शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वरूडमध्ये ठिबक, तुषार सिंचनाचे ३४२ प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: February 25, 2016 00:12 IST

विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन करुन सिंचनाकरिता शेतकऱ्याकडून ठिबक आणि तुषार सिंचनाचे ...

अनुदान नाही : २ कोटी ९३ लाख १२ हजारांचा निधी अपेक्षितवरूड : विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत जलव्यवस्थापन करुन सिंचनाकरिता शेतकऱ्याकडून ठिबक आणि तुषार सिंचनाचे सन २०१४-१५ चे ३४२ प्रस्ताव अनुदानाअभावी तालुका कृषी कार्यालयात धूळखात असल्याने प्रलंबित आहेत. याकरिता २ कोटी ९३ लाख १२ हजार रुपये अनुदान अपेक्षित असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तातडीने अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरूड तालुक्याचे नांव देशात अग्रेसर आहे. संत्रा, हळद, गहू, हरभरा, सोयाबिन, कपाशी, मिरचीचे पीक मोठया प्रमाणावर घेतले जाते. तालुक्यात विहिरी आणि बोअर मोठया प्रमाणावर असून पाण्याचा उपसा सुध्दा मोठया प्रमाणावर असल्याने पाणीटंचाई जाणवत असते. परंतु जलव्यवस्थापन, पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, नालाखोलीकरण या माध्यमातून भूजल पातळी वाढविण्याचे कार्यक्रम सुरु आहेत. परंतु पिके जगविण्याकरीता शेतकऱ्यांना सतत धडपड करावी लगाते. याकरीता विदर्भ सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत मिळणाऱ्या अनुदानावरील ठिबक व तुषार सिंचन योजनेचा लाभ घेऊन पिके जगविण्याचा प्रयत्न असतो. याकरतीा सन २०१४-१५ मध्ये २४२ तर तुषार सिंचनाकरिता १०० अशा ३४२ प्रस्तावांसह १ कोटी ६५ लाख रुपये अनुदानाचे लक्ष्य होते. परंतु ठिबक सिंचनाकरिता एक हजार ८६ तर तुषार सिंचनाकरीता २९८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. याकरीता ४ कोटी ४८ लाख ३३ हजार रुपयांचे अनुदान आवश्यक होते. यापैकी तालुका कृषी कार्यालयाकडून ठिबक सिंचनाकरीता ४२९ लाभार्थी ४५० हेक्टर ४५ आर जमिनीच्या क्षेत्राकरीता एक कोटी ३७ लाख ९३ रुपयांना परवानगी मिळाली होती तर तुषार सिंचनाकरिता १०८ लाभार्थी ९७ हेक्टर २ आर जमिनीकरिता १७ लाख २८ हजार रुपये असे ५३७ लाभार्थी, ५४७ हेक्टर ६५ आर क्ष्ोत्राकरीता एक कोटी ५५ लाख २१ हजार रुपयांच्या अनुदानाला पूर्व परवानगी देण्यात आली होती. उर्वरित ठिबक सिंचनाचे ६३४ लाभार्थी, ६३५ हेक्टर ५५ आर क्षेत्राकरिता २ कोटी ७४ लाख ८६ हजार रुपये अनुदान आणि तुषार संचाचे १८१ लाभार्थी १८१ हेक्टर क्षेत्राकरिता १८ लाख २६ हजार रुपये अनुदानाचे एकूण २ कोटी ९३ लाख १२ हजार रुपयाचे ठिबक व तुषार सिंचन प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयात धूळखात पडले आहेत. या प्रस्तावांना अनुदानाची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यामध्ये असंतोष उफाळून आला आहे. कृषी विभागाने तातडीने ठिबक व तुषार सिंचन योजनेचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक व तुषार सिंचन झाले नाही तर पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (तालुका प्रतिनिधी)