शहरं
Join us  
Trending Stories
1
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
2
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
3
India ODI Squad vs South Africa : केएल राहुल कॅप्टन; BCCI नं ऋतुराजसाठीही उघडला टीम इंडियाचा दरवाजा
4
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
5
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
6
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
7
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
8
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
9
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
10
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
11
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
12
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
13
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
14
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
15
दिवसा काम अन् रात्री अभ्यास; स्वप्न सत्यात उतरवून 'तो' झाला IAS, संपूर्ण गावाला वाटतो अभिमान
16
बॉम्बची धमकी अन् 'गल्फ एअर'च्या प्रवाशांचे धाबे दणाणले; 'GF-274' मध्ये नेमकं काय घडलं?
17
अजब लव्हस्टोरी! दूध विकायला येणाऱ्या तरुणावर जडले प्रेम, ४ मुलांची जबाबदारी पतीवर टाकून पत्नी पळाली!
18
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार! जाणून घ्या 'फिटमेंट फॅक्टर' आणि नवीन बेसिक सॅलरीचे गणित!
19
'पुण्याला जातो' सांगून गेलेल्या अंडर-१६ खेळाडूचा जंगलात सापडला मृतदेह; मोबाईलमुळे पटली ओळख!
20
सौदी अरेबियात ३१ हजार जागांसह तब्बल ९१ हजार नोकऱ्या; मुख्य नोकरीसोबत सेवा करण्याची संधी
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक वस्तू, सेवांपासून कोणालाही वंचित ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांचे निर्देश : धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यांचा आढावा, आरोग्य सुविधांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा नियमित व्हावा, एकही व्यक्ती सुविधेपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणा, रुग्णालये, निवारा केंद्रे यांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. निवारा केंद्रांतील नागरिकांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. आरोग्य, महसूल व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावाही त्यांनी घेतला. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासन विविध पावले उचलत आहे. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. स्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने काम करावे व इतरांचेही सहकार्य मिळवावे. आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी आहे. या काळात ते अविश्रांत सेवा बजावत आहेत, असे पालकमंत्री म्हणाल्या.आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविलेकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी युद्धस्तरावर सेवा देत आहे. क्वारंटाइन व्यक्ती, तपासणी स्थिती, रुग्णालय व आरोग्य सुविधा, निवारा केंद्रे आदी बाबींचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. दरम्यान, डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे पालकमंत्र्यांनी मनोबल वाढविले.अधिकारी, कर्मचाºयांनी मुख्यालय सोडू नयेग्रामीण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. ‘अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ हे अभियान प्रशासनाने सुरू केले आहे. त्यानुसार घरोघरी संपर्क करावा, जनजागृती करावी, ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी सांभाळावी, असे पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या.निवारा केंद्रात सुविधांची उणीव नकोजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सर्वांना वेळेत व्हावा, यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. केवळ जिल्ह्यातील स्थानिक नागरिकच नव्हे, तर या काळात जिल्ह्याबाहेरून आलेले, पण संचारबंदीमुळे अडकलेले अनेक नागरिक आहेत. त्यांच्यासाठी निवारा केंद्रे सुरू केली आहेत. त्यांची गैरसोय होता कामा नये, असे पालकमंत्री म्हणाल्या.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर