शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
3
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
4
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
5
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
6
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
7
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
8
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
9
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
10
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
11
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
12
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
13
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
14
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
15
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
16
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
17
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
18
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
19
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
20
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!

कोरडवाहू पिके ‘कोमा’त

By admin | Updated: July 15, 2015 00:03 IST

मागील चार आठवड्यांपासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

शेतकऱ्यांवर संकट : वरुणराजाने मारली तब्बल २७ दिवसांपासून दडीजितेंद्र दखने अमरावतीमागील चार आठवड्यांपासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या पिकांची पेरणी झाली त्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. २४ जूनपासून पावसाने दीर्घ दडी मारली आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातील समाधानकारक पाऊस झाल्याने अवघ्या हजार ५ लाख ४३ हजार ४४७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने७६.१ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. अद्याप ३२०.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसाने दडी मारल्याने अद्यापही १ लाख ७१ हजार ५०३ हेक्टरवर पेरण्या शिल्लक आहेत.यंदा मात्र जिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली होती. ७ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. ११ ते १७ जूनपर्यंत जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, वरुड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, भातकुली, अमरावती या तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यात ५ लाख हजार ४३ हेक्टर ४७ क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र २४ जूनपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, तीळ, ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे.काही पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. तर काही भागात पेरणी केल्यापासून पाऊस नसल्याने कोरडवाहू शेतातील दुबार पेरणीचे संकट कायम आहे. मागील २७ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे १ लाख ७१ ५०३ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पाऊस मात्र बरसला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ओलिताखालील पिके काही प्रमाणात सुरक्षितजिल्ह्यात मागील २७ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते पाणी देऊन पिके जगवीत आहेत. मात्र ज्यांच्याकडे ही सुविधा नाही, अशा कोरडवाहू शेतातील पिके माना टाकू लागल्याने या आठवडाभरात पाऊस न आल्यास उभ्या पिकांवर नांगर फिरवावा लागेल. गावागावांत रंगत आहेत पावसाचीच चर्चायंदा खरिपातील पेरण्या केल्यानंतर वरूणराजाने तब्बल चार आठवड्यांपासून पावसाने लांब दडी मारल्यामुळे गावोगावी केवळ पाऊस कधी येणार याचाच अंदाज घेणाऱ्या गप्पा गोष्टी रंगत आहेत.हलक्या आणि मध्यम जमिनीतील पिके पाऊस नसल्याने करपून जातील, भारी जमिनीतील पिके तग धरून राहतील. मात्र कोरडवाहूसह सर्वच पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.- दत्तात्रेय मुळे, कृषी अधीक्षक अधिकारी .