शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

धान्य बाजारावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: March 8, 2015 00:05 IST

शेतकऱ्यांना झालेले अल्प उत्पन्न, वाढलेला वाहतूक खर्च त्यामुळे शेतकरी खर्चापूरतेच धान्य बाजारात विक्रीकरिता आणत आहेत.

अमरावती : बँंकेचे कर्ज एकरकमी परत द्यावे लागत असल्याने आता बहुतांश शेतकरी शेती हंगामासाठी बचत गटातून कर्ज घेत आहेत. त्यामुळे बचत गट शेतकऱ्यांचा आधार ठरत आहेत.निपाणी देवरी येथील ६८ वर्षीय शेतकरी लक्ष्मण कोसमकार यांच्याकडे ४ एकर शेती आहे. दरवर्षी उत्पादन खर्च वजा जाता काहीच उरत नसून २०१४ मध्ये त्यांनी खरीप पिकांसाठी बचतगटाकडून २० हजार रुपये कर्ज घेतले. त्याआधारे सोयाबीन, तुरीची लागवड केली. मात्र, ऐन फुलोरावर सोयाबीनचे पीक असताना पावसाने दांडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. तसेच तूर पिकावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पिकही बुडाले. त्यामुळे कोसमकार यांना बचतगटाचे कर्ज फेडणे अशक्य होते. मात्र महिन्याचे व्याज वरचेवर भरल्याने मुद्दल देण्यासाठी अवधी मागितला. नंतर पैशाची तडजोड करून रबी हंगामात दोन एकरात हरभऱ्याची पेरणी केली. त्यातही हरभरा संवगणीदरम्यान वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मोठी फजिती झाली. पण पर्याय नव्हता. कारण खरीप पीक बुडाले. कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. ही भिस्त हरभरा पिकावर असल्याने धावपळीत नियोजन केले. मळणीयंत्र बोलावून हरभरा काढला. ज्यांनी संकटात हातभार लावला त्याचे देणे अगत्याचे समजून थेट मशीनमधून काढलेला हरभरा अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणला आहे. (प्रतिनिधी)मासिक व्याजदराची सवलतबचत गटापेक्षा बँकेचे कर्ज का घेत नाही, असे शेतकरी कोसमकार यांना विचारले असता ते म्हणाले, बँकेचे कर्ज घेतल्यास एकदम व्याजासह द्यावे लागतात. एकतर निसर्गाची साथ नाही. त्यामुळे जेमतेम हाती आलेले पीक तोकडे, त्यात बँकेची एकरकमी द्यावी लागणारी देणी अशक्य होते. म्हणूनच बचत गटाकडून कर्ज घेणे परवडते.एका मुलाचा आधारलक्ष्मणराव कोसमकार यांना दोन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा यवतमाळ येथे बसस्थानकावर गोळ्या-बिस्किटे विकून आपल्या संसाराचा गाडा हाकतो. त्यामुळे ते मदत करू शकत नाही. उलट आम्हीच त्याला देतो. दुसरा मुलगा अमरावतीत येऊन गवंडी काम करतो. त्याच्या मजुरीवर घरखर्च चालते. सत्तरीच्या उंबरठ्यावर आल्यानंतर या मुलाच्या आधारे शेतीची कामे करीत आहे, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.