शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

'सांस्कृतिक वारसा लाभलेल्या अंबानगरीला बदनाम करू नका'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 11:54 IST

शिवरायांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यामागे महापालिका निवडणुकीचे राजकारण असल्याची शंका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देकुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, पालकमंत्र्यांची रोखठोक भूमिका

अमरावती : शहराला सांस्कृतिक वारसा आहे. शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक आहे. घटना समितीचे सदस्य, पहिल्या महिला राष्ट्रपती या शहराने दिले आहेत. मात्र, काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापनेचा वाद निर्माण केला जात आहे. जिल्ह्याला पेटवत ठेवण्याचे काम सुरू आहे. लोकप्रतिनिधींची वागणूक ही योग्य नाही. आता नागरिकांना शांतता हवी. कुणालाही वेठीस धरू नका. चिल्लरगिरी खपवून घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी पत्रपरिषदेतून व्यक्त केली.

शिवाजी महाराज असो वा अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याचा मुद्दा, सर्वोच्च न्यायालय, शासन, प्रशासनाने गाईड लाईन ठरवून दिली आहे. असे असताना आराध्यदैवतांचे पुतळे रात्रीतून कशासाठी बसविता, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खासदार, आमदार राणा दाम्पत्याचे नाव न घेता वेठीस धरण्याचे राजकारण कोण करीत आहे, याची जाण जिल्हावासीयांना असल्याचा टोलाही पालकमंत्री ठाकूर यांनी लगावला. राजापेठ उड्डाणपुलावरील शिवरायांचा अनधिकृत पुतळा हा प्रशासनाने काढला. बदनाम मात्र काँग्रेसला केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा शहरात योग्य ठिकाणी बसविला जाईल.

शासन, प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवरायांच्या पुतळ्यावरून गर्दी करणे, कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, जिल्ह्याला बदनाम करण्याचे काम लोकप्रतिनिधींना शोभत नाही, असेही पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या. शिवरायांच्या पुतळ्याचा वाद निर्माण करण्यामागे महापालिका निवडणुकीचे राजकारण असल्याची शंकादेखील त्यांनी व्यक्त केली. महापुरुषांचे पुतळे रात्रीतून, चोरीछुपे बसविण्यापेक्षा दिमाखदारपणे सर्वसंमतीनेच नागरिकांच्या साक्षीने स्थापन करू, असे आवाहन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केले.

पत्रपरिषेदला आमदार बळवंत वानखडे, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, विलास इंगोले, अंजली ठाकरे, जयश्री वानखडे, जयवंत देशमुख, बाळासाहेब हिंगणीकर आदी उपस्थित होते.

दर्यापूर येथील पुतळ्याला काँग्रेसचा विरोध नाही - आमदार वानखडे

दर्यापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा हटविण्याचा वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार बळवंत वानखडे यांनी शिवरायांच्या पुतळ्याला काँग्रेसचा विरोध नाही. हा पुतळा नियमानुसार स्थापन व्हावा. शासन-प्रशासनाकडून योग्य त्या परवानगी मिळवली जाईल, असे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणYashomati Thakurयशोमती ठाकूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज