शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन नको, आम्हाला जगू द्या!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:13 IST

अमरावती : शासनाने सोमवारी रात्री ८ पासून जाहीर केलेल्या लॉकडाऊनविरोधात मंगळवारी येथील व्यापारी, दुकानांमध्ये कार्यरत कामगारांनी ‘लॉकडाऊन नको, आम्हाला ...

अमरावती : शासनाने सोमवारी रात्री ८ पासून जाहीर केलेल्या लॉकडाऊनविरोधात मंगळवारी येथील व्यापारी, दुकानांमध्ये कार्यरत कामगारांनी ‘लॉकडाऊन नको, आम्हाला जगू द्या!’ अशी आर्त हाक शासन, प्रशासनाला दिली. राजकमल चौकात त्यांनी निदर्शने केले, तर महापालिका प्रवेशद्वारावर नारेबाजी करण्यात आली.

लॉकडाऊन जाहीर होताच दुकाने, प्रतिष्ठाने बंद केली जातात. त्यामुळे कामगारांचा रोजगार हिरावला जातो. अतिशय बिकट परिस्थितीत जगण्यासाठी त्यांना मनाची तयारी करावी लागते. शासन, प्रशासन लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी एकवटतात. कठोर नियमांचे पालन करण्यास भाग पाडतात. तथापि, कामगारांना रोजगार मिळावा, यासाठी कोणीच ‘ब्र’ काढत नाही. लॉकडाऊनमध्ये व्यापारी अथवा दुकानदारांनी कामगारांना वेतन मिळावे, अशी सक्ती का करत नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, कामगारांच्या समस्या, प्रश्न जाणून घेण्यासाठी माजी महापौर विलास इंगाेले यांनी पुढाकार घेतला. कामगारांचे प्रश्न जाणून घेतले आणि लवकरच अमरावतीत लॉकडाऊन शिथिल होण्यासाठी शासनाकडे मागणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले. यादरम्यान महापालिका उपायुक्त रवी पवार यांनीसुद्धा कामगारांची समजूत काढली. मात्र, आता लॉकडाऊन नको, यावर कामगार ठाम होते.

---------------------

दुकान बंद तर वेतन बंद, जगावे कसे?

दुकाने, प्रतिष्ठाने बंद असल्यास कामगारांना वेतन दिले जात नाही. गतवर्षी लॉकडाऊनचा अनुभव वाईट आहे. काही कामगारांना उपाशी राहावे लागले. आता लॉकडाऊनची मानसिकता नाही. पुढे २५ दिवस कसे जगावे, जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदीसाठी पैसे कोठून आणावे, कुटुंबातील आजारी व्यक्तींना औषध कसे खरेदी करावे, अशा विविध समस्यांची यादी आनंद आमले यांनी मांडली. यावेळी अमर ठकरवार, मंगेश कांबे, अर्शद खान, समीर शाह, मतीन खान, सुनील कडू, गजानन महल्ले, कमलेश चौधरी आदी उपस्थित होते.

-----------------

राजकमल चौकात कामगारांचा आक्रोश

‘कोरोनाने मरू द्या, पण उपाशी मरू शकत नाही’, असा आक्रोश राजकमल चौकात कामगारांनी व्यक्त केला. लॉकडाऊन हा पर्याय नाही, लसीकरणाची सक्ती करा, अशी मागणी कामगारांनी केली. दुकाने बंद असल्यामुळे रोजगार कसा, कुठून मिळवावा, याचे उत्तर शासन, प्रशासनाने द्यावे, असे कामगार म्हणाले.