शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

स्मार्ट सिटीचा स्वप्नभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:26 IST

स्मार्ट सिटीसंदर्भात या आठवड्यात पुन्हा जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये अमरावती १५ व्या स्थानावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही अमरावती आंध्र प्रदेशाची राजधानी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये पहिल्या शंभरतही अमरावती शहर नव्हते. तथापि, स्मार्ट सिटीच्या नावावर करोडोंचा चुराडा झालेला आहे.

ठळक मुद्दे१५ व्या स्थानावरील अमरावती महाराष्ट्रातील नव्हे आंध्र प्रदेशातीलडीपीआरचे दोन कोटी जाणार परत

अमरावती : स्मार्ट सिटीसंदर्भात या आठवड्यात पुन्हा जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये अमरावती १५ व्या स्थानावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, ही अमरावती आंध्र प्रदेशाची राजधानी असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या स्मार्ट सिटीच्या यादीमध्ये पहिल्या शंभरतही अमरावती शहर नव्हते. तथापि, स्मार्ट सिटीच्या नावावर करोडोंचा चुराडा झालेला आहे.चार दिवसांपूर्वी केंद्र शासनाद्वारा स्मार्ट सिटीचे रँकिंग जाहीर करण्यात आले. यामध्ये ३६०.२१ गुण घेऊन नागपूर देशात प्रथम स्थानावर, तर १४९.४ गुणांसह अमरावती पंधराव्या स्थानावर आहे. या अमरावतीच्या नावामुळे शहरात चर्र्चेेचा विषय बनला आहे. तथापि, ही अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी असल्याचे स्पष्ट होताच नागरिकांचा हिरमोड झाला. स्मार्ट सिटीच्या डीपीआरसाठी महापालिकेला दोन कोटीचा निधी प्राप्त झाला होता. अमरावती आता स्मार्ट सिटी होणार नाही, हे स्पष्ट झाल्याने दोन वर्षा$ंपासून स्वप्न दाखवून जनतेच्या कराचा पैसा उडविल्याचा आरोप विरोधी पक्षनेता बबलू शेखावत यांनी केला आहे. शासनाला दोन कोटी परत करण्याची तयारी महापालिका प्रशासन करीत असल्याने शहर कधीच स्मार्ट सिटी होणार नाही. भारतातसुद्धा एकही शहर स्मार्ट सिटी झालेले नाही. अमरावतीकरांना खोटी आश्वासने देऊन आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या नावावर प्रशासनाने किती पैसा खर्च केला, याचा लेखाजोखा शेखावत यांनी आयुक्तांना पत्राद्वारे मागितला आहे.स्मार्ट सिटीच्या यादीत शहराचे नाव नाही. याविषयीचा निधी अद्याप परत केलेला नाही. याबाबत काय करायचे, ते लवकरच ठरवू.- संजय निपाणेआयुक्त, महापालिका.