शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकुंज उपसा सिंचनमुळे २२ गावांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:21 IST

सिंचनापासून वंचित असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांना गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे सिंचनाची सुविधा मिळणार आहे. २७८.८० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे सदर गावातील एकूण ७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही उपलब्धी प्राप्त झाली.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : सात हजार हेक्टर क्षेत्रात होणार सिंचनाची सुविधा

अमरावती : सिंचनापासून वंचित असलेल्या तिवसा तालुक्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांना गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे सिंचनाची सुविधा मिळणार आहे. २७८.८० कोटी रुपये खर्चाच्या या योजनेमुळे सदर गावातील एकूण ७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही उपलब्धी प्राप्त झाली.तालुक्यातून जाणाºया अप्पर वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यातून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करावे, अशी मागणी गुरुकुंज मोझरी व परिसरातील शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे ते शक्य नसल्याचा मुद्दा पुढे आला होता. तथापि, या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळावी, अशी आग्रही मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी प्रशासनाकडे सातत्याने लावून धरली. त्यांच्या या मागणीची फलश्रुती म्हणून तत्कालीन शासनाने गुरुकुंज उपसा सिंचन योजनेला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ (नागपूर) यांच्यामार्फत १३ जुलै २००९ नुसार प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार ऊर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत उजव्या मुख्य कालव्यावरून पाण्याची उचल करून तालुक्यातील २२ गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध केले जाणार आहे. भूसंपादन व नलिका वाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे.