शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या चुकांमुळेच शेतकरी थकीत कर्जदार

By admin | Updated: July 5, 2015 00:14 IST

खरीप हंगाम २०१३-१४ मधील शेती पीककर्जाचे पुनर्गठन करण्यास बँकांनी उदासीनता दाखविल्यामुळेच जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ७६१ शेतकरी थकबाकीदार राहिलेत.

गजानन मोहोड अमरावतीखरीप हंगाम २०१३-१४ मधील शेती पीककर्जाचे पुनर्गठन करण्यास बँकांनी उदासीनता दाखविल्यामुळेच जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ७६१ शेतकरी थकबाकीदार राहिलेत. या थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यास बँका आता नकार देत आहेत. प्रत्यक्षात या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे, आदेश मुंबई उच्च न्यायालयाने व शासनाने दिले होते. याचा फटका यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बसला आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीचा अभाव२०१४-१५ मधील राज्यातील भयावह दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमिवर राज्यस्तरीय बँकिंग कमेटीने (नोव्हेंबर २०१४) मध्ये २५ नोव्हेंबरच्या शासन निर्णयाच्या आधारे सर्व बँकांना पीककर्ज हंगाम २०१४-१५ व मुदती कर्जाच्या हप्त्यांचे रूपांतर, पुनर्गठन करण्याचे आदेश देऊन पुन्हा पीककर्ज देण्याचे सूचित केले. काही बँकांनी मोठ्या गावांमध्ये मेळाव्याद्वारे माहिती दिली व जबाबदारीतून मुक्त झाले. मुळात विभागीय बँक प्रबंधकांचे शाखांवर नियंत्रण नसल्याने निर्णयाची अंमलबजावणी पूर्णत: झालेली नाही. पुनर्गठनाची प्रक्रिया जुनीचज्या गावाची पैसेवारी ५० पैशांच्या आत असेल तेथे शासनाकडून महसुलात मदत, सोयी-सवलती, बँकांकडून खातेदारांचे पीक व मुदती कर्जाचे रूपांतर, फेररूपांतर, पुनर्गठन व पुन्हा नव्याने पीक कर्ज देण्याचे धोरण नवीन नसून ते जुनेच आहे. बँकांकडून यावर्षी मात्र संभ्रम निर्माण केला जात आहे. बँकांद्वारा २०१३-१४ मध्ये राज्यस्तरीय बँकिंग कमिटी व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले व माहिती दडविली. यामुळे शेतकरी थकबाकीदार झालेत. आता बँका त्यांना कर्ज नाकारत असल्याची शोकांतिका आहे. - बाळासाहेब वैद्य, कृषी,बँकिंग तज्ज्ञ,माजी मुख्य व्यवस्थापक (एसबीआय)जिल्ह्यात १ लाख ३८ हजार शेतकरी थकीत कर्जदार आहेत. यापैकी ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला, त्यांना कर्जवाटप करण्यात येत आहे. २०१३-१४ मध्ये पुनर्गठनाबाबतची रक्कम न मिळाल्याने पुनर्गठन झालेली नाही ते शेतकरी थकबाकीदार आहेत. - गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था)गेल्या हंगामातील कर्जदारांचे कर्ज रूपांतरण, पुनर्गठन व नव्याने कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. २०१३-१४ मध्ये ५० पैशांच्या आत आणेवारी असलेल्या गावातील शेतकऱ्यांनी याचा लाभ न घेतल्याने ते थकीत कर्जदार आहेत. तेव्हा योजनेविषयी प्रचार, प्रसार नव्हता. - अनंत खोरगडे, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.