शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

धान्य बाजारावर दुष्काळाचे सावट

By admin | Updated: March 8, 2015 00:05 IST

शेतकऱ्यांना झालेले अल्प उत्पन्न, वाढलेला वाहतूक खर्च त्यामुळे शेतकरी खर्चापूरतेच धान्य बाजारात विक्रीकरिता आणत आहेत.

अमरावती : बँंकेचे कर्ज एकरकमी परत द्यावे लागत असल्याने आता बहुतांश शेतकरी शेती हंगामासाठी बचत गटातून कर्ज घेत आहेत. त्यामुळे बचत गट शेतकऱ्यांचा आधार ठरत आहेत.निपाणी देवरी येथील ६८ वर्षीय शेतकरी लक्ष्मण कोसमकार यांच्याकडे ४ एकर शेती आहे. दरवर्षी उत्पादन खर्च वजा जाता काहीच उरत नसून २०१४ मध्ये त्यांनी खरीप पिकांसाठी बचतगटाकडून २० हजार रुपये कर्ज घेतले. त्याआधारे सोयाबीन, तुरीची लागवड केली. मात्र, ऐन फुलोरावर सोयाबीनचे पीक असताना पावसाने दांडी मारल्याने सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. तसेच तूर पिकावर अळ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे पिकही बुडाले. त्यामुळे कोसमकार यांना बचतगटाचे कर्ज फेडणे अशक्य होते. मात्र महिन्याचे व्याज वरचेवर भरल्याने मुद्दल देण्यासाठी अवधी मागितला. नंतर पैशाची तडजोड करून रबी हंगामात दोन एकरात हरभऱ्याची पेरणी केली. त्यातही हरभरा संवगणीदरम्यान वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मोठी फजिती झाली. पण पर्याय नव्हता. कारण खरीप पीक बुडाले. कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. ही भिस्त हरभरा पिकावर असल्याने धावपळीत नियोजन केले. मळणीयंत्र बोलावून हरभरा काढला. ज्यांनी संकटात हातभार लावला त्याचे देणे अगत्याचे समजून थेट मशीनमधून काढलेला हरभरा अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीला आणला आहे. (प्रतिनिधी)मासिक व्याजदराची सवलतबचत गटापेक्षा बँकेचे कर्ज का घेत नाही, असे शेतकरी कोसमकार यांना विचारले असता ते म्हणाले, बँकेचे कर्ज घेतल्यास एकदम व्याजासह द्यावे लागतात. एकतर निसर्गाची साथ नाही. त्यामुळे जेमतेम हाती आलेले पीक तोकडे, त्यात बँकेची एकरकमी द्यावी लागणारी देणी अशक्य होते. म्हणूनच बचत गटाकडून कर्ज घेणे परवडते.एका मुलाचा आधारलक्ष्मणराव कोसमकार यांना दोन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा यवतमाळ येथे बसस्थानकावर गोळ्या-बिस्किटे विकून आपल्या संसाराचा गाडा हाकतो. त्यामुळे ते मदत करू शकत नाही. उलट आम्हीच त्याला देतो. दुसरा मुलगा अमरावतीत येऊन गवंडी काम करतो. त्याच्या मजुरीवर घरखर्च चालते. सत्तरीच्या उंबरठ्यावर आल्यानंतर या मुलाच्या आधारे शेतीची कामे करीत आहे, असे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.