शहरं
Join us  
Trending Stories
1
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
2
Video: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
4
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
5
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
6
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
7
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
8
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
9
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
10
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
11
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
12
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
13
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
14
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
15
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
16
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
17
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
18
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
19
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
20
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...

असंतुलनामुळे जमिनीवरील वनक्षेत्र घटले

By admin | Updated: June 4, 2014 23:22 IST

नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे.

अमरावती: नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती   वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे. राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी १00 क ोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले होते. मात्र हे लक्ष केवळ कागदावरच राहिले, असे वनक्षेत्राच्या बकाल व्यवस्थेवरून दिसून येते.पर्यावरणाचा समतोल ठेवायचा असेल तर जमिनीवर किमान ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक आहे. परंतु वनक्षेत्राचे प्रमाण घटत असल्याचा अहवाल पुढे आल्याने वृक्ष संगोपन, वृक्ष लागवड आणि पर्यावरणाशी निगडीत राबवित असलेल्या उपाययोजनांची वाट लागल्याचे चित्र आहे. जमिनीवर वनक्षेत्र घटत चालल्याची बाब अतिशय चिंतणीय असली तरी वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने यात भर घालून पर्यावरणाचा असमतोल करण्यास कोणतीही कसर सोडली नाही, हे वास्तव आहे.बेसुमार वृक्षतोडीचा पर्यावरण असमतोलावर परीणाम होत असताना ही वृक्षतोड थांबविण्यासाठी वनविभागाकडून कठोर उपाययोजना केल्या जात नाही, असाच कारभार सुरू आहे. वनक्षेत्र ३३ टक्के व्हावे, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू असले तरी समाजाने सुध्दा वृक्षलागवड आणि संगोपनासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.सामाजिक वनीकरणाचा वाटावृक्ष लागवड आणि संगोपनासाठी येथील सामाजिक वनीकरण विविध उपक्रम राबविते. मात्र या विभागाने रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करून पर्यावरण समतोलासाठी खारीचा वाटा उचलला आहे. जिल्हय़ात १२ तालुकय़ांमध्ये २७ रस्तांवर ११९.३0 कि.मी. लांब रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या रोपट्यांचे संगोपन व संवर्धन व्यवस्थितरित्या करण्यात आल्याने उन्हाळय़ातही जनावरे, शेतकरी व वाटसरूंना वृक्षाची सावली घेता आली, असे सामाजिक वनीकरणाचे वाहाणे यांनी सांगितले.वलगाव ते दर्यापूर रस्ता हे जिवंत उदाहरण आहे.यंदा ४७४ कि.मी.च्या रस्त्यावर ४ लाख, ७४ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे.