शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

झेब्रा क्रॉसिंगवर वाहनचालकांचे अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST

फोटो मनीषकडे पान १ लोकमत विशेष अमरावती : अपघात होऊ नये, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग ...

फोटो मनीषकडे

पान १

लोकमत विशेष

अमरावती : अपघात होऊ नये, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंग असते. झेब्रा क्रॉसिंग पादचाऱ्यांसाठी असून, ते त्यांना वापरता यावेत, अशी त्यामागील भूमिका आहे. मात्र, त्याच भूमिकेला अमरावती शहरात छेद दिला जात आहे. झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करू नये, हा साधा नियमही येथे पाळला जात नसल्याचे वास्तव आहे. झेब्रा क्रॉसिंगवर स्टॉप लाईन असते. या लाईनच्या पुढे वाहन गेल्यास दंडात्मक कारवाई अपेक्षित आहे.

वाहतुकीच्या समस्येवर सर्वच स्तरातून प्रचंड ओरड होताना दिसत आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांकडून कारवाईचा दंड लाखो रुपयांनी वसूल केला जातो. मात्र, त्या तुलनेत वाहतूक व्यवस्था सुधारणेसाठी पुढाकार घेतला जात नाही. शहरातील अनेक चौक व महत्त्वपूर्ण रस्त्यांवरील झेब्रा क्रॉसिंग धूसर झाले आहेत. कुणीही वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहने उभी करत नाहीत. वाहतूक पोलीसदेखील त्यांना हटकत नाहीत. शहरातील विविध संस्था, संघटना, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन मुले अशांकडून शहरातील सिग्नलवर लोकांना वाहतुकीचे किमान नियम पाळले जावे म्हणून प्रयत्न होताना दिसतात. मात्र, त्यालाही यश आलेले दिसत नाही.

बॉक्स

प्रत्येकाला पुढे जाण्याची घाई

सिग्नल हिरवा होण्यास १० सेकंद बाकी असताना वाहनचालक जोरात हॉर्न वाजवायला सुरुवात करतात. अनेकदा सिग्नल हिरवा होण्यापूर्वीच वाहनचालक पुढे निघालेले सर्रास दिसतात. राजकमल चौक, पंचवटी चौक, इर्विन चौक, शेगाव नाका चौक येथे हे चित्र सर्रास पाहावयास मिळते.

////////////

फूटपाथवर अतिक्रमण, मग चालायचे कुठून?

रस्त्याच्या कडेला फूटपाथवर अतिक्रमण वाढले आहे. चौक ओलांडताना पादचाऱ्यांना अनेकदा जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांचे तर प्रचंड हाल होतात. रस्ता ओलांडताना अनेकदा झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी केलेली असतात. त्यात सिग्नल न पाळण्याची शर्यत लागलेली असल्यामुळे रस्ता क्रॉस करत असलेल्या लोकांवरच ओरडत वाहनचालक निघून जातात.

/////////////////////

काय आहे नियम?

झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असलेल्या पहिल्या लाईनवर आपले वाहन उभे करायला पाहिजे, असा नियम सांगतो. मात्र, शहरातील अनेक चौकात जेथे झेब्रा क्रॉसिंग आहे, तेथेच दुभाजक संपतो. त्यामुळे दुभाजकाच्या समांतर रेषेत वाहन लावणे योग्य अशी वाहनचालकांचा गोड गैरसमज झालेली आहे.