शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

मागणीच्या तुलनेत ४० टक्केच दुष्काळी मदत

By admin | Updated: January 12, 2015 22:42 IST

अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे.

अमरावती : अपुऱ्या पावसामुळे बाधित झालेल्या ४ लाख ५३ हजार शेतकऱ्यांनी मागणी असलेल्या ३०२ कोटी ५१ हजारापैकी १२५ कोटी ७९ लाखाची मदत सर्व तालुक्यात वितरीत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात वितरित करावयाच्या एकूण अनुदानाच्या तुलनेत केवळ ४० टक्केच हा निधी आहे. किती गावामधील किती शेतकऱ्यांना हा निधी वाटप करावा हा पेच निर्माण झाला आहे. उपलब्ध निधी वर्णाक्षरानुसार गावाची निवड करून वितरीत करण्यात येणार असल्याची महसूल विभागाने दिली. खरीपाचा हंगाम सरासरीपेक्षा कमी पाऊस, निकृष्ठ सोयाबीन बियाणे, दुबार, तिबार पेरणी, दोन महिना उशीराने झालेली पेरणी, रोगाचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोऱ्यावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत पाऊस न आल्यामुळे पीक उद्धवस्त झाले. जिल्ह्याची पैसेवारी ४६ पैसे १५ नोव्हेंबरला शासनाने घोषित केली, राज्य विधी मंडळाच्या नागपूर अधिवेशनात शासनाने ११ डिसेंबर २०१४ ला दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यासाठी ७ हजार कोटी रूपयांचे पॅकेज घोषित केले. शासनाच्या घोषणेच्या २७ दिवसानंतर शासन निर्णय जाहीर झाला. जिल्ह्यात ३०२ कोटी ५१ लाखाची मदत अपेक्षीत असताना ४० टक्के नुसार १२५ कोटी ७९ लाख रूपये जिल्ह्यास ८ जानेवारीला मिळाले व शुक्रवार ९ जानेवारीला जिल्ह्यातील १४ तहसील कार्यालयास हा निधी वर्ग करण्यात आला. या निधीचे वाटप कसे आणि कोणत्या गावामधील शेतकऱ्यांना हा पेच महसूल यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. उपलब्ध निधी हा मदतीचा पहिला टप्पा असला तरी जिल्ह्यास १७६ कोटी २२ लाख रूपये दुष्काळी मदत मिळणे अद्याप बाकी आहे.