शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

कोरडवाहू पिके ‘कोमा’त

By admin | Updated: July 15, 2015 00:03 IST

मागील चार आठवड्यांपासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

शेतकऱ्यांवर संकट : वरुणराजाने मारली तब्बल २७ दिवसांपासून दडीजितेंद्र दखने अमरावतीमागील चार आठवड्यांपासून साधारणपणे २७ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. ज्या पिकांची पेरणी झाली त्या पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे. २४ जूनपासून पावसाने दीर्घ दडी मारली आहे. त्यामुळे या आठवड्यात पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातील समाधानकारक पाऊस झाल्याने अवघ्या हजार ५ लाख ४३ हजार ४४७ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. जुलै महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने७६.१ टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. अद्याप ३२०.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. पावसाने दडी मारल्याने अद्यापही १ लाख ७१ हजार ५०३ हेक्टरवर पेरण्या शिल्लक आहेत.यंदा मात्र जिल्ह्यात जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही दिवस पावसाने दडी मारली होती. ७ जूनपासून पावसाला सुरुवात झाली. ११ ते १७ जूनपर्यंत जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, वरुड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, चिखलदरा, दर्यापूर, भातकुली, अमरावती या तालुक्यात पाऊस झाला. जिल्ह्यात ५ लाख हजार ४३ हेक्टर ४७ क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र २४ जूनपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, तीळ, ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे.काही पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. तर काही भागात पेरणी केल्यापासून पाऊस नसल्याने कोरडवाहू शेतातील दुबार पेरणीचे संकट कायम आहे. मागील २७ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने सुमारे १ लाख ७१ ५०३ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असले तरी पाऊस मात्र बरसला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ओलिताखालील पिके काही प्रमाणात सुरक्षितजिल्ह्यात मागील २७ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते पाणी देऊन पिके जगवीत आहेत. मात्र ज्यांच्याकडे ही सुविधा नाही, अशा कोरडवाहू शेतातील पिके माना टाकू लागल्याने या आठवडाभरात पाऊस न आल्यास उभ्या पिकांवर नांगर फिरवावा लागेल. गावागावांत रंगत आहेत पावसाचीच चर्चायंदा खरिपातील पेरण्या केल्यानंतर वरूणराजाने तब्बल चार आठवड्यांपासून पावसाने लांब दडी मारल्यामुळे गावोगावी केवळ पाऊस कधी येणार याचाच अंदाज घेणाऱ्या गप्पा गोष्टी रंगत आहेत.हलक्या आणि मध्यम जमिनीतील पिके पाऊस नसल्याने करपून जातील, भारी जमिनीतील पिके तग धरून राहतील. मात्र कोरडवाहूसह सर्वच पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे.- दत्तात्रेय मुळे, कृषी अधीक्षक अधिकारी .