शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: June 23, 2014 23:39 IST

देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असताना सुखी संपन्न असलेला बळीराजा आज देशोधडीला लागला आहे. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

वरुड : देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असताना सुखी संपन्न असलेला बळीराजा आज देशोधडीला लागला आहे. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकरी पेरणीकरिता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. महागाईमुळे मजुरीचे दरसुध्दा वधारल्याने शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूर सुखी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा कोणाला कळणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, व्यापाऱ्याकडून सातत्याने होणारी शेतकऱ्यांची लूट आणि व्यापाऱ्यांना पाठीशी घालणारे राजकारणी असा त्रिकोण तयार झाला आहे. एकामेकांवर कुरघोडी करुन झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात शेतकरी भरडला जात आहे. शासन शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचे अधिक हित जोपासते. कृषी विभागाचे अधिकारी केवळ बोटावर मोजण्याइतक्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ देतात. एवढेच नव्हे तर ७० टक्के शेतकऱ्यांना कृषी विभागाचे कार्यालयदेखील माहीत नाही. कारण कार्र्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना खुर्चीसोबत संवाद साधावा लागतो. शेतकऱ्यांच्या कार्यशाळांना शेतकरीच अनुपस्थित असतात, असा गवगवा होतो. परंतु राजकारणी यातही राजकारण करतात. या देशाचा खरा शेतकरी कोण हे शोधण्याची वेळ आली आहे. राजकारणीच शेतकरी, व्यापारी आणि उद्योगपती बनतात. यामुळे शेतकऱ्यांची वाट लागली आहे. शेतीच्या मशागतीसाठी महिलांचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. काही गर्भश्रीमंत शेतकऱ्यांनी मिरची, कपाशी ठिंबक सिंचनावर लावली असली तरी निसर्गाच्या पावसाशिवाय तिची वाढ खुंटत आहे. तर तापमानसुध्दा मोठ्या प्रमाणावर असल्याने ठिबक सिंचनावर घेतली जाणारी पिकेसुध्दा करपू लागली. तसेच विद्युत भारनियमनाला सुध्दा शेतकरी कंटाळले असल्याने तुषार किंवा ठिबक सिंचन चालविणे दुरापास्त झाले आहे. संत्रा उत्पादक शेतकरी मृग बहराच्या फुटण्याची वाट पाहत असून पावसाअभावी शेतकऱ्यांची ही परवड होत आहे. मृगाने दगा दिल्याने आंबिया बहराचीही फूट नाही. कपाशी, सोयाबीन, तूर पिकासह आदी पिके २० दिवसांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)