शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीत योगदान’ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:12 IST

विद्वत परिषदेत निर्णय, बी.ए. (इतिहास) चे विद्यार्थी गिरविणार धडे, महामानवाच्या कायार्चा व्यापक परिचय अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ...

विद्वत परिषदेत निर्णय, बी.ए. (इतिहास) चे विद्यार्थी गिरविणार धडे, महामानवाच्या कायार्चा व्यापक परिचय

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. (इतिहास) अभ्यासक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीत योगदान’ या घटकाचा समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी झालेल्या ऑनलाईन विदवत परिषदेच्या सभेत याअनुषंगाने निर्णय घेण्यात आला. विद्यापीठात पहिल्यांदाच पदवी अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार शिकविले जाणार आहे.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या इतिहास मंडळाने बी.ए. भाग १, २ व ३ च्या अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यासाठी १४ फेब्रुवारी २०२० रोजी अंजनगाव सुर्जी येथील श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयात कार्यशाळा घेण्यात आली होती. या कार्यशाळेतील सहभागी प्राध्यापकांनी अभ्यासक्रमात सुचविलेले बदल लक्षात घेऊन अभ्यासक्रम बदल समितीची स्थापना करण्यात आली. या अभ्यासक्रमांची मांडणी अमरावती विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या बैठकीत २ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

इतिहास अभ्यास मंडळाचे अध्यक्ष संतोष बनसोड यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या उभारणीतील योगदान व भारताच्या स्वातंत्र्याची १९४५ ची योजना’ या घटकाचा सर्वानुमते करण्यात आला. मानव्यविज्ञान विद्याशाखेच्या १० सप्टेंबर २०२० रोजी झालेल्या बैठकीत या विषयाला मान्यता प्रदान करण्यात आली.

-----------------------

विद्या परिषदेत शुक्रवारी शिक्कामोर्तब

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ४ डिसेंबर रोजी विद्या परिषदेची ऑनलाईन बैठक घेतली. यात सदस्यांनी चर्चा करून बी.ए. भाग २ सत्र ४ च्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रविषयक कार्य व त्यांची १९४५ ची स्वातंत्र्याची योजना’ हा घटक समाविष्ट करण्याचा निर्णय सवार्नुमते घेतला.

-------------------

कोट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मानवमुक्तिदाते होते. त्यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी बी.ए. इतिहास अभ्यासक्रमात ‘डॉ.आंबेडकरांचे राष्ट्रउभारणीत योगदान’ हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. हीच खरी त्यांना महापरिनिर्वाण दिनी आदरांजली ठरेल.

- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

--------------------

कोट

घटनाकार व अस्पृश्योद्धारक एवढ्याच मर्यादित स्वरूपात न ठेवता डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान विद्यार्थी व समाजासमोर येणे गरजेचे होते. म्हणून विद्या परिषदेने हा निर्णय घेतला आहे.

- संतोष बनसोड, अध्यक्ष, इतिहास मंडळ, अमरावती विद्यापीठ.