शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील नद्यांचे अस्तित्व धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 01:25 IST

तालुक्यात नदी-नाल्यांतील पाणीसाठा संपल्यानंतरसुद्धा नदीपात्रात खड्डे करून पाणी उपसण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम भूजलपातळीवर होणार आहे. दरम्यान, जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे झाले आहेत.

ठळक मुद्देसिंचनासाठी नदीपात्रात खड्डे : जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे

श्यामकांत पाण्डेय ।लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यात नदी-नाल्यांतील पाणीसाठा संपल्यानंतरसुद्धा नदीपात्रात खड्डे करून पाणी उपसण्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम भूजलपातळीवर होणार आहे. दरम्यान, जंगलातील कृत्रिम पाणवठेही कोरडे झाले आहेत.मेळघाटातील लहान-मोठे नदी-नाले मेळघाटातील सिंचनाचे सर्वात मोठे स्रोत म्हणून ओळखले जातात. तापी, गडगा, खंडू, खापरा या नद्यांसह इतर लहान-मोठे नालेसुद्धा पाण्याचे स्रोत म्हणून काम करीत आहेत. परंतु, तीन-चार वर्षांपासून मेळघाटातसुद्धा पाऊस कमी प्रमाणात पडल्यामुळे मार्च महिन्यापासून नदी-नाले आटत चालले आहेत. नदीपात्रातील उरले सुरले पाणी सिंचनासाठी वापरून घेतल्यानंतर उन्हाळी मुगासारख्या पिकांसाठी आणखी पाण्याची आवश्यकता भासत असल्याने लोकांनी नदीपात्रात अक्षरश: विहीरसदृश्य खड्डे खोदून त्यात लागलेल्या पाण्यात मोटरपंप टाकून सिंचनाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. या प्रकारात प्रशासनाने पुढाकार घेत अंकुश लावलेला नाही, प्रबोधन केले नाही वा कुणी पुढे येऊन तक्रार केल्याचेही अद्याप निदर्शनास आलेले नाही.सिंचनासाठी पर्याय ठरणार तापदायकमेळघाटात शेती वगळता व्यवसाय नसल्याने सर्वांचे लक्ष भरघोस पीक काढून आर्थिक उत्पन्न वाढविण्याकडे असते. त्याकरिता उन्हाळी पीक घेण्याकडे कल वाढलेला आहे. विहीर आणि बोअरवेलचे पाणी दिवसेंदिवस खाली जात असल्यामुळे सिंचनाची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत जवळपासच्या नदी-नाल्यांतून पाणी उपसण्याचा प्रताप सुरू असल्यामुळे मे आणि जून महिन्यातील ताप सहन करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.निसर्गाने मेळघाटला भरभरून दिले. क्षुल्लक स्वार्थापोटी मानवाने पर्यावरणाचा सत्यानाश केला. अवैध सिंचनाविरुद्ध कारवाई होणे आवश्यक आहे.- रामदास जयस्वाल, पर्यावरणप्रेमी, शिरपूरशेतीसाठी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पर्यावरणाचे नुकसान समर्थनीय ठरू शकत नाही. संबंधित विभागाने उपशाकडे लक्ष द्यावे.- तुलसीराम सोनकर,शेतकरी, धारणी