शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दुष्काळाची चाहूल, शेतकरी धास्तावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 01:28 IST

यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही १३ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्धेअधिक पेरण्या रखडल्या आहेत.

ठळक मुद्देपावसाचा जोर ओसरला : आपत्कालीन पीक नियोजनासाठी कृषी विभाग गाफील

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या पावसाळ्याचे १२० पैकी ४० दिवस झाले असतानाही १३ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी कमी आहे. विशेष म्हणजे, २४ जूनला मान्सूनचे आगमन झाल्यानंतर सक्रिय न झाल्याने जुलै उजाडला तरी जिल्ह्यातील अर्धेअधिक पेरण्या रखडल्या आहेत. येत्या १७ तारखेपर्यंत पावसाची ही स्थिती कायम राहणार असल्याची हवामानतज्ज्ञांनी वर्तविली. त्यामुळे सलग तीन वर्षांपासून दुष्काळ अन् नापिकीने आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकरी पुन्हा दुष्काळाच्या स्थितीने धास्तावला आहे.उत्पादनखर्चाच्या तुलनेत एकाही शेतमालास हमीभाव मिळालेला नाही. खरीप कर्जासाठी बँका शेतकऱ्यांना माघारी पाठवित आहेत. कर्जही नाही अन् कर्जमाफीही नाही, या अवस्थेमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना यंदाच्या हंगामात पावसाळ्याच्या ४० दिवसानंतरही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने अल्प कालावधीतील मूग, उडीद आदी पिके बाद होणार आहेत. त्यामुळे पर्यायी पिके कोणती घ्यावी, यासाठीचे आपत्कालीन पीक नियोजन सांगण्यास कृषी विभाग अन् कृषी विद्यापीठ समोर आलेले नाहीत. राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यातच कृषी विभाग गाफील असेल, तर शेतकऱ्यांनी अपेक्षा तरी कोणाकडून करावी, असा बळीराजाचा सवाल आहे.यंदाच्या पावसाळ्यात १० जुलैपर्यंत पावसाची २३५ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात १५७ मिमी पाऊस झालेला आहे. ही टक्केवारी ६७ आहे. यामध्ये धारणी तालुका वगळता उर्वरित १३ तालुक्यांची सरासरी ही ५५ ते ७० टक्क्यांपर्यंतच आहे.वार्षिक सरासरीच्या १९ टक्केच पावसाची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. या आठवड्यात वातावरण ढगाळलेले असताना पाऊस मात्र बेपत्ता आहे. त्यामुळे अर्धेअधिक क्षेत्रावरील पेरण्या रखडल्या आहेत. जमिनीत आर्द्रता नाही. भूजलात प्रचंड घट आहे. सिंचन विहिरींनी तळ गाठलेला आहे. ही स्थिती यंदाही दुष्काळाची चाहूल देणारी असल्याने सद्यस्थितीत बळीराजा धास्तावला आहे.हवामानाची सद्यस्थितीमान्सूनचा अक्ष सध्या उत्तर भारतात सरकल्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. पुढील १७ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पावसाचे प्रमाण अपेक्षापेक्षा कमी राहील. सध्या हिंदी महासागर, अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात कोणतीही मोठी हवामान प्रणाली कार्यरत नसल्यामुळे विदर्भ व महाराष्ट्रातील पाऊस थंडावला आहे. ताबडतोब कमी दाबाचा पट्टा किंवा द्रोणीय स्थिती तयार होण्याची शक्यता नसल्याने हीच स्थिती पुढील पाच ते सहा दिवस कायम राहणार असल्यावे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.