शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख हेक्टर बाधित उत्पादनात ५१ टक्क्यांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 22:07 IST

यंदाच्या हंगामात बोंड अळीमुळे १ लाख ३ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीे बाधित झाली व उत्पादनात ५१ टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल शनिवारी कृषी विभागाने जिल्हाधिकाºयांना दिला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. सध्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत.

ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना अहवाल : नांदगाव, दर्यापुरात ८० टक्क्यांवर नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात बोंड अळीमुळे १ लाख ३ हजार ८०० हेक्टरवरील कपाशीे बाधित झाली व उत्पादनात ५१ टक्क्यांची घट अपेक्षित असल्याचा प्राथमिक अहवाल शनिवारी कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. सध्या बाधित क्षेत्राचे संयुक्त पंचनामे सुरू आहेत.बियाणे कंपन्यांकडून भरपाई व ‘एनडीआरएफ’ची मदत मिळावी, यासाठी गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनाम्याचे आदेश गुरुवारी जिल्ह्यधिकाऱ्यांनी सर्व तालुका यंत्रणांना दिलेत व दोन दिवसांत अहवाल मागविला. प्राथमिक अहवालापेक्षा जास्त प्रत्यक्ष नुकसान असल्याचा शेतकºयांचा आरोप आहे. ५ डिसेंबरच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयावर कपाशीवरील गुलाबी बोंड अळी व तुडतुड्यांमुळे बाधित झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल उपसचिव सु.ह. उमरीकर यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी या पत्राच्या अनुषंगाने सर्व तहसीलदार, बीडीओ व तालुका कृषी अधिकारी यांना कपाशीचे पंचनामे करण्याचे आदेश गुरुवारी दिले होते.बाधित तालुक्यातील सरासरी नुकसानबोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात हेक्टरी ८४९ किलो रुईचे नुकसान झाल्याने सरासरी उत्पादनात ५१ टक्क्यांनी घट होणार आहे. यामध्ये सर्वाधिक दर्यापूर तालुक्यात ८० टक्के, नांदगाव खंडेश्वर ७८, अमरावती, चांदूर बाजार, भातकुली, अंजनगाव सुर्जी, धारणी व चिखलदरा तालुक्यात ५०, चांदूर रेल्वे २५, धामणगाव रेल्वे ६०, मोर्शी ५५, वरूड १०, तिवसा ४० व अचलपूर तालुक्यात ६० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.रुईचे उत्पादन हेक्टरी ८४९ किलोने कमीबोंड अळीमुळे हेक्टरी ८४९ किलो रुईचे उत्पादन कमी होणार आहे. यामध्ये भातकुली तालुक्यात सर्वाधिक १,०५६ किलो, अमरावती ८४३, चांदूर रेल्वे ८३५, धामणगाव रेल्वे ७२२, नांदगाव खंडेश्वर ८४४, मोर्शी ८८१, वरूड ८१०, चांदूर बाजार ९४१, तिवसा ९३७, अचलपूर ९५०, अंजनगाव सुर्जी ९२१, दर्यापूर ९१४, धारणी ४७२ व चिखलदरा तालुक्यात ५२५ किलो रुईच्या उत्पादनात घट येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

टॅग्स :cottonकापूस