शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

लस आली म्हणूनी मास्क वापरेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST

पान २ ची लिड चांदूर बाजार : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असली तरी दररोजचा आकडा ७० ते ...

पान २ ची लिड

चांदूर बाजार : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रित असली तरी दररोजचा आकडा ७० ते ८० च्या घरात आहे. पूर्वीसारखा हा आकडा २०० ते २५० नसल्याने लोकांच्या बिनधास्त वागण्यात भर पडली आहे. आता तर कोरोनाचा लस आली आहे, मग भीती कशाची, असा सोईस्कर विचार करून मास्कला फाटा दिला जात आहे. सॅनिटायझर तर केव्हाचेच बाद झाले आहे.

दिवसाकाठी ३०० रुग्णसंख्या अमरावतीकरांनी अनुभवल्याने आता दिसणारी ७०/७५ ही संख्या गौण, मात्र दखलनीय आहे. तथापि, लस आली म्हणून मास्कची काय गरज, असा गैरसमज वाढत आहे.जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल २१ हजारांच्या पुढे गेला असताना, मास्क वापरण्याचा कंटाळा केला जात आहे. फिजिकल डिन्टन्सिंगबाबतही लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना दंडित करून महसुलात भर घालण्याचा प्रशासनाकडून काहीही प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळेदेखील लोकांमधील बिनधास्तपणा वाढून कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.

अनलॉक करताना प्रशासनाने अनेक नियमांचे पालन करण्याच्या अटी घातल्या. त्यात दुकानदारांनी स्वत: मास्कचा वापर करण्यासोबतच ग्राहकांसाठी अनिवार्य केले. याशिवाय दुकानामध्ये सॅनिटायजरची व्यवस्था करणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढल्यानंतर पुढील दोन ते अडीच महिने बहुतांश रुग्ण हे बाहेरून आलेले आणि क्वारंटाईन सेंटरमध्ये असणारे होते. आता काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता. मात्र, महिनाभरापासून संसर्गाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. कोरोना व्हायरसचे नवे धोकादायक स्वरूप प्रकट होत असून, हा संसर्ग आता पुन्हा बाधित करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे चित्र आहे.

बॉक्स

कारवाईत शिथिलता

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे काळाची गरज आहे. बाहेर वावरताना मास्कचा वापर आणि शारीर अंतर याबाबत काही लोक गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी नियमाचे पालन करून घराबाहेर पडताना मास्क लावणे, गर्दीत जाणे टाळणे, स्वछता पाळणे आवश्यक आहे. सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत असला तरी साथ संपलेली नसल्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. पोलीस व अन्य यंत्रणांकडून आता मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मोहिमेला पूर्णविराम दिला गेला आहे. त्यामुळेही काही लोक मास्कला फाटा देत असल्याचे चित्र आहे.

कोट

कोरोनाबाधितांची संख्या पुर्वीच्या तुलनेत कमी दिसत असली तरी आजही एखाद्या शहर वा तालुक्यात एकाच दिवशी १८-२० रुग्ण आढळत आहेत. लस आली म्हणून स्वैर वागता येणार नाही.

- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

---------------