशानभूमीची कामे करण्यासाठी जनसुविधा योजनेसाठी चार ते पाच कोटींचा निधी मिळतो. यामधून जिल्हाभरात कामे करण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) दिलीप मानकर यांनी सांगितले.

सावरपाणी गावात जंगलात अंत्यविधी चिखलदरा तालुक्यातील सावरपाणी या आदिवासीबहुल मूळ गावांच्या पुनर्वसनानंतर त्यापूर्वीही या गावात मृतांच्या अंत्यविधीसाठी अद्यापही स्मशानभूमी नाही. आदिवासी बांधव आजही जंगलात मांडवदेव म्हूणून ओळखल्या जाणाऱ्या खुल्या जागेत अंत्यविधीचा कायर्क्रम पार पाडतात. विशेष म्हणजे स्मशानभूमीत सुविधा तर सोडाच, पायी जाण्यासाठी धड रस्ता नाही. पावसाळाचे दिवसात तर परिस्थिती अधिकच बिकट असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

एकलारा स्मशानभूमीची वानवाअंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव जिल्हा परिषद सर्कलमधील कोकर्डा परिसरातील एकलारा या गावातही स्मशानभूमी नसल्याने येथील गावकऱ्यांना भुलेश्वरी नदीकाठी मृतदेहावर अंत्यविधी पार पाडावे लागतात. विशेष म्हणजे पावसाळयाच्या दिवसांत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो. याशिवाय याच परिसरातील चार ते पाच गावांतही स्मशानभूमी नसल्याने अशा गावांत स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करून आवश्यक सुविधा निर्माण करून देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Governmentसरकार