शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

अटी-शर्तींची सक्ती, नाफेड केंद्रे ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:15 IST

जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे.

ठळक मुद्देव्यापाºयांची पाच लाख केंद्रांवर सात हजार क्विंटलची खरेदीआॅनलाईन नोंदणी अनिवार्य शेतकºयांना धरले वेठीसमूग, उडीद, ज्वारी, कापसाचीही आवक कमी

वीरेंद्रकुमार जोगी ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील दहा केंद्रांवर नाफेडद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू आहे. मागील आठ दिवसांत या केंद्रांवर ३६८ शेतकºयांचे ८ हजार २९ क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आले. यातुलनेत व्यापाºयांद्वारा यंदाच्या हंगामात हमीपेक्षा कमी भावाने ४ लाख ४५ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी केली. शाककीय खरेदी केंद्रावर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तींचा भडीमारासोबतच एफएक्यू निकषाचा फटका शेतकºयांना नाहक बसत आहे. यामुळे नाफेड, पणन व सीसीआयची खरेदी केंद्रे ओस पडली आहेत.यंदाचा हंगाम सुरू झाला असतानाही नाफेडची केंदे सुरू झाली नसल्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिळेल त्या भावात सोयाबीन बाजार समित्यांमध्ये विकावे लागले. व्यापाºयांनीही आधारभूत किमतीपेक्षा कमी भावाने सोयाबीनची खरेदी केली. यामध्ये शेतकºयांना कोट्यवधींचा फटका बसला. नाफेडच्या खरेदी केंद्रावर संबंधित शेतकºयांवर सात-बारा, बँक खात्याची झेरॉक्स, अधारकार्ड यासह सोयाबिनची आर्द्रता आदी अटी लादण्यात आल्या आहेत.यंदाच्या हंगामात सोयाबीन सवंगणीच्या काळात अवकाळी पाऊस असल्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, सोयाबीनची प्रतवारी खराब झाल्यामुळे डागी सोयाबीन खरेदी केंद्रांवर नाकारल्याने शेतकºयांना खुल्या बाजारात विकावा लागला. व्यापाºयांवर नियंत्रण नसल्यामुळे त्यांची मनमानी सुरू आहे. यामध्ये सरळ शेतकºयांना फटका बसत आहे.व्यापाºयांद्वारे ३,८५० क्विंटल कापसाची खरेदीयंदाच्या हंगामात पणनला २९, तर सीसीआयद्वारा ५९ क्विंटल कापसाची ४,३२० रूपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आली. यातुलनेत व्यापाºयांद्वारा आजपर्यंत ३,८५० क्विंटल कापसाची ४,१०० ते ४४०० रूपये दराने खरेदी करण्यात आली. शासन केंद्रांवर आॅनलाइन नोंदणीसह अटी व शर्तींचा भडिमार असल्यानेच शेतकºयांनी पाठ फिरविली आहे. येत्या काळात भाववाढीची शक्यता असल्याने पणनची केंद्र ओस पडण्याची भीती वाढली आहेमूग, उडीद, ज्वारीच्या खरेदीवर परिणामशासकीय धान्य खरेदी सुरू झाल्यानंतर बाजार समित्यांमध्ये मुग, उडीद व ज्वारीची आवक होत आहे. शेतकरी शासनाला धान्य न विकता थेट व्यापाºयांशी सौदे करीत असल्याचे चित्र आहे. बाजार समित्यांमध्ये ५१ शेतकºयांनी ५५३ क्विंटल मुग, ६७ शेतकºयांनी ५०७ क्विंटल उडीद विक्री झाला. शेतकºयांनी मोठ्या संख्येत व्यापाºयांकडे मुग व उडीदाची विक्री केली आहे. यंदा कमी पावसामुळे मुग व उडिदाचे उत्पादन प्रभावित झाले आहे. ज्वारी उत्पादक शेतकरी आपला माल थेट व्यापाºयांकडे घेउन जात असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन, मूग, उडीद व ज्वारीची खरेदी सुरू झाली आहे. मात्र बाजार समितीमध्ये शेतकरी शेतमाल विक्रीस आणत आहेत. मात्र, जिल्ह्याभरात शेतमालाची शासकीय खरेदी अत्यल्प असल्याचे चित्र आहे. केंद्रावर विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी व खरेदी करताना लावलेल्या अटी व शर्तीमुळे शेतकºयांत नाफेड यंत्रणेविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. बाजार समित्यांचे पदाधिकारी हा खेळ निमूटपणे पाहत असून शेतकरी हिताच्या बाता करणारे लोकप्रतिनिधीही गप्प बसल्यामुळे शेतकºयांचा वाली कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये थट्टा सुरू असल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे.जिल्ह्यातील १२ केंद्रांवर सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. शेतकºयांना आॅनलाइन नोंदणीत अडचण नाही. मात्र, यंदाचे बहुतांश सोयाबीन एफएक्यू दर्जाचा असल्यामुळे खरेदी मंदावली आहे.- रमेश पाटील,जिल्हा विपणन अधिकारी