शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

अचलपुरात कोरोनासोबत पिण्याच्या पाण्याचेही संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:11 IST

शहरातील अब्बासपुरा, सारायपुरा, सरमसपुरा, माळवेशपुरा, देवडी, जीवनपुरा या भागात १५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित स्वरूपाने होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण ...

शहरातील अब्बासपुरा, सारायपुरा, सरमसपुरा, माळवेशपुरा, देवडी, जीवनपुरा या भागात १५ दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित स्वरूपाने होत असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अचलपूर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागांतर्गत अचलपूर शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. शहरात पाणीपुरवठा करण्याकरिता शासनाच्यावतीने आयएसएसडीपी व अमृत योजनेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून भरतीचे पाणी देण्यासाठी खर्च केले असताना अमृत योजनेतील गोंधळामुळे अचलपूर शहरातील बहुसंख्य भागात पाणी समस्या निर्माण झालेली आहे. एकीकडे कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असताना अचलपुरात नागरिकांना कोरोनाशी सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची वेळ आलेली आहे. नगरपालिका कोणत्याही पर्यायी व्यवस्था करीत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामना करावा लागत आहे. एकीकडे उन्हाचे चटके बसत असताना पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा नागरिकांना कसरत करावी लागत आहे. अचलपूर नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने या भागात पाण्याचे योग्य वितरण होत नाही त्या ठिकाणी व उन्हाळा पूर्वीच नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र ते करण्यात दिरंगाई झाली असून, ९० लाखांच्या कामाचा तांत्रिक मंजुरी करतात पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित असल्याने अडचणी येत असल्याचे प्रशासनातर्फे बोलल्या जात आहे.

अमृत योजनेचे काम निकृष्ट अमृत योजनेच्या पाईपलाईनचे काम अनेक भागात निकृष्ट झाल्याचा आरोप अनेक वेळा नगरसेवकांनी लावलेला आहे. अनेक भागांत अमृत योजनेच्यावतीने नवीन पाईपलाईन टाकण्यात आली. परंतु, अनेक भागात जुनी पाईपलाईन सुद्धा त्याला जोडण्यात आली आहे. त्यामुळे जुनी पाईपलाईन मधून कनेक्शन देण्यात येत असताना पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अचलपुरात इतर अनेक भागात पाण्याचा थेंब पोहचत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.