शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

अपुऱ्या पावसामुळे संत्राबागा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 01:45 IST

खरीप-रब्बी हंगामात सर्वसाधारण पिके घेत असताना, खस्ता हाल होत आहे. यातून आता संत्राउत्पादक शेतकरी सुटला नसून, मागील चार वर्षांपासून त्याची बिकट स्थिती होत आहे.

ठळक मुद्देसाडेसहा हजार झाडे उत्पादनक्षम : हिरव्या फळांची तोड

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : खरीप-रब्बी हंगामात सर्वसाधारण पिके घेत असताना, खस्ता हाल होत आहे. यातून आता संत्राउत्पादक शेतकरी सुटला नसून, मागील चार वर्षांपासून त्याची बिकट स्थिती होत आहे. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे कमी प्रमाणात फूट व नियमित पाऊस नसल्यामुळे फळाची वाढ झाली नाही तर झाडे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क हिरवी फळे तोडून फेकावी लागत आहे.दिवसेंदिवस भूजलपातळी कमी होत असल्यामुळे संत्राबागा वाचविणे कठीण होत आहे. मोर्शी तालुक्यात ११ हजार हेक्टरवर संत्राझाडे असून, यापैकी साडेसहा हजार झाडे उत्पादनक्षम असल्याचे तालुका कृषी अधिकारी योगेश संगेकर यांनी सांगितले. उर्वरित एक ते पाच वर्षाची झाडे आहेत. यापूर्वी अपुरा पाऊस झाल्याने व फळधारणा टिकून राहण्यासाठी योग्य वातावरण नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळगळती झाली. किंबहुना अनेक बगीचात पोषक वातावरणाअभावी मृग बहर आला नाही.सद्यस्थितीत सिंचनाची स्थिती बिकट आहे. शेतकरी झाडे वाचविण्यासाठी अनेक उपाय करत आहेत. विहिरीचे पाणी पुरत नाही. मोर्शी तालुका ड्राय झोन असल्यामुळे कूपनलिका करता येत नाही. अशा स्थितीत आडोशाला जाऊन कूपनलिका शेतकरी करीत आहेत. यामुळे विहिरीचीही पाण्याची पातळी खाली जात असल्याचे दिसून येत आहे. आसोना येथील शेतकरी दिनेश टिपरे यांना यावर्षी पोषक वातावरणाअभावी मृग बहर घेता आला नाही; उलट झाडे टिकून रहावी म्हणून खर्च होत आहे.संत्रा उत्पादक शेतकरी सधन म्हणून ओळख होती; परंतु अस्मानी सुलतानी संकटामुळे त्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ‘सर सलामत तो पगडी पचास’ म्हणून तो झाडे वाचविण्यासाठी हिरवी फळे तोडून फेकण्याची कसरत करीत आहे.