शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

धामणगावचे डॉ. अशोक भैया कोरोनाग्रस्तांंसाठी देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:09 IST

गावागावांत ऑक्सिमीटरचे वितरण, मोफत सल्ला, ४० दशकांपासून वैद्यकीय सेवेत धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अतिवेगाने वाढणारा प्रादुर्भाव ...

गावागावांत ऑक्सिमीटरचे वितरण, मोफत सल्ला, ४० दशकांपासून वैद्यकीय सेवेत

धामणगाव रेल्वे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अतिवेगाने वाढणारा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गावोगावी पल्स ऑक्सिमीटरचे वितरण व मोफत सल्ला देत गरीब कोरोनाग्रस्तांसाठी धामणगावचे डॉ.अशोक भैया हे देवदूत ठरले आहेत.

धामणगाव तालुक्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. अचानकपणे पसरत असलेल्या या संसर्गाने ग्रामीण जनता भयभीत होत आहे. त्यात रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा, जिल्हा ठिकाणी बेडची मारामार, उपचार कसा व कुठे करावा याबाबत अज्ञान यामुळे अनेक रुग्णांचा घरीच उपचाराविना मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र, या काळात शहरातील अमर शहीद भगतसिंग चौक येथे ४२ वर्षांपासून गरिबांच्या सेवेत असलेले डॉ. भैया यांचा दवाखाना कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनी देणारे सल्ला केंद्र बनले आहे. वैद्यकीय क्षेत्रात बदलत्या काळानुसार अनेक डॉक्टरांची फी सुद्धा औषध-गोळ्यांएवढीच वाढली आहे. मात्र, डॉ. अशोक भैया यांची दवाखान्याची फी आजही तेवढीच अल्प आहे. कोरोनाकाळात आपल्या चिमुकल्याची कशी काळजी घ्यावी, याविषयी ते पालकांना एका वर्षापासून मोफत मार्गदर्शन करीत आहेत. वैद्यकीय सेवा हा व्यवसाय झालेला दिसत असला तरी डॉ. भैया हे यापासून अलिप्त आहेत. एखाद्या गरीब रुग्णाजवळ उपचाराची फी तर सोडाच, औषधी आणि गावापर्यंत जाण्यासाठी तिकिटाला स्वतः जवळचे पैसेसुद्धा ते अनेकदा रुग्णांना देतात. रेल्वे स्टेशन परिसरात आजारी पडलेल्या रुग्णांना ते मोफत औषधोपचार करीत आहेत.

कोरोनाच्या काळात ठरले देवदूत

तालुक्यातील अनेक गरीब रुग्ण त्यांच्या दवाखान्यात येतात. कोरोनाकाळात रुग्णाने भयभीत होऊ नये म्हणून त्यांनी गावोगावी ऑक्सिमीटर देऊन घरीच दर तीन तासांनी ऑक्सिजन पातळी परीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना शासकीय रुग्णालयात कशी सेवा उपलब्ध होईल, यासाठी त्यांची धडपड सुरू असते. डॉ. भैया यांनी सुरू केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे अनेक सामाजिक संघटनांकडून कौतुक होत आहे.

------------------

रुग्णांनी दर चार तासांनी शरीराचे तापमान तपासावे. ताजे आणि गरम अन्न खा. जास्तीत जास्त पेय पदार्थ घ्यावे. हात स्वच्छ व खोली हवेशीर ठेवावी. सहा मिनिटे चालल्यानंतर ऑक्सिजन पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास ताबडतोब सूचित करा. ताप असल्यास, श्वास घेण्यास त्रास असल्यास डॉक्टरांनी सुचवलेल्या रुग्णात दाखल व्हा.

- डॉ. अशोक भय्या, धामणगाव रेल्वे