शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

पावसाअभावी सागवान वृक्षांवरील फुलोर ओसरला

By admin | Updated: July 14, 2014 23:42 IST

अमरावती : पावसाळा सुरु झाला की, मेळघाटात सागवान वृक्षांवर फुलोर बहरतो. मात्र, यंदा पावसाचा पत्ताच नसल्याने सागवान वृक्षांवर फुलोर बहरला नाही. त्यामुळे भविष्यात सागवान वृक्षांची संख्या कमी

गणेश वासनिक - अमरावतीअमरावती : पावसाळा सुरु झाला की, मेळघाटात सागवान वृक्षांवर फुलोर बहरतो. मात्र, यंदा पावसाचा पत्ताच नसल्याने सागवान वृक्षांवर फुलोर बहरला नाही. त्यामुळे भविष्यात सागवान वृक्षांची संख्या कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर दुर्मीळ वनौषधींचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा सध्या आभाळाकडे लागल्या आहेत. विदर्भाचे वनवैभव म्हणून नावरुपास आलेल्या मेळघाटात वन्यप्राणी, वृक्षे, झाडाझुडपांना देखील पावसाचे वेध लागले आहेत. पावसाळ्यात सागवान वृक्षांवर फुलोर बहरतो. फुलोर बहरल्यानंतर काही दिवसांनी सागवान वृक्षांच्या बिया तयार होऊन त्या जमिनीवर पडतात. उन्हाळ्यात या बिया फुटून त्या जमिनीत शिरतात व पावसाळ्यात बिया अंकुरतात. या प्रक्रियेनुसार मेळघाटात सागवान वृक्षांची वाढ होते. यंदा पावसाअभावी ७७२ वृक्ष प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येण्याचे चिन्हे आहेत. पाऊस नसल्याने मेळघाटात गवत प्रजाती उगवल्याच नाही. गवत उगवले नसल्याने गवतावर अवलंबून असलेल्या तृणभक्षी प्राण्याच्या आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तृणभक्षी प्राण्यांना गवत नाही. त्यामुळे ही संख्या रोडावत चालली आहे. तर वाघांचे भक्ष असलेल्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या कमी होत चालल्याने वाघांचे जीवन धोक्यात आले आहे. पावसावर एकुणच जीवनचक्र अवलंबून असून यंदा सागवान वृक्षांची संख्या कमी होणार असल्याने लाखो रुपयांचे वनविभागाचे नुकसान होण्याचे संकेत आहे. पावसाअभावी वृक्षांसह वन्यप्राणी, पशुपक्षांना नुकसान होण्याचे भाकित वनअधिकाऱ्यांनी वर्तविले आहे.