शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

तीन नगरपंचायतींचा स्वप्नभंग

By admin | Updated: March 31, 2015 00:21 IST

तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायत ऐवजी क दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा निर्णय मार्च २०१४ मध्ये

अंतिम अधिसूचना नाही : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया गजानन मोहोड ल्ल अमरावतीतालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायत ऐवजी क दर्जाची नगरपंचायत स्थापनेचा निर्णय मार्च २०१४ मध्ये आघाडी सरकारने घेतला होता. याविषयी राजपत्रात पूर्व अधिसूचना प्रसिद्ध झाली. मात्र अंतिम अधिसूचना सोमवार पर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त न झाल्यामुळे या ठिकाणी प्रशासकाऐवजी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धारणी या ठिकाणी नगर पंचायतीचे स्वप्न तुर्तास भंगले आहे.औद्योगिक नगर विकास विभागाने महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम याचे कलम ३४१- क चे पोटकलम (१), (१ क) आणि (२) यांच्या तरतुदीनूसार शासन राजपत्रात उद्घोषीत प्रसिद्ध झाली. यावर आक्षेप, हरकती मागविल्या. तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धारणी व भातकुली तालुक्यात कुठेही आक्षेप नसल्याने शासनाला अहवाल पाठविण्यात आले. २२ मार्च २०१५ रोजी नगर विकास विभागाने एक आदेश जारी करुन नगरपंचायतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची यथोचीत रचना होईपर्यंतच्या कालावधीत संबंधीत अधिकार प्रशासकाला देण्याचा निर्णय घेतला आहे. विभागात दोन तालुका मुख्यालयी प्रशासकअमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असणाऱ्या संग्रामपूर व मोताळा आणि नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे ग्राम पंचायत सरपंच यांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या ठिकाणी तहसीलदार यांची प्रशासक म्हणून १४ मार्चला नियुक्ती करण्यात आली. हिच प्रक्रिया जिल्ह्यात देखील राबवायला पाहिजे होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दिरंगाई केल्याचा नागरीकांचा आरोप आहे.सामान्य प्रशासन विभाग फाईल पडूनजिल्हा प्रशासनाद्वारे नगरविकास विभागाला नगरपंचायतींचे प्रस्ताव पाठविण्यात आले. नगर विकास विभागाने मंजुरीसाठी सामान्य प्रशासन विभागाला पाठविले आहे. व मुख्यमंत्र्याचा असणाऱ्या सामान्य प्रशासन विभागात हि फाईल धूळखात आहे.तिवसा, भातकुली व नांदगाव खंडेश्वर या तालुका मुख्यालयी होणाऱ्या नगरपंचायत साठी अंतिम अधिसूचना अद्याप प्राप्त नाही त्यामुळे आयोगाचे आदेशाप्रमाणे ग्रामपंचात निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.राम सिद्धभट्टी,प्रभारी अधिकारी (नगरपरिषद)