शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

असंतुलनामुळे जमिनीवरील वनक्षेत्र घटले

By admin | Updated: June 4, 2014 23:22 IST

नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे.

अमरावती: नैसर्गिक संतुलनासाठी जमिनीवर ३३ टक्के वनक्षेत्र असणे आवश्यक असताना नुकत्याच घेण्यात आलेल्या एका सर्वेक्षणाअंती   वनक्षेत्र हे केवळ २१ टक्के असल्याला धक्कादायक अहवाल हाती आला आहे. राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी १00 क ोटी वृक्ष लागवडीचे लक्ष ठेवले होते. मात्र हे लक्ष केवळ कागदावरच राहिले, असे वनक्षेत्राच्या बकाल व्यवस्थेवरून दिसून येते.पर्यावरणाचा समतोल ठेवायचा असेल तर जमिनीवर किमान ३३ टक्के वनक्षेत्र आवश्यक आहे. परंतु वनक्षेत्राचे प्रमाण घटत असल्याचा अहवाल पुढे आल्याने वृक्ष संगोपन, वृक्ष लागवड आणि पर्यावरणाशी निगडीत राबवित असलेल्या उपाययोजनांची वाट लागल्याचे चित्र आहे. जमिनीवर वनक्षेत्र घटत चालल्याची बाब अतिशय चिंतणीय असली तरी वायू, जल, ध्वनी प्रदूषणाने यात भर घालून पर्यावरणाचा असमतोल करण्यास कोणतीही कसर सोडली नाही, हे वास्तव आहे.बेसुमार वृक्षतोडीचा पर्यावरण असमतोलावर परीणाम होत असताना ही वृक्षतोड थांबविण्यासाठी वनविभागाकडून कठोर उपाययोजना केल्या जात नाही, असाच कारभार सुरू आहे. वनक्षेत्र ३३ टक्के व्हावे, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू असले तरी समाजाने सुध्दा वृक्षलागवड आणि संगोपनासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.सामाजिक वनीकरणाचा वाटावृक्ष लागवड आणि संगोपनासाठी येथील सामाजिक वनीकरण विविध उपक्रम राबविते. मात्र या विभागाने रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करून पर्यावरण समतोलासाठी खारीचा वाटा उचलला आहे. जिल्हय़ात १२ तालुकय़ांमध्ये २७ रस्तांवर ११९.३0 कि.मी. लांब रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या रोपट्यांचे संगोपन व संवर्धन व्यवस्थितरित्या करण्यात आल्याने उन्हाळय़ातही जनावरे, शेतकरी व वाटसरूंना वृक्षाची सावली घेता आली, असे सामाजिक वनीकरणाचे वाहाणे यांनी सांगितले.वलगाव ते दर्यापूर रस्ता हे जिवंत उदाहरण आहे.यंदा ४७४ कि.मी.च्या रस्त्यावर ४ लाख, ७४ हजार रोपांची लागवड केली जाणार आहे.