शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

'सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला बदनाम करू नका'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 11:54 IST

शिवरायांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यामागे महापालिका निवडणुकीचे राजकारण असल्याची शंका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, पालकमंत्र्यांची रोखठोक भूमिका

अमरावती : शहराला सांस्कृतिक वारसा आहे. शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक आहे. घटना समितीचे सदस्य, पहिल्या महिला राष्ट्रपती या शहराने दिले आहेत. मात्र, काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापनेचा वाद निर्माण केला जात आहे. जिल्ह्याला पेटवत ठेवण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधींची वागणूक ही योग्य नाही. आता नागरिकांना शांतता हवी. कुणालाही वेठीस धरू नका. चिल्लरगिरी खपवून घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून व्यक्त केली.

शिवाजी महाराज असो वा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याचा मुद्दा, सर्वोच्च न्यायालय, शासन, प्रशासनाने गाईड लाईन ठरवून दिली आहे. असे असताना आराध्यदैवतांचे पुतळे रात्रीतून कशासाठी बसविता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार, आमदार राणा दाम्पत्याचे नाव न घेता वेठीस धरण्याचे राजकारण कोण करीत आहे, याची जाण जिल्हावासीयांना असल्याचा टोलाही पालकमंत्री ठाकूर यांनी लगावला. राजापेठ उड्डाणपुलावरील शिवरायांचा अनधिकृत पुतळा हा प्रशासनाने काढला. बदनाम मात्र काँग्रेसला केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा शहरात योग्य ठिकाणी बसविला जाईल.

शासन, प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवरायांच्या पुतळ्यावरून गर्दी करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम लोकप्रतिनिधींना शोभत नाही, असेही पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या. शिवरायांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यामागे महापालिका निवडणुकीचे राजकारण असल्याची शंकादेखील त्यांनी व्यक्त केली. महापुरुषांचे पुतळे रात्रीतून, चोरीछुपे बसविण्यापेक्षा दिमाखदारपणे सर्वसंमतीनेच नागरिकांच्या साक्षीने स्थापन करू, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

पत्रपरिषेदला आमदार बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, विलास इंगोले, अंजली ठाकरे, जयश्री वानखडे, जयवंत देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर आदी उपस्थित होते.

दर्यापूर येथील पुतळ्याला काँग्रेसचा विरोध नाही - आमदार वानखडे

दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटविण्याचा वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार बळवंत वानखडे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला काँग्रेसचा विरोध नाही. हा पुतळा नियमानुसार स्थापन व्हावा. शासन-प्रशासनाकडून योग्य त्या परवानगी मिळवली जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणYashomati Thakurयशोमती ठाकूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज