शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

कोरडवाहू पिके ‘कोमा’त

By admin | Updated: July 15, 2015 00:03 IST

मागील चार आठवड्यांपासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

शेतकऱ्यांवर संकट : वरुणराजाने मारली तब्बल २७ दिवसांपासून दडीजितेंद्र दखने अमरावतीमागील चार आठवड्यांपासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या पिकांची पेरणी झाली त्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. २४ जूनपासून पावसाने दीर्घ दडी मारली आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातील समाधानकारक पाऊस झाल्याने अवघ्या हजार ५ लाख ४३ हजार ४४७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने७६.१ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. अद्याप ३२०.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसाने दडी मारल्याने अद्यापही १ लाख ७१ हजार ५०३ हेक्टरवर पेरण्या शिल्लक आहेत.यंदा मात्र जिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली होती. ७ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. ११ ते १७ जूनपर्यंत जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, वरुड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, भातकुली, अमरावती या तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यात ५ लाख हजार ४३ हेक्टर ४७ क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र २४ जूनपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, तीळ, ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे.काही पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. तर काही भागात पेरणी केल्यापासून पाऊस नसल्याने कोरडवाहू शेतातील दुबार पेरणीचे संकट कायम आहे. मागील २७ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे १ लाख ७१ ५०३ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पाऊस मात्र बरसला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ओलिताखालील पिके काही प्रमाणात सुरक्षितजिल्ह्यात मागील २७ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते पाणी देऊन पिके जगवीत आहेत. मात्र ज्यांच्याकडे ही सुविधा नाही, अशा कोरडवाहू शेतातील पिके माना टाकू लागल्याने या आठवडाभरात पाऊस न आल्यास उभ्या पिकांवर नांगर फिरवावा लागेल. गावागावांत रंगत आहेत पावसाचीच चर्चायंदा खरिपातील पेरण्या केल्यानंतर वरूणराजाने तब्बल चार आठवड्यांपासून पावसाने लांब दडी मारल्यामुळे गावोगावी केवळ पाऊस कधी येणार याचाच अंदाज घेणाऱ्या गप्पा गोष्टी रंगत आहेत.हलक्या आणि मध्यम जमिनीतील पिके पाऊस नसल्याने करपून जातील, भारी जमिनीतील पिके तग धरून राहतील. मात्र कोरडवाहूसह सर्वच पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.- दत्तात्रेय मुळे, कृषी अधीक्षक अधिकारी .