शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
4
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
5
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
6
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
7
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
8
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
9
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
10
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
11
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
12
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
13
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
14
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
15
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
16
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
17
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
18
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
19
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
20
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली

सुकळी डंपिंग यार्ड धुमसतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:02 IST

उन्हाळ्याला प्रारंभ होताच नजीकच्या सुकळी कंपोस्ट डेपोला आग लागण्यास सुरूवात झाली असून, मागील पंधरवड्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट होते. ती आग आटोक्यात आली असली तरी अजूनही येथील एका भागात आग धुमसतच आहे. या आगीच्या घटनेला मनपा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अनिवार्य

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उन्हाळ्याला प्रारंभ होताच नजीकच्या सुकळी कंपोस्ट डेपोला आग लागण्यास सुरूवात झाली असून, मागील पंधरवड्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट होते. ती आग आटोक्यात आली असली तरी अजूनही येथील एका भागात आग धुमसतच आहे. या आगीच्या घटनेला मनपा प्रशासनाने दुजोरा दिला आहे.शहरातील संपूर्ण कचरा सुकळी डम्पिंग यार्डमध्ये साठवला जातो. मागील १५ दिवसांपासून येथे आगीच्या तुरळक घटना घडत आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश येते. मात्र, डम्पिंग यार्डवरील कचऱ्यातील मिथेन वायूशी उन्हाचा वारंवार संपर्क येऊन पुन्हा आग लागत असल्याने प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार लागणाºया या आगीमुळे या भागातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आगीसोबत बाहेर पसरणाºया धुराचा परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार जाणवू लागले आहेत.शहरातून दररोज निघणारा २०० टन कचरा सुकळी स्थित ९.३८ हेक्टरवर पसरलेल्या कम्पोस्ट डेपोत विना प्रक्रिया साठविला जातो. तेथील दुर्गंधीमुळे सुकळी, रसुलपूर या ग्रामस्थांना प्रचंड त्रास होत असताना आगीच्या घटनांमुळे त्यात भर पडली आहे. औरंगाबादप्रमाणे सुकळी येथील ग्रामस्थांचाही येथे कचरा टाकण्यास विरोध होत असून, आगीच्या घटनांमुळे व ती आग पंधरा दिवसांपासून धुमसत असल्याने असंतोष वाढू लागला आहे. त्यावर प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन उपाययोजना चालविल्या आहेत.प्रशासनाच्या उपाययोजनाकंपोस्ट डेपोत वेळोवेळी लागत असलेल्या आगी विझविण्याकरिता अग्निशमन विभागाचे एक वाहन कायमस्वरूपी सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तेथे ठेवण्यात आले आहे. आग नियंत्रणाची जबाबदारी स्वास्थ्य निरीक्षक किशोर संगेले यांच्याकडे देण्यात आली. जुन्या बोअरवेलची दुरुस्ती व नवीन बोअरवेल तयार करण्यात येणार आहे. नजीकच्या शेतातील विहिरीचे पाणी आग विझविण्याकरिता घेण्याच्या सूचना आयुक्त पवारांनी केल्या आहेत.का पेटतो कचरा?मागील अनेक वर्षांपासून सुकळी कंपोस्ट डेपोत सात ते आठ लाख टन कचरा विनाप्रक्रिया पडला आहे. ७० ते ८० फूट थराचा हा कचरा मिथेन वायूमुळे पेट घेतो. उन्हात कचरा तापतो; त्यात कचºयामुळे निर्माण होणारा मिथेन वायू पेट घेतो. यामुळे आगी लागण्याच्या घटना घडतात.