शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

'सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला बदनाम करू नका'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 11:54 IST

शिवरायांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यामागे महापालिका निवडणुकीचे राजकारण असल्याची शंका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, पालकमंत्र्यांची रोखठोक भूमिका

अमरावती : शहराला सांस्कृतिक वारसा आहे. शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक आहे. घटना समितीचे सदस्य, पहिल्या महिला राष्ट्रपती या शहराने दिले आहेत. मात्र, काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापनेचा वाद निर्माण केला जात आहे. जिल्ह्याला पेटवत ठेवण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधींची वागणूक ही योग्य नाही. आता नागरिकांना शांतता हवी. कुणालाही वेठीस धरू नका. चिल्लरगिरी खपवून घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून व्यक्त केली.

शिवाजी महाराज असो वा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याचा मुद्दा, सर्वोच्च न्यायालय, शासन, प्रशासनाने गाईड लाईन ठरवून दिली आहे. असे असताना आराध्यदैवतांचे पुतळे रात्रीतून कशासाठी बसविता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार, आमदार राणा दाम्पत्याचे नाव न घेता वेठीस धरण्याचे राजकारण कोण करीत आहे, याची जाण जिल्हावासीयांना असल्याचा टोलाही पालकमंत्री ठाकूर यांनी लगावला. राजापेठ उड्डाणपुलावरील शिवरायांचा अनधिकृत पुतळा हा प्रशासनाने काढला. बदनाम मात्र काँग्रेसला केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा शहरात योग्य ठिकाणी बसविला जाईल.

शासन, प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवरायांच्या पुतळ्यावरून गर्दी करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम लोकप्रतिनिधींना शोभत नाही, असेही पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या. शिवरायांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यामागे महापालिका निवडणुकीचे राजकारण असल्याची शंकादेखील त्यांनी व्यक्त केली. महापुरुषांचे पुतळे रात्रीतून, चोरीछुपे बसविण्यापेक्षा दिमाखदारपणे सर्वसंमतीनेच नागरिकांच्या साक्षीने स्थापन करू, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

पत्रपरिषेदला आमदार बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, विलास इंगोले, अंजली ठाकरे, जयश्री वानखडे, जयवंत देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर आदी उपस्थित होते.

दर्यापूर येथील पुतळ्याला काँग्रेसचा विरोध नाही - आमदार वानखडे

दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटविण्याचा वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार बळवंत वानखडे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला काँग्रेसचा विरोध नाही. हा पुतळा नियमानुसार स्थापन व्हावा. शासन-प्रशासनाकडून योग्य त्या परवानगी मिळवली जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणYashomati Thakurयशोमती ठाकूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज