शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

सुकळी डंपिंग यार्ड धुमसतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:02 IST

उन्हाळ्याला प्रारंभ होताच नजीकच्या सुकळी कंपोस्ट डेपोला आग लागण्यास सुरूवात झाली असून, मागील पंधरवड्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट होते. ती आग आटोक्यात आली असली तरी अजूनही येथील एका भागात आग धुमसतच आहे. या आगीच्या घटनेला मनपा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाळ्याला प्रारंभ होताच नजीकच्या सुकळी कंपोस्ट डेपोला आग लागण्यास सुरूवात झाली असून, मागील पंधरवड्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट होते. ती आग आटोक्यात आली असली तरी अजूनही येथील एका भागात आग धुमसतच आहे. या आगीच्या घटनेला मनपा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.शहरातील संपूर्ण कचरा सुकळी डम्पिंग यार्डमध्ये साठवला जातो. मागील १५ दिवसांपासून येथे आगीच्या तुरळक घटना घडत आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश येते. मात्र, डम्पिंग यार्डवरील कचऱ्यातील मिथेन वायूशी उन्हाचा वारंवार संपर्क येऊन पुन्हा आग लागत असल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार लागणाºया या आगीमुळे या भागातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आगीसोबत बाहेर पसरणाºया धुराचा परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार जाणवू लागले आहेत.शहरातून दररोज निघणारा २०० टन कचरा सुकळी स्थित ९.३८ हेक्टरवर पसरलेल्या कम्पोस्ट डेपोत विना प्रक्रिया साठविला जातो. तेथील दुर्गंधीमुळे सुकळी, रसुलपूर या ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत असताना आगीच्या घटनांमुळे त्यात भर पडली आहे. औरंगाबादप्रमाणे सुकळी येथील ग्रामस्थांचाही येथे कचरा टाकण्यास विरोध होत असून, आगीच्या घटनांमुळे व ती आग पंधरा दिवसांपासून धुमसत असल्याने असंतोष वाढू लागला आहे. त्यावर प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन उपाययोजना चालविल्या आहेत.प्रशासनाच्या उपाययोजनाकंपोस्ट डेपोत वेळोवेळी लागत असलेल्या आगी विझविण्याकरिता अग्निशमन विभागाचे एक वाहन कायमस्वरूपी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तेथे ठेवण्यात आले आहे. आग नियंत्रणाची जबाबदारी स्वास्थ्य निरीक्षक किशोर संगेले यांच्याकडे देण्यात आली. जुन्या बोअरवेलची दुरुस्ती व नवीन बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. नजीकच्या शेतातील विहिरीचे पाणी आग विझविण्याकरिता घेण्याच्या सूचना आयुक्त पवारांनी केल्या आहेत.का पेटतो कचरा?मागील अनेक वर्षांपासून सुकळी कंपोस्ट डेपोत सात ते आठ लाख टन कचरा विनाप्रक्रिया पडला आहे. ७० ते ८० फूट थराचा हा कचरा मिथेन वायूमुळे पेट घेतो. उन्हात कचरा तापतो; त्यात कचºयामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात.