शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

जीवनावश्यक वस्तू, सेवांपासून कोणालाही वंचित ठेवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांचे निर्देश : धामणगाव, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर तालुक्यांचा आढावा, आरोग्य सुविधांची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा नियमित व्हावा, एकही व्यक्ती सुविधेपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले.कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वरला भेट देऊन तेथील सेवा- सुविधांची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री ठाकूर यांनी आरोग्य यंत्रणा, रुग्णालये, निवारा केंद्रे यांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. निवारा केंद्रांतील नागरिकांची त्यांनी आस्थेने चौकशी केली. आरोग्य, महसूल व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावाही त्यांनी घेतला. कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी शासन विविध पावले उचलत आहे. सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. स्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने काम करावे व इतरांचेही सहकार्य मिळवावे. आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी आहे. या काळात ते अविश्रांत सेवा बजावत आहेत, असे पालकमंत्री म्हणाल्या.आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविलेकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी युद्धस्तरावर सेवा देत आहे. क्वारंटाइन व्यक्ती, तपासणी स्थिती, रुग्णालय व आरोग्य सुविधा, निवारा केंद्रे आदी बाबींचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. दरम्यान, डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांचे पालकमंत्र्यांनी मनोबल वाढविले.अधिकारी, कर्मचाºयांनी मुख्यालय सोडू नयेग्रामीण परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये. ‘अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ हे अभियान प्रशासनाने सुरू केले आहे. त्यानुसार घरोघरी संपर्क करावा, जनजागृती करावी, ही लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी आपापली जबाबदारी सांभाळावी, असे पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या.निवारा केंद्रात सुविधांची उणीव नकोजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सर्वांना वेळेत व्हावा, यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. केवळ जिल्ह्यातील स्थानिक नागरिकच नव्हे, तर या काळात जिल्ह्याबाहेरून आलेले, पण संचारबंदीमुळे अडकलेले अनेक नागरिक आहेत. त्यांच्यासाठी निवारा केंद्रे सुरू केली आहेत. त्यांची गैरसोय होता कामा नये, असे पालकमंत्री म्हणाल्या.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर