शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले

By admin | Updated: June 23, 2014 23:39 IST

देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असताना सुखी संपन्न असलेला बळीराजा आज देशोधडीला लागला आहे. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

वरुड : देशाच्या जडणघडणीत शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असताना सुखी संपन्न असलेला बळीराजा आज देशोधडीला लागला आहे. २० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.मृग नक्षत्र कोरडेच गेल्याने शेतकरी पेरणीकरिता पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. महागाईमुळे मजुरीचे दरसुध्दा वधारल्याने शेतकऱ्यांपेक्षा शेतमजूर सुखी, असे म्हणण्याची वेळ आली आहे. यामुळे समस्याग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा कोणाला कळणार? हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. यावर्षी कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसत आहे. पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न भंगण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, व्यापाऱ्याकडून सातत्याने होणारी शेतकऱ्यांची लूट आणि व्यापाऱ्यांना पाठीशी घालणारे राजकारणी असा त्रिकोण तयार झाला आहे. एकामेकांवर कुरघोडी करुन झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नात शेतकरी भरडला जात आहे. शासन शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचे अधिक हित जोपासते. कृषी विभागाचे अधिकारी केवळ बोटावर मोजण्याइतक्या लोकांना शासकीय योजनांचा लाभ देतात. एवढेच नव्हे तर ७० टक्के शेतकऱ्यांना कृषी विभागाचे कार्यालयदेखील माहीत नाही. कारण कार्र्यालयात गेलेल्या शेतकऱ्यांना खुर्चीसोबत संवाद साधावा लागतो. शेतकऱ्यांच्या कार्यशाळांना शेतकरीच अनुपस्थित असतात, असा गवगवा होतो. परंतु राजकारणी यातही राजकारण करतात. या देशाचा खरा शेतकरी कोण हे शोधण्याची वेळ आली आहे. राजकारणीच शेतकरी, व्यापारी आणि उद्योगपती बनतात. यामुळे शेतकऱ्यांची वाट लागली आहे. शेतीच्या मशागतीसाठी महिलांचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. काही गर्भश्रीमंत शेतकऱ्यांनी मिरची, कपाशी ठिंबक सिंचनावर लावली असली तरी निसर्गाच्या पावसाशिवाय तिची वाढ खुंटत आहे. तर तापमानसुध्दा मोठ्या प्रमाणावर असल्याने ठिबक सिंचनावर घेतली जाणारी पिकेसुध्दा करपू लागली. तसेच विद्युत भारनियमनाला सुध्दा शेतकरी कंटाळले असल्याने तुषार किंवा ठिबक सिंचन चालविणे दुरापास्त झाले आहे. संत्रा उत्पादक शेतकरी मृग बहराच्या फुटण्याची वाट पाहत असून पावसाअभावी शेतकऱ्यांची ही परवड होत आहे. मृगाने दगा दिल्याने आंबिया बहराचीही फूट नाही. कपाशी, सोयाबीन, तूर पिकासह आदी पिके २० दिवसांपासून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. मशागतीची कामे पूर्ण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)