अमरावती : चालकाने आता विनामास्क ऑटोरिक्षा चालविल्यास त्याच्याकडून थेट तीन हजारांची दंड रक्कम वसूल करण्यात येणार आहे तसेच विनामास्क प्रवाशांकडून प्रत्येकी ३०० रुपये दंड वसूल केले जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी रामभाऊ गिते यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई फक्त अमरावती शहरात करण्यात येईल. ऑटोरिक्षात चालक व प्रवासी यांच्यात प्लास्टिकचा पारदर्शी पडदा राहील तसेच एकावेळी फक्त दोन प्रवाशांची वाहतूक करता येईल. जास्त प्रवासी आढळून आल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल. शहरात चार हजारांपेक्षा जास्त ऑटोरिक्षा आहेत. लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतरही ही नियमावली कायम राहील, असे गिते म्हणाले.
--------
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे चालकाने विनामास्क ऑटोरिक्षा चालविल्यास तीन हजारांच्या दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रवाशांना ३०० रुपये दंड ठोठावला जाईल. ऑटोरिक्षात दोनच प्रवाशांची मुभा आहे.
रामभाऊ गिते, आटीओ
बॉक्स:
११६ जणांवर दंडात्मक कारवाई
दोन दिवसांत ११६ विनामास्क प्रवासी व ऑटोरिक्षाचालकांना मोटार वाहन निरीक्षकांनी दंडित करून १८ हजार ४०० रुपयांचा महसूल गोळा केला आहे.